Last Updated: Sunday, February 2, 2014, 20:56
नवी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोललेत. यापुढी तुम्ही टोल भरायचा नाही. जर कोणी मागितला तर त्याल तुडवा, असा नारा दिला. राज यांचा आदेश मिळताच राज्यात टोलफोडचा भडका उडाला. त्यानंतर या आंदोलनावरून राज यांच्यावर चोहोकडून टीकेचा मारा झाला. राज आज एका जाहीर कार्यक्रमात आले खरे; मात्र, त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मी जे काही बोलणार आहे ते ९ तारखेला बोलेन, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे ते काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.