Last Updated: Wednesday, November 27, 2013, 07:39
तुम्ही कधी विमानाने प्रवास केला नसेल तर ते कमी पैशात शक्य आहे. केवळ ५०० रूपयांत विमान भरारी घेऊ शकता. टाटा समूहासोबत हवाई क्षेत्रात पाऊल टाकलेल्या एअर एशिया या विमान कंपनीने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५०० रूपयात अनोखी स्कीम अंमलात आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वेच्या एसी तिकीट दरात म्हणजे ५०० रूपयांत विमान प्रवास करू शकता.