नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

Last Updated: Friday, May 18, 2012, 16:26

नाशिकमधल्या येवल्यात आज शेतक-यांना बियाणं वाटण्यात येणार होतं. पण या रांगेत शेतकऱ्यांपेक्षा व्यापा-यांचे दलालच पुढे होते. त्यामुळे सहाजिकच शेतक-यांचा उद्रेक झाला. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

अण्णांवर हल्ला, आज राळेगणसिद्धी बंद

Last Updated: Thursday, May 17, 2012, 08:58

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातल्या गाडीवर नागपुरात दगडफेक झाल्याचा निषेध म्हणून आज राळेगणसिद्धीत बंद पाळण्यात येणार आहे. नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

पाणी संपणार... आता करायचे काय?

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 21:09

धुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा कधी नव्हे इतका खालावला आहे. आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शिर्डी संस्थानचे चार विश्वस्त अडकणार

Last Updated: Sunday, May 13, 2012, 16:00

शिर्डीच्या साई संस्थानच्या चार माजी विश्वस्तांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. बनावट कागदपत्रं तयार करुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप या विश्वस्तांवर आहे.

लॉकअपमधून तीन आरोपी फरार

Last Updated: Saturday, May 12, 2012, 18:42

चांदवड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून तीन आरोपी पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे. अश्रफ हमीद शेख, खुर्शीद हमीद शेख, सर्फराज गुलाम चौधरी अशी आरोपींची नावं असून ते मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत.

अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदे उध्वस्त

Last Updated: Friday, May 11, 2012, 21:14

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आला आणि शेतीचं पुरतं नुकसान करुन गेला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाल्यानं शेतकरी पुरता धास्तावलाय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत आणि कांदेही सडून गेलेत.

गोदामाईची व्यथा

Last Updated: Thursday, May 10, 2012, 23:54

नाशिकचा अभिमान असणारी गोदामाई सध्या तिचं सौंदर्यच हरवून बसलीय. गेल्या अनेक वर्षांपासून ही नदी पानवेलींच्या विळख्यात सापडलीय. वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनावर म्हणावा तसा परिणाम झालेला नाही.

शिर्डी मंदिरात पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा

Last Updated: Thursday, May 10, 2012, 17:23

शिर्डीच्या साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर दाऊ पिऊन दोन पोलिसांनी धिंगाणा घातला. नाशिक ग्रामीणचे हे पोलीस होते. व्हिआयपी गेटमधून प्रवेश न मिळाल्यानं त्यांनी हा गोंधळ घातला.

'तनिष्क'मध्ये चोरी... 'बंटी-बबली'ला अटक

Last Updated: Thursday, May 10, 2012, 13:01

नाशिकमधल्या तनिष्क ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीप्रकरणी केवळ 24 तासांत दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. एका बंटी-बबलीच्या जोडीनं ही चोरी केल्याचं उघड झालंय.