मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 10:12

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

वाया पाणी रोखण्याऐवजी कल्याणमध्ये अधिकाऱ्याचा दमदाटी

Last Updated: Friday, October 18, 2013, 14:03

कल्याणच्या पत्री पूल परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाईपलाइन फुटली असल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातंय. ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण फुटलेल्या पाईपलाइन जवळ आंघोळीचा आनंद लुटतायेत. असे असताना अधिकाऱ्यांचा ऊर्मटपणा दिसून आला.

मराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!

Last Updated: Sunday, May 5, 2013, 22:05

मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.

पुण्यात पाणीबाणी

Last Updated: Saturday, April 27, 2013, 14:43

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

`आयपीएल` तुमच्यासाठी कायपण....

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 16:12

चारशे वर्षातल्या भीषण दुष्काळामुळं आदिवासींवर भीक मागून खाण्याची वेळ आली असताना पुरोगामी महाराष्ट्रातच आयपीएलचा घाट घातला जातोय.

... तर माझा प्रकल्पांना विरोध - राज ठाकरे

Last Updated: Saturday, March 23, 2013, 19:49

मरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय.

घोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत

Last Updated: Sunday, March 17, 2013, 13:45

विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी

Last Updated: Saturday, January 5, 2013, 19:50

लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 20:01

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

अहमदनगरमध्ये पाणी पेटले, आमदारांचे आत्मदहन?

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:37

अहमदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पाण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन राम शिंदे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलयं.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर `पाणी`...

Last Updated: Friday, October 5, 2012, 18:29

सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शाळांमध्ये मुलभूत सोयी येत्या सहा महिन्यांत पुरवण्याचे आदेश दिलेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात... पाण्याच्या टाक्या आहेत पण, रिकाम्या...

मुंबईकरांचे पाणी कपात टळले

Last Updated: Thursday, September 13, 2012, 09:36

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील१० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी दिलीय.

पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीची 'बंद'ची हाक

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 13:29

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी सोलापूरला देण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. सोलापूरला एक टीमसी पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं परांडा तालुका बंदी हाक दिली आहे.

विलासरावांच्या लातुरात दुष्काळ

Last Updated: Thursday, May 17, 2012, 15:56

राज्याच्या इतर भागाप्रमाणे मराठवाड्याला दुष्काळाचा झळा बसतायेत. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात तर दुष्काळाची तीव्रता जरा जास्तच आहे. मात्र तिथल्या नेत्यांना दुष्काळाची फारशी चिंता असल्याचं दिसत नाही.

पाणीप्रश्नावर आंदोलन - अण्णा हजारे

Last Updated: Thursday, May 17, 2012, 10:24

राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.

झी २४ तासमुळे डेंगनमाळमध्ये पाणी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 16:14

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील डेंगनमाळसह इतर गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. डेंगनमाळमधील पाण्याच्या प्रश्नाची व्यथा झी 24 तासनं प्रथम मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या सरकारनं 5000 लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या गावात बसवल्यात.

'झी २४ तास'ची करणी, जत तालुक्याला पाणी

Last Updated: Saturday, May 12, 2012, 21:06

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचे पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्याऐवजी, हे पाणी तासगावला पळवल्याचे वृत्त 'झी २४ तास' वरून प्रसारित केल्यावर, म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे.

मुंबईतल्या आदिवासींसाठी चिखलाचं पाणी

Last Updated: Friday, May 11, 2012, 20:46

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगत आहेत. कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं.

आर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं !

Last Updated: Thursday, May 10, 2012, 13:09

गृहमंत्री आर. आर. पाटला यांनी जतचे पाणी तासगावला पळवल्याने जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मध्येच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

पाण्यासाठी जीव गेला

Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:22

राज्यात पाणी टंचाईनं आणखी एक जीव गेला आहे. नाशिक जिल्हात विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या रखुबाई सोनावणे या पन्नास वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. मालेगाव वळवाडे गावात ही घटना घ़डली.

पाण्यासाठी पायपीट

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 21:31

मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या 178 योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास 90 टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केलेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत.

तहानलेले प्राणी, पुणेकर पाजतायत पाणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 20:57

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाचा त्रास माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. कात्रजच्या जंगलात पाण्याचे स्त्रोत आटल्यानं प्राण्यांचीही परवड होतेय. या प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतलाय.

पाण्याची तहान ठरली जीवघेणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 18:13

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

राष्ट्रपतींच्या सूनबाई करतायेत पाण्यासाठी वणवण

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:13

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे.

विदर्भात पाण्यासाठी वणवण

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:11

वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.

मुंबईत २५% पाणी कपात

Last Updated: Thursday, January 5, 2012, 09:49

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.