राज्य सरकारचा जीआर की फतवा, विद्यार्थ्यावर अन्याय

Last Updated: Monday, June 23, 2014, 22:30

पदवी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया संपत आली आणि आता कुठं महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. अल्पसंख्याक कॉलेजांमधील अल्पसंख्याकांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारनं नवीन जीआर काढलाय. त्यामुळं प्रवेशाचा घोळ आणखी वाढणार असून, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांवर विशेषतः मराठी मुलांवर अन्याय होणार आहे.

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देणार

Last Updated: Monday, June 9, 2014, 20:19

राज्यातील लिंगायत समाजाला भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.

आदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 16:56

आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:26

सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

राज ठाकरेंच्या अटकेचं राज्य सरकारसमोर आव्हान

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 13:41

राज्यात मनसेनं छेडलेल्या टोल आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता आहे.

पंढरपूरच्या बडव्यांना सुप्रीम कोर्टाचा चाप, मंदिर राज्यसरकारकडेच

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 15:21

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर राज्यसरकारकडंच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बडवे आणि उत्पातांची याचिका न्यायालयानं फेटाळलीय.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडीचा घाईचा कारभार

Last Updated: Thursday, January 9, 2014, 21:48

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता राज्य सरकारकडून सरकार काही महत्त्वाचे तसंच लोकप्रिय निर्णय झटपट घेण्याची शक्यता आहे. एकीकडे निर्णय होत नसल्याची ओरड सरकार मधले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री करत असताना आता सरकार गतीनं कामाला लागणार आहे. याची सुरूवातही झाली आहे.

काँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 21:00

राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.

‘महिला फ्लीट टॅक्सी`साठी परवाने मिळवणं झालं सोप्पं!

Last Updated: Thursday, January 2, 2014, 08:29

राज्य शासनानं आखलेल्या ‘महिला फ्लीट टॅक्सी’ योजनेची अंमलबजावणी लवकरच होण्याची चिन्हं आहेत. या योजनेसाठी महिलांना लिलाव पद्धतीनं परवाने देण्यात येणार आहेत. याविषयी निविदाही (टेन्डर) जारी करण्यात आलीय.

सरकारी कर्मचाऱ्यांचे... कामाचे केवळ पाच दिवस?

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 10:41

नवीन वर्षात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्याचं सरकारनं पक्कं केलेलं दिसतंय. याचं कारण म्हणजे, नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याचे केवळ पाचच दिवस काम करावं लागणार आहे.

‘भाजप’च्या ‘जादू’चा राज्य हिवाळी अधिवेशनावर परिणाम?

Last Updated: Monday, December 9, 2013, 12:09

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होतंय. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात नोकरीची संधी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 16:11

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मागासवर्गी आणि खुला प्रवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवेची घोषित सात पदे असून एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 15:47

यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 08:48

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.

एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल

Last Updated: Thursday, September 5, 2013, 17:14

मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

राज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’

Last Updated: Saturday, June 29, 2013, 08:29

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.

कास्ट सर्टीफिकेट : शासनाची ३१ जुलैची डेडलाइन

Last Updated: Thursday, June 6, 2013, 10:33

कास्ट सर्टीफिकेट नसेल तर सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचे काही खरे नाही. जात प्रमाणपत्र सादर न केल्यास कारवाईचा बडगा शासन उचलणार आहे. कास्ट सर्टीफिकेट देण्यासाठी डेडलाइन ठरविण्यात आलेय. त्यासाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत अंतिम तारीख असेल.

व्यापाऱ्यांना लावणार एस्मा, सरकार आक्रमक

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:47

दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आपले दुकान बंदचे आंदोलन मागे घ्यावे लागेल अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एस्मा लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात.

वाघाचा हल्ला : कुटुंबियांना पाच लाखांची मदत

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 16:03

बिबटे किंवा वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

...आणि कोल्हापूरची चित्रनगरी पुन्हा उजळली!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 16:19

शासनाच्या पुढाकारानंतर या चित्रनगरीत पुन्हा एकदा लाईट, कॅमेरा, अॅक्शन असे शब्द कानावर पडू लागले आहेत.

कर्जमाफीचा घोटाळा

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 09:42

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!

Last Updated: Monday, March 18, 2013, 18:13

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.

स्टँप पेपर आता हद्दपार!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 18:06

स्टँप पेपर आता हद्दपार होणार आहे. याबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यानुसार एवढे दिवस व्यावहारिक कामांसाठी गरजेचा असणारा स्टँप पेपर आता कालबाह्य होणार आहे.

या पुढे फक्त `केजी स्कूल`ना परवानगी नाही

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 16:21

जागोजागी उभ्या राहात असलेल्या केजी स्कूलना आता आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी यासंदर्भात नवी घोषणा केली. यापुढे सेल्फ पायनान्स स्कूल्सना केवळ केजी पुरता परवानगी मिळाणार नाही.

'टोल'साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'झोल'!

Last Updated: Friday, July 27, 2012, 00:17

मनसेनं टोलनाक्यांवर कशा प्रकारे घोळ चालतो हे उघड केलंय, त्यामुळे आता टोलनाक्यांत काहीच झोल नाही हे सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कंबर कसली आहे. हा झोल लपवण्यासाठी त्यांनी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.

राज्य कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्ता

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 08:36

केंद्र सरकारच्या धरतीवर आता राज्य सरकारने महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आता वाढीव ७ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे कर्मचार्‍यांसाठई ही गुड न्यज आहे.