चैत्यभूमीवर लाखो आंबेडकर अनुयायी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Last Updated: Friday, December 6, 2013, 16:07

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकर अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. तर चैत्यभूमीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी चैत्यभूमी आणि इंदू मिलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळणार

Last Updated: Thursday, December 5, 2013, 21:44

६ डिसेंबरला साजरा होणा-या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी आणि परिसरात जोरदार तयारी करण्यात आलीय. या ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीन चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्याशी तैनात करण्यात आल्यात.

इंदू मिलवर उभं राहणार बाबासाहेबांचं स्मारक!

Last Updated: Monday, November 25, 2013, 23:20

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) अखेर मंजुरी दिलीय.

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर गर्दी

Last Updated: Sunday, October 13, 2013, 13:36

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याकरीता नागपूरच्या दीक्षाभूमीला भाविकांनी येण्यास सुरवात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

सिद्धार्थ हॉस्टेलची डागडुजी राष्ट्रवादी करणार

Last Updated: Friday, July 19, 2013, 20:41

वडाळ्यातल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलची दुरवस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतलीये.

EXCLUSIVE- दलित चळवळीचं केंद्र मोजतंय शेवटच्या घटका!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 22:08

वडाळ्यातल सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होत. आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटका मोजतंय. इमारत मोडकळीस आलीये, तिथलं वातावरण अस्वछ आहे. अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्यांनी या वसतिगृहातील रूम बळकावल्यात.

थीमपार्कला नाव बाळासाहेबांचं की बाबासाहेबांचं?

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 17:41

महालक्ष्मीच्या रेसकोर्सच्या जागेवरून राजकारण तापलं असतांना, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. रेसकोर्स नवी मुंबईत हलवा, त्याचा करार वाढवू नका, असं आठवले यांनी म्हटलंय.

‘चवदार’ तळ्याची चव अन् स्मारकाची रया गेली!

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 15:20

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील सरकारचं बेगडी प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून स्मारक उभारायचं आणि त्याकडे नंतर पाठ फिरवायची...

महामानवाच्या `आंबावडे` गावची ही दूरवस्था...

Last Updated: Thursday, December 6, 2012, 13:41

बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांची चढाओढ लागलीय. कोट्यवधी पददलितांचा उद्धार करणाऱ्या महामानवाचं मूळ गाव मात्र विकासांपासून कोसो दूर राहिलंय. आंबेडकरांच्या स्मारकाकडेही कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही.

द्या बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली

Last Updated: Thursday, December 6, 2012, 11:15

डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त `झी २४ तास`कडून विनम्र अभिवादन... आपणही करा वंदन महामानवाला.

आंबेडकर झाले हक्काच्या घराला पारखे!

Last Updated: Thursday, December 6, 2012, 08:35

इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा संसदेत झाली असली तरी बाबासाहेबांच्या मालकीची जमीन मात्र अजुनही केंद्र सरकाच्याच ताब्यात आहे.

भीमसैनिकांसाठी पालिकेची जोरदार तयारी

Last Updated: Thursday, December 6, 2012, 07:48

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबई महापालिकेनं जोरदार तयारी केलीय. चैत्यभूमी ते दादर चौपाटीपर्यंत विविध नागरी सुविधा पुरवल्या गेल्यात.

बाबासाहेबांचा मृत्यूविषयी केंद्र सरकार अनभिज्ञ

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 13:14

भारत सरकारकडे संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मृत्यूच्या बाबतीत काहीही माहिती नाही. थोडं आश्चर्य वाटलं का…? पण, हे खरं आहे. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला केलेल्या उत्तरात खुद्द केंद्र सरकारनंच ही कबुली दिलीय.

`विनाअर्ज घरी गेला... आता उपाशीच राहा`

Last Updated: Thursday, October 11, 2012, 10:59

अर्ज न करता घर गेला म्हणून एका विद्यार्थ्याला उपाशी ठेवण्यात आलं, ही घटना आहे वर्ध्याच्या हिंगणघाटमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहातली...

पुन्हा विद्यापीठात जाताना...

Last Updated: Monday, July 9, 2012, 19:26

संतोष गोरे
शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या... तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.

डॉ. आंबेडकरांचे कधी होणार स्मारक ?

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 22:34

आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आंदोलन सुरु केलंय...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरीत देण्यात यावी अशी आरपीआयची मागणी आहे....पण हे स्मारक कधी उभं राहणार असा प्रश्न आता आंबेडकरी जनतेकडून विचारला जात आहे.

कार्टून वादात आंबेडकरांचा संयम, आठवलेंची उडी

Last Updated: Saturday, May 12, 2012, 19:17

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्टूनचा वाद चांगलाच चिघळलाय. रामदास आठवले यांनीही या वादात उडी घेतलीय. बाबासाहेबांचे कार्टून हे अपमानकारक असल्याचं सांगत, तेव्हाच हे कार्टून नष्ट करायला हवे होते, असं त्यांनी म्हटलंय.

अंबेडकर स्मारकावरून वाद सुरूच

Last Updated: Saturday, April 14, 2012, 21:15

इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब लागत असल्याचा आरोप करत रिपब्लीकन सेनेनं आंदोलन केलं होतं. रिपब्लिकन स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचं जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला होता.

राज्यात महामानवाला अभिवादन

Last Updated: Saturday, April 14, 2012, 14:24

१२१ व्या जयंती निमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यासह देशातल्या कानाकोप-यातून दादरच्या चैत्यभूमिवर बौद्धबांधव बाबसाहेबांना मानवंदना करण्यासाठी आलेत. मुंबईतल्या चैत्यभूमीवर कालपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी होती. परिसराला यात्रेचं स्वरुप आलय. दुसरीक़डं नागपूरच्या दिक्षाभूमीवरही बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

चवदार तळे सत्याग्रह ८५ वर्ष पूर्ण

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:06

महाडचे चवदार तळे अजरामर झाले ते डॉ. बाबासाहेब यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.

आंबेडकर स्मारकासाठी RPIने रेल्वे रोखली

Last Updated: Saturday, March 17, 2012, 20:30

इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

‎'इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढा'

Last Updated: Thursday, December 22, 2011, 08:01

इंदू मिल कब्जा प्रकरणी हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत. इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

डॉ. आंबेडकर स्मृती स्मारकासाठी आंदोलन

Last Updated: Sunday, December 4, 2011, 07:16

दादरमधल्या हिंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे.