साहित्य संमेलन: उद्घाटनातली चूक समारोपात सुधारली

Last Updated: Sunday, January 5, 2014, 22:52

८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सासवडमध्ये पार पाडला. उद्धघाटनाच्या कार्यक्रमात झालेली चूक समारोपाच्या कार्यक्रमात आयोजकांनी सुधारली.

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ

Last Updated: Saturday, January 4, 2014, 08:11

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...

मराठी साहित्य संमेलन, नव्या वादाची ठिणगी

Last Updated: Friday, January 3, 2014, 15:19

सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.

८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

Last Updated: Friday, January 3, 2014, 14:58

सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सासवड सज्ज होतंय. यानिमित्तान सासवडचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे.

ज्याची पुस्तक विक्री जास्त; त्यालाच करा अध्यक्ष - राज

Last Updated: Thursday, October 17, 2013, 20:05

‘...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशी टीका राज ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या राजकारणावर आणि नेहमीच्याच वादावर केलीय. सोबतच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते.

संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे

Last Updated: Monday, January 14, 2013, 11:32

यंदाच्या साहित्य संमेलनात वेगळे प्रयोग केले गेले. विदेशी लेखकांना आणलं, मुलांसाठी कार्यक्रम आणि नवोदितांना जास्त संधी दिली, असा दावा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केला.

साहित्य संमेलनात `मराठी` समृद्धीसाठी ठराव

Last Updated: Sunday, January 13, 2013, 23:34

८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. या संमेलनात जवळपास सात ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषा आणि मराठी शाळा संर्वधनासाठी प्रयत्न करावेत. तर बेळगाव सीमा प्रश्न आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपाय-योजना करण्याचे सूचविण्यात आलेय.

'हस्तीदंती मनोऱ्यातील साहित्यिकांनी आत्मचिंतन करावं'

Last Updated: Saturday, January 12, 2013, 07:02

चिपळूणमध्ये सुरू असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात पवारांनी साहित्यिकांना कधी चिमटा काढला तर कधी खडेबोल सुनावले.

साहित्य संमेलनासाठी बेकायदा निधीचा वापर!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 13:00

चिपळूण इथं होण्याऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

`विश्व साहित्य संमेलनासाठी दिलेला निधी परत करा`

Last Updated: Friday, November 30, 2012, 13:50

टोरांटो आणि कॅनडामध्ये आयोजित केलेल्या `विश्व मराठी साहित्य संमेलना`च्या आयोजनासंबंधी विविध वाद सुरू असतानाच आता राज्य सरकारनं या संमेलनांकरता देऊ केलेला निधी परत मागितल्यानं आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

`टोरांटो साहित्य संमेलना`ची दिमाखात सांगता

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 08:40

कॅनडाची राजधानी टोरांटो इथं रंगलेल्या साहित्यिक मेळ्याची सांगता सोमवारी ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकानं झाली. वसंत आबाजी डहाडे, प्रभा गणोरकर यांच्यासह आठ-दहा साहित्यिक आणि शेकडो साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

विश्व मराठी साहित्य संमेलन होणार

Last Updated: Saturday, August 25, 2012, 08:27

टोरांटो येथे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणारे चौथे विश्व मराठी साहित्य समेलन अखेर रद्द झाल्याचे वृत्त येताच या संमेलनाचे आयोजक यांनी हे संमेलन होणार असल्याचे म्हटले आहे. निमंत्रक लीना देवधरे यांनी याबाबत झी २४ तासशी बोलतना म्हटले आहे, हे संमेलन होणारच आहे.

संमेलनातल्या वादात आयोजकांची फोडणी

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 20:14

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं होणा-या 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाचं ठरतंय. साहित्य संमेलनात विचारात घेतलं नसल्यामुळे आगपाखड करणा-या कोमसापला संमेलनाच्या आयोजकांनी आता डिवचलंय.

चंद्रपुरात ग्रंथ प्रसाराचा जागर

Last Updated: Monday, February 6, 2012, 13:26

चंद्रपुरातल्या 85 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात विक्रमी पुस्तक विक्री झाली. संमेलनात तब्बल तीन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

'प्रक्षुब्ध लिखाणापेक्षा, मन शांत करणारं लिहा'

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:16

८५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके चंद्रपूरात दाखल झाले आहेत. आणि शहरातल्या वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी लावली. सध्या नवी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या हजारोंनी तयार होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रक्षुब्ध लिखाण करण्यापेक्षा समाजमन शांत करणारं लिखाण झालं पाहिजे.