विदर्भ सिंचन महामंडळात ३००० कोटींचा भ्रष्टाचार

Last Updated: Monday, April 2, 2012, 13:50

विदर्भ सिंचन विकास महामंडळात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानसभेत खडसेंनी हा गौप्यस्फोट केलाय

महापालिका-महावितरण...'भांडा सौख्य भरे'

Last Updated: Sunday, April 1, 2012, 21:55

अकोल्यात महावितरण आणि महापालिकेतला वाद चांगलाच रंगला आहे. वीजबिल थकवल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची बत्ती गुल केली. त्यानंतर महापालिकेनंही थकबाकीच्या कारणावरुन महावितरणचं ऑफिस सील केलं आहे.

राज्यभरात रामनवमीचा उत्साह...

Last Updated: Sunday, April 1, 2012, 11:07

रामनवमीनिमित्त राज्यभरात भाविकांचा उत्साह दिसून येतोय. शिर्डी, नाशिकसह अनेक ठिकाणी आज रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

नक्षलवाद का झाला रक्तरंजित?

Last Updated: Friday, March 30, 2012, 16:05

गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांकडून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..

लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं- बाळासाहेब

Last Updated: Thursday, March 29, 2012, 17:34

देशाकडे पुरेशी शस्त्र नाहीत असं पत्र लिहून लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं, अशा शब्दांत बाळासाहेबांनी या वादावर नाराजी व्यक्त केली.... लष्करप्रमुखांनी पत्र लिहिण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून हे सांगायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं.

विधान परिषदेत बोगस प्रश्नांची मालिका उघड

Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:16

विधान परिषदेत बोगस प्रश्नांची मालिका उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोगस प्रश्नांच्या मालिकेमागे कोणाचा हात आहे? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

बुलडाण्यातील ३८ विद्यार्थ्यांना दिलासा...

Last Updated: Thursday, March 29, 2012, 12:28

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथील मुकूल वासनिक कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या ३८ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. संस्थेच्या गलथानपणामुळे हे विद्यार्थी इंग्रजीचा पेपर देऊ शकले नव्हते.

नक्षली हल्ल्यात जास्त बळी- आबा

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 12:57

गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही माहिती नसल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये योग्य समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला.

नक्षल हल्ला : २२ संशयितांची चौकशी सुरु

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:47

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षलवाद्यांनी CRPF जवानांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झालेत. तसंच २८ जवान जखमी झालेत. या घटनेनंतर 22 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ताडोबा जंगल संकटात

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 23:11

चंद्रपूरचं ताडोबाचं जंगल संकटात सापडलंय. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्य़ांमुळे या जंगलातल्या वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७५ आगी लागल्या आहेत. या आगींमधून संशयाचा वेगळाच धूर निघतोय.