Last Updated: Thursday, June 7, 2012, 21:30
देशभरात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न-समारंभ पार पडतात. दरवर्षी अशा समारंभात ५८ हजार कोटी अन्नधान्याची नासाडी होतेय. एकीकडे गरिब जनतेला एकवेळचं अन्न मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्नाची अशा प्रकारे होणारी नासाडी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणूनच, आता हा सामाजिक गुन्हा ठरण्याची शक्यता आहे.