जळगाव बनलंय 'निर्जळगाव'!

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 09:41

दुष्काळाच्या झळा पश्चिम महाराष्ट्राच नाहीतर इतर भागांनाही बसतायत. जळगावात पारा ४5 अंशांवर गेलाय. जलस्त्रोत कोरडे पडू लागल्यानं तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातल्या नागरिकांना करावा लागतोय.

बीपीओ कंपन्यांनी तरूणांची लावली वाट

Last Updated: Monday, April 30, 2012, 22:31

आयटी सेक्टरमधल्या बीपीओ कंपन्या कर्मचाऱ्यांचं शोषण करतात. नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ काम, अत्यंत कमी पगार देऊन कामगार कायद्याची सर्रास पायमल्ली केली जाते. याविरोधात शेकडो कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरु केला आहे.

नरमांसभक्षक बिबट्याने घेतले ३ बळी

Last Updated: Sunday, April 29, 2012, 20:11

नाशिक जिल्ह्यात नरभक्षक बिबट्यानं एका महिन्यात तीन जणांचे बळी घेतल्यानं दहशतीचं वातावरण आहे. सिन्नर तालुक्यात एक आणि निफाडमध्ये दोन मुलांना भक्ष्य बनविल्याने ग्रामीण भागात ही दहशत अधिक आहे.

नरभक्षक बिबट्या बसलाय दडून....

Last Updated: Saturday, April 28, 2012, 23:56

निफाड तालुक्यातील शिवरे गावात बिबट्याच्या हल्लाला अर्धा दिवस उलटत नाही तोच तालुक्यातील गिरणारे गावात बिबट्याचं दर्शन घडलं आहे. त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे.

...अबब सोन्याचा भाव @ २९,९००

Last Updated: Saturday, April 28, 2012, 18:31

सोन्याला नवी उच्चांकी झळाळी मिळाली आहे. सोन्याचा दर २९ हजार ९०० रुपयांवर गेला आहे. सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या जळगावमध्ये आज सोन्याचा भावाने उच्चांक गाठला.

बिबट्याने ६ वर्षांच्या बालिकेचा जीव घेतला

Last Updated: Saturday, April 28, 2012, 18:00

नाशिकमधल्या निफाड तालुक्यातल्या शिवरे गावात ६ वर्षांच्या बालिकेवर एका बिबट्यानं हल्ला केला. त्यात त्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पल्लवी बाळासाहेब सानप असं तिचं नाव आहे.

रिक्षाचालकांनाच नकोय भाडेवाढ...

Last Updated: Friday, April 27, 2012, 19:01

प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षांची भाडेवाढ केल्यानंतरही रिक्षाचालक मात्र भाडेवाढ मान्य करायला तयार नसल्याचा अजब नमुना नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे. ग्राहक शेअर रिक्षासाठीची ठरवून दिलेली भाडेवाढ मान्य करायला तयार नाहीत.

देवा तुला ठेऊ कुठं!!!

Last Updated: Friday, April 27, 2012, 18:50

दिवे आगर, अंबेजोगाईमधील मंदिरातील चोरीच्या घटनेवरून आता देवही सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांचा नाशिकमधील विविध देवस्थान ट्रस्टसह पोलिसांनीही धसका घेतला आहे.

जळगावात पाणीटंचाई, बैठकीत खडाजंगी

Last Updated: Friday, April 27, 2012, 16:49

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:20

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.