खात्याची करामत, जिवंत पोलीस 'मयत'

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 21:00

उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातील कारकुनांच्या करामतीमुळं जिवंत पोलिसालाच मयत दाखवण्याचा संतापजनक प्रकार घडलाय. स्वेच्छानिवृत्ती घेणा-या या पोलिसाला यामुळं मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलंय.

'विलासरावांच्या भ्रष्टाचारावर मीच का बोलावं'

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 09:17

राजकीय दबावामुळं अतिरेक्यांपेक्षा पोलिसांची जास्त दहशत असल्याची घणाघाती टीका अण्णा हजारेंनी परभणीत केली आहे. त्यामुळं पोलीस विभाग लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याची गरज असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.

एक कळशी पाणी दहा रुपयांना!

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:58

सुजलाम सुफलाम अशी ओळख असणा-या महाराष्ट्रात एक कळशी पाणी पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावं लागतंय.... ही कहाणी आहे जालन्यातली....या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं.

विधानपरिषदेसाठी आघाडीत बिघाडी होणार?

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:09

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

औरंगाबाद आगीत ३२ टपऱ्या खाक

Last Updated: Saturday, May 5, 2012, 13:05

औरंगाबादच्या मुकुंदवाडी चौकातील पीव्हीआर थिएटरजवळ मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत 32 टप-या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. आग इतकी भीषण होती की अगदी तासाभरातच या टप-या बेचिराख झाल्या.

मनु सिंघवींना फासावर लटकवा - अण्णा

Last Updated: Saturday, May 5, 2012, 08:59

महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना फासावर लटकवण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. ते बीडमध्ये बोलत होते.

राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे- अण्णा

Last Updated: Thursday, May 3, 2012, 18:03

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना, आमदारांच्या परदेश दौऱ्याला राज ठाकरें पाठोपाठ अण्णा हजारेंनीही विरोध दर्शवला आहे.परदेशदौरे करणाऱ्यांना गावबंदी करावी.

सरकार मोहीम पैसे अडवा, पैसे जिरवा- अण्णा

Last Updated: Thursday, May 3, 2012, 08:33

सक्षम लोकायुक्तांसाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या अण्णांनी दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारवर तोफ डागली आहे. पॅकेज देऊनही दुष्काळ संपत नाही असा टोला अण्णांनी हाणला आहे.

रस्ते धुतायेत पाण्याने, पिण्यासाठी पाणी नाही

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 19:46

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे, अनेकांना पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो आहे. तर लातूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याने रस्ते धुतले जात असल्याचं समोर आलं आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान दोघांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 16:17

औंरगाबादमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान एका घराचं छत कोसळल्यानं दोघा मुलांचा मृत्यू झालाय. या कारवाईदरम्यान छत कोसळल्यानं तीन मुलं अडकून राहिली होती. त्यांच्यापैकी एकालाच वाचवण्यात यश आलंय, आणि दोघांचा मृत्यू झालाय.