`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार

Last Updated: Sunday, May 11, 2014, 18:27

`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

हवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 11:15

कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मल्लिकाने आपल्या गावात जाऊन केली शेती

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 20:41

मल्लिका शेरावत एका शुटींगच्या निमित्ताने तिच्या स्वतःच्याच गावात पोहोचली. हरयाणातल्या तिच्या या गावात शुट करताना ती चक्क तिच्या पारंपरिक वेशात पाहायला मिळालीच एवढचं नाही तर तिने चक्क शेतीची कामंही केली.

नाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान

Last Updated: Monday, February 11, 2013, 21:47

राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.

शीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!

Last Updated: Monday, January 7, 2013, 18:23

राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.

गुडबाय २०१२- पीकपाणी

Last Updated: Monday, December 24, 2012, 23:12

सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत

मका उत्पादनाची शास्त्रोक्त बाजू

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 08:50

मका लागवडीचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असलं तरी सरासरी उत्पादन कमीच आहे. त्यामुळे शेतक-यांनी महत्वाच्या बाबी विचारात घेण्याच्या दृष्टिने महात्मा फुले कृषी विद्यापीठाताल प्रा. आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केलंय.

शेतकऱ्यांसाठी `स्मार्ट कार्ड`

Last Updated: Monday, September 3, 2012, 08:10

गोवा सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे इथल्या शेतकऱ्यांना सबसिडी आणि कर्ज वितरण करण्यास सोयीचं ठरणार आहे. तसेच सरकार दरबारी माराव्या लागणार चकराही आता कमी होणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत केलंय.

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 13:23

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना फायदा देणारं 'स्वीट कॉर्न'

Last Updated: Thursday, August 2, 2012, 10:43

सांगली जिल्ह्यतल्या मिरज पुर्व आरग गावातील बाबासो पाटील या शेतक-यानं दुष्काळावर मात करीत स्वीटकॉर्नची लागवड केली. हे पीक अवघे तीन महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न देतं आणि जनावरांसाठी वैरण ही भरपूर तयार होते.

बळीराजा ठरलाय नाशिक अर्थव्यवस्थेचा कणा

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 20:57

पाच हजार आठशे एक कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा करण्याचा आराखडा नाशिक जिल्ह्याने तयार केला आहे. हा आरखडा केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वांत मोठा आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्रात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील बळीराजा घेणार आहे.

खाऱ्यापाण्यात केली मत्स्यशेती...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 10:44

अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली.

जैतापुरात शिवसेना करणार अनोखं आंदोलन

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 08:08

जैतापूर प्रकल्पाचा विषय गेल्या काही दिवसांपासून थंड असतानाच ऐन पावसात शिवसेनेच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांनी आज अनोखं आंदोलन जाहीर केलंय. प्रकल्पस्थळी घुसून सामुदायिक शेती आंदोलन करण्यात येणार आहे.

कोल्हापूरमध्येही अफूची शेती

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:30

कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यात सापडलेल्या अफू शेती प्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शाहूवाडीतल्या शिवारे गावातील शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या अफूच्या झाडांची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

अफू पिकाला मान्यता द्या- शेतकरी संघटना

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 19:16

राज्यभरात फोफावलेल्या अफूच्या पिकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना आता अफू पिकाला मान्यता मिळावी म्हणून शेतकरी संघटना आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहे.

अफूच्या शेतीवरून पोलिसच संशयाच्या फेऱ्यात

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:06

सांगलीतल्या अफूच्या शेती प्रकरणामुळं आता राजकीय नेत्यांनाही नशा चढू लागली आहे. अफूच्या शेतीवरुन वनमंत्री पतंगराव कदम यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलंय. पोलिसांनी हप्ते घेणं थांबवलं तर काम चांगलं होईल, असा टोला पतंगरावांनी हाणला आहे.

भारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 09:01

कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

Last Updated: Friday, January 13, 2012, 20:49

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

थंडीची लाट, फळांची वाट!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:11

आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

अगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:13

'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:36

आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

जरबेराची शेती फायद्याची !

Last Updated: Friday, November 25, 2011, 08:39

२००५ सालापासून पुणे जिल्ह्यातल्या तळेगांव दाभाडे इथं फुलशेती करणारे विजय पाटील या शेतकऱ्यानं उत्पादन आणि विक्रीचा मेळ साधून चांगलं उत्पादन घेतलंय. एकदा लागवड केल्यानंतर पुढे फुलांची काढणी दीड ते दोन वर्ष चालते.

युवा शेतकऱ्याचा शोध ज्वारी पॉलीश मशीन

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 14:06

वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची प्रत घसरते यावर उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील अमरजीत सावंत या युवा शेतकऱ्यानं ज्वारीची पॉलीश मशीन तयार केलीय. अशा प्रकारचं राज्यातील हे पहिलं मशीन असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय.