रत्नागिरीत कृषी अधिकाऱ्यांची गंडवागंडवी

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:24

रत्नागिरी जिल्ह्यात अर्जुना धरणाच्या कालव्यासाठी संपादित केलेल्या बागायती जमिनीचा मोबदला अनोखी शक्कल वापरुन लाटण्यात आला. संपादित केलेली जमीन बागायती आहे आणि त्या जमिनीत काजूची दहा ते बारा वर्षांची कलमं असल्याचा बनाव सातबारा उतारा रंगवून दाखवण्यात आलाय.

पवारांच्या मनातील पंतप्रधानपदाची इच्छा पुन्हा एकदा उघड

Last Updated: Saturday, November 23, 2013, 23:40

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिलेत.

शरद पवारांची तब्बेत बिघडली, उपचारानंतर घरी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 15:10

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दराच्याही झळा!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 17:16

गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय

खुशखबर! भाज्या स्वस्त होत आहेत…

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 08:46

बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.

भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांनीच थोपटले दंड!

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 17:24

ज्या भागात भौगोलिक परिस्थितीमुळे सिंचन प्रकल्प राबवण्यात अडचणी आहेत त्या भागात पर्यायी योजना राबवून सिंचनक्षेत्र आणि पर्यायाने शेतीविकास करण्याची शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड

Last Updated: Monday, March 25, 2013, 16:40

इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हल्लाबोल केला आहे. मनसैनिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड केली.

अर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?

Last Updated: Thursday, February 28, 2013, 16:19

यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.

'डोंगरची काळी मैना' आता वाईनच्या रुपात...

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 08:24

आंब्यानंतर आता कोकणातल्या करवंदांचे भावही वाढणार असंच दिसतंय कारण आता करवंदापासून वाईन तयार करण्याचा शोध कोकण कृषी विद्यापीठाने लावलाय.

`हापूस`पासून वाईन, कृषी विद्यापीठाची किमया

Last Updated: Monday, January 21, 2013, 14:37

कोकणचा राजा अशी हापूस आंब्याची ओळख. आपल्या मधुर चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूसवर आता प्रक्रिया होणार असून हापूस आंब्यापासून वाईन तयार होणार आहे.

विदर्भाचंही होऊ शकतं 'इस्त्राईल' – गडकरींचा दावा

Last Updated: Thursday, July 19, 2012, 11:33

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक नितीन गडकरी यांनी नुकताच ५० शेतकऱ्यांना घेऊन इस्त्रायलचा कृषी दौरा केला. त्यांनी विदर्भातही इस्त्रायलासारखी शेती होऊ शकेल, असा ठाम विश्वास विशेष चर्चासत्रात व्यक्त केलाय. 'पूर्ती’ उद्योग समूहातर्फे शेतकऱ्यांना विशेष सवलतीत सोलर पंपही दिले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलंय.

आवक घटली, भाज्या कडाडल्या...

Last Updated: Saturday, July 14, 2012, 12:20

पावसानं ओढ दिल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसांपासनं भाज्यांची आवक कमी झालेली दिसून येत आहे. भाज्यांचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढलेले दिसतात.

कष्ट अन् विज्ञानानं घडवला चमत्कार...

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 10:13

गरज ही शोधाची जननी असते त्यामुळेच बदल होतो आणि मग विकास... शेतीक्षेत्रात ही अशीच घोडदौड सुरु आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची गती वाढतेय. सांगली जिल्ह्यातही असाच एक बदल शेतकऱ्यांनी घडवून आणलाय.

बळीराजा ठरलाय नाशिक अर्थव्यवस्थेचा कणा

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 20:57

पाच हजार आठशे एक कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा करण्याचा आराखडा नाशिक जिल्ह्याने तयार केला आहे. हा आरखडा केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वांत मोठा आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्रात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील बळीराजा घेणार आहे.

दुबार पेरणीचं संकट; सरकारला उशीराचं शहाणपण

Last Updated: Friday, June 29, 2012, 10:46

राज्यात दुबार पेरणीचं संकट ओढवल्यास पर्यायी व्यवस्था तयार असल्याचं कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. कृषी मंत्र्यानी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी राज्यात २१०० ऑटो वेदर स्टेशन्स उभारणार असल्याची घोषणा केलीय.

खाऱ्यापाण्यात केली मत्स्यशेती...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 10:44

अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली.

असं उभाराल ‘मडकं सिंचन’...

Last Updated: Friday, June 22, 2012, 09:53

अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पद्धती आणि पर्यावरण विभागानं एका अतिशय साध्या आणि कमी खर्चाच्या पद्धतीतून गेल्या दहा वर्षात १०० एकरातील ३०००हून अधिक झाडांना जिवदान देत त्यांना मोठं केलंय.

महाराष्ट्राची पिछेहाट! डोक्यावर कर्जाचा बोजा

Last Updated: Friday, March 23, 2012, 13:29

कृषीप्रधान महाराष्ट्र अशी शेखी मिरवणा-या महाराष्ट्राचं वास्तवातल चित्र मात्र गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. दोन लाख २६ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेल्या महाराष्ट्राची कृषीक्षेत्रात पिछेहाट झाल्याचं वास्तव आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीत समोर आले आहे.

भारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 09:01

कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

Last Updated: Friday, January 13, 2012, 20:49

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

अगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:13

'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

शिक्षक नोकर भरतीतही आता घोटाळा

Last Updated: Sunday, January 1, 2012, 15:33

शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा हे काही नविन नाही. पण आता शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीमधील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ८३ वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन

Last Updated: Monday, December 5, 2011, 15:13

नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनासाठी स्थानिक शेतक-यांची मोठी गर्दी झालीये. भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतीत उपयोगी पडतील अशी यंत्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. भारतातील शेतीच्या कक्षा रुंदावण्यासाठी शेतक-यांना नवी दृष्टी देणार आंतरराष्ट्रीय कृषिप्रदर्शन नाशिकमध्ये भरवण्यात आलं आहे.

जरबेराची शेती फायद्याची !

Last Updated: Friday, November 25, 2011, 08:39

२००५ सालापासून पुणे जिल्ह्यातल्या तळेगांव दाभाडे इथं फुलशेती करणारे विजय पाटील या शेतकऱ्यानं उत्पादन आणि विक्रीचा मेळ साधून चांगलं उत्पादन घेतलंय. एकदा लागवड केल्यानंतर पुढे फुलांची काढणी दीड ते दोन वर्ष चालते.

युवा शेतकऱ्याचा शोध ज्वारी पॉलीश मशीन

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 14:06

वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची प्रत घसरते यावर उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील अमरजीत सावंत या युवा शेतकऱ्यानं ज्वारीची पॉलीश मशीन तयार केलीय. अशा प्रकारचं राज्यातील हे पहिलं मशीन असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय.

वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला

Last Updated: Friday, November 4, 2011, 11:28

आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा परिषदेचा वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला प्राप्त झाला. विदर्भातील कृषी विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला मोठा गौरव असल्याचं मानलं जातं.

कुलगुरुपदी डॉ. किसन लवांडे

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 05:01

डॉ. किसन लवांडे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आली आहे.

नव तंत्रज्ञानासाठी शेतकरी 'शिवारफेरी'

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

शेतक-यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहचण्याच्या दृष्टीने अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीन दिवस शिवारफेरीचं आयोजन केलं. शेतक-यांच्या समस्या सोडवण्याचाहि प्रयत्नही यावेळी विद्यापिठाने केल्याने शेतक-यांनी या शिवारफेरीला चांगला प्रतीसाद दिला.