काँग्रेस तिकीटावर तर मोदीही निवडणूक हरले असते - निरुपम

Last Updated: Sunday, June 8, 2014, 17:15

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.

अबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 13:06

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.

भाजप तुपाशी, उद्धव - राज उपाशी : निरुपम

Last Updated: Thursday, March 13, 2014, 12:28

भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यादरम्यान सध्या सुरु असलेल्या सत्तेच्या जोड-तोडीमध्ये आता काँग्रेसनंही तोंड खुपसलंय.

संजय निरुपम यांनी केली आचारसंहिता भंग

Last Updated: Thursday, March 6, 2014, 09:45

खासदार संजय निरुपम यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आलीये. भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:41

काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

Last Updated: Sunday, January 26, 2014, 14:08

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

वीजदरावरुन निरुपम आक्रमक, आज रिलायन्स कार्यालवर मोर्चा

Last Updated: Monday, January 13, 2014, 10:07

मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.

महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 19:34

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.

बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी अपरिपक्व- संजय निरुपम

Last Updated: Monday, May 27, 2013, 20:42

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याची मागणी अपरिपक्व असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम हे नागपूरमध्ये असं म्हणाले.

ठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम

Last Updated: Monday, October 8, 2012, 07:30

नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्तव्य खासदार संजय निरुपम यांनी केलंय.

राजीव गांधी यांच्या नावावर...

Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:48

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलीय. खासदार संजय निरूपम यांच्यासह काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.

काँग्रेसची अजित सावंतांना कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 11:10

मुंबई प्रदेश सरचिटणीस अजित सावंत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित सावंत यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सकारात्मक प्रांतवाद असावा...

Last Updated: Thursday, November 3, 2011, 18:24

दीपक पवार
राजकीय विश्लेषक
निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.

राज ठाकरे यांची दिवाळीनंतर ‘फटाकेबाजी’!

Last Updated: Thursday, November 3, 2011, 13:49

काही फटाके दिवाळीनंतरही बाकी ठेवायचे असतात, असे सांगत दिवाळीला भाष्य करणं राज ठाकरेंनी टाळलं होतं. मात्र, आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संजय निरूपम, कृपाशंकर सिंह, उद्धव ठाकरे, उत्तर भारतीय, हिंदी मीडियांचा चांगलाच समाचार घेतला.

निरुपमच्या तोंडाला मी काळं फासणारच...

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 18:13

विनोद घोसाळकर
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. कारण माझ्या पदापेक्षा मला नेहमीच मराठी स्वाभिमान हा मला हजारपटीने जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, मी हाडाचा शिवसैनिक आहे. हे संजय निरुपमने लक्षात ठेवावं.

मुंबई आमच्या बापाचीः अबू आझमी

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 13:03

खासदार संजय निरुपम पाठोपाठ अबू आझमी आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी छट पूजेचे निमित्त करुन राजकारण सुरू केले आहे. ‘मुंबई हमरे बापकी है, यहाँ छाती ठोक के रहेंगे, कोई मारपीट करेगा तो वन बाय वन निपट लेंगे ’अशा शब्दात समाजवादी नेता अबू आझमी याने शिवसेना आणि मनसेला उघड-उघड आव्हान दिले आहे.

उद्धव-निरुपम वाद 'पोस्टर्सवर'

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 05:48

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुंबईतील कांदिवली भागात मध्यरात्रीच्या सुमारास शिवसैनिकांनी संजय निरुपम यांच्या पोस्टर्सला काळं फासलं.

बोरीवली तर बंद करून दाखवा

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 12:27

राम कदम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी बंद यशस्वी करून दाखवावा, हे काही नाही, निवडणुकीपूर्वीच स्टंट आहेत.

उत्तर भारतीयच मुंबईवर 'ओझं'

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 07:42

अरविंद सावंत
काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नागपुरात जाऊन मुंबईबद्दल जी बाष्कळ, अपरिपक्व आणि बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी चांगलंच कानफटवलं आहे.

राजकारण नको, मूल्यमापन करा...

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 11:07

सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.

निरूपमांचे उधळलेले वारू, मुख्यमंत्र्यांनी आवरले

Last Updated: Monday, October 24, 2011, 12:32

उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई ठप्प होईल, असे बेताल वक्तव्यांचे वारू उधळविणाऱ्या काँग्रेस नेते संजय निरूपमांना चाप लावत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई बंद होणार नसल्याचे सांगितले आहे.

मुंबईवर निरुपम यांचा उत्तर भारतीय 'राग'

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 06:34

खासदार संजय निरूपम यांनी पुन्हा उत्तर भारतियांचा सूर आवळल्याने पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.