Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:12
मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली तरी मराठवाडा मात्र अजूनही पावसाची वाटच पाहतोय. पावसानं मारलेली दडी, पाण्याची टंचाई आणि भाज्यांच्या लागवडीत झालेली घट यामुळे भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. गेल्या महिनाभरात भाज्यांचे भाव दुप्पटी-तिप्पटीनं वाढलेत.