Last Updated: Monday, December 26, 2011, 16:53
आंदोलन कुठल्याही पक्ष, व्यक्ती विरोधात नाही. तर भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन आहे. आज भ्रष्टाचाराने देशात थैमान घातले आहे. सामान्य माणसाला जीवन जगण कठीण झाले आहे, त्यामुळे आता मुंबईतील तीन दिवसांच्या आंदोलनानंतर दिल्लीत सोनिया गांधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे स्पष्ट केले.