Last Updated: Friday, February 7, 2014, 17:17
निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.