Last Updated: Monday, December 26, 2011, 18:55
मंदार मुकुंद पुरकर
अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे वाक्य आपल्या खास स्टाईल मध्ये पॉज घेत अटलबिहारी वाजपेयींनी मुंबईत १९८४ सालच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात म्हटलं होतं. या एका वाक्याने अधिवेशनाला देशभरातून हजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे मोठं काम साध्य केलं होतं.