Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:22
दुष्काळावरील पॅकेजच्या पहिल्या टप्प्याचा निधी पुढील आठ दिवसांत देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी दिली. फेब्रुवारीत राज्यानं केंद्राकडं मागणी केलेल्या मदतीची पूर्तता होणार आहे. मात्र काल मागणी केलेल्या पॅकेजबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शरद पवारांना सर्वत्र टीकेचा 'सामना' करावा लागत आहे.