1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा

Last Updated: Monday, June 23, 2014, 18:09

1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

Last Updated: Thursday, May 15, 2014, 08:58

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

आदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 16:56

आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार, विरोधक आक्रमक

Last Updated: Sunday, February 23, 2014, 19:34

राज्याचे उद्या सोमवारपासून सुरू होणारं चार दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार असल्याची चाहूल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लागलीय. कारण विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श घोटाळा, टोल, वीज आणि एलबीटीच्या मुद्यांवरून सरकारला घेरणार असल्याची घोषणाच केलीय.

अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू, आंदोलन मागे

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:51

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.

राज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

Last Updated: Sunday, January 26, 2014, 16:09

राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालयात नोकरीची संधी

Last Updated: Saturday, January 11, 2014, 21:25

महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.

लॉटरीची लाखोंची बक्षीसं पडून... दावेदारच नाहीत!

Last Updated: Monday, November 25, 2013, 19:55

लॉटरी लागल्यामुळे रातोरात कोट्यधीश झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. पण लॉटरी लागल्यानंतर ही लाखो रुपयांची बक्षिसं घेण्याला कोणीच आलं नाही

आयुष संचालनालयात नोकरीची संधी

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 10:48

महाराष्ट्र राज्याच्या आयुष संचालनालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद येथील महाविद्यलये, रूग्णालये येथे गट-क ची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत.

उत्पादन शुल्क विभागात लिपिक – टंकलेखक पदाची भरती

Last Updated: Thursday, October 24, 2013, 08:51

महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

जनतेच्या पैशांचा चुराडा, मंत्र्यांनी विमानवर उडविले ६ कोटी

Last Updated: Saturday, October 19, 2013, 15:20

महागाई आणि करांच्या ओझ्यामुळे सामान्य जनता दबली असताना जनतेचा पैसा मात्र मंत्र्यांकडून बेपर्वाईने खर्च केला जात आहे. आपल्या आरामदायक प्रवासासाठी मंत्र्यांनी तीन वर्षांत तब्बल कोट्यवधी रुपये केवळ विमान प्रवासावर उडवले आहेत. याचा आकडा तीन वर्षांत ६ कोटी २८ लाखावर गेलाय.

एसटीत भरणार २००० चालकांची पदे

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 09:36

बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. एस.टी.त चालकांची तब्बल दोन हजार पदे भरण्यात येणार असून याबाबतची जाहिरात महिनाभरात निघणार आहे. ही भरती केवळ कोकणसाठी स्वतंत्र असणार आहे. याबाबचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

महाराष्ट्र बँकेनं कमावला ४४१ कोटींचा नफा

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 10:36

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांना हटवून प्रशासक नेमलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नफ्यात आली आहे.

राज्याचा पारा वाढला, बसतायेत चटके

Last Updated: Monday, April 29, 2013, 12:08

मोसमातल्या रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद चंद्रपुरात झालीय. चंद्रपुरात पारा ४७ पूर्णांक ६ अंशांवर गेलाय. प्रचंड उकाड्यामुळं नागरिक हैराण झालेत. शनिवारी चंद्रपूरचे तापमान ४३ अंश सेल्सियस होतं.

संजय दत्तला माफ करा- काटजू

Last Updated: Thursday, March 21, 2013, 23:38

अभिनेता संजय दत्त याला १९९२ साली झालेले बॉम्बस्फोट आणि दंगली संदर्भात अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र संजय दत्तला माफ करावे अशा आशयाचं पत्र प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी राज्यपालांना पाठवलं आहे.

`बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगी शाळांचे वर्ग मिळणार नाही`

Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:49

आत्तापर्यंत पालक आणि मुलांना कोंडीत पकडणाऱ्या खाजगी शाळांनी आता तर चक्क राज्य सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

सेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Last Updated: Sunday, December 9, 2012, 15:13

राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. नागपूर अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. दरम्यान, सरकराविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्धार शिवसेने केला आहे.

राज्यशासनाची हिवाळी अधिवेशनात कसोटी

Last Updated: Sunday, December 9, 2012, 12:36

राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सिंचनाच्या पाण्यावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित चव्हाण यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. बाबा-दादा यांना धारेवर धरण्याची व्युहरचना केली आहे. त्यासाठी सिंचन घोटाळाचा प्रश्न उचलून धरण्यात येणार आहे.

पुन्हा एकदा राज्यपाल के. शंकरनारायणनच

Last Updated: Sunday, April 29, 2012, 08:12

के. शंकरनारायणन यांची राज्यपालपदी दुसरी टर्म देण्यात आली आहे. त्यामुळे के.शंकरनारायणन राज्यपाल म्हणून कायम राहणार आहेत. केंद्राकडून त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे.

काँग्रेसने अजितदादांना कोंडीत पकडलं....

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:59

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत अर्थ संकल्प सादर करतांना घरगुती गॅसच्या दरात 5 टक्के दरवाढ प्रस्तावीत केली...मात्र त्यानंतर विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने त्या दरवाढीचा विरोध केला..अर्थमंत्र्यांनी प्रस्तावीत केलेली घरगुती गॅसची दरवाढ अन्यायकार असल्याचं काँग्रेसने म्हटलं...घरगुती गॅस दरवाढीच्या निमित्ताने काँग्रेसने अजित पवारांना कोंडीत पक़डण्याचा प्रयत्न केला...

काँग्रेसने अजितदादांना कोंडीत पकडलं....

Last Updated: Monday, March 26, 2012, 22:36

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून विरोधी पक्षांबरोबरच काँग्रेसनंही अर्थमंत्री अजित पवारांना खिंडीत गाठून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे..... दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा रोष वाढणार हे लक्षात येताच काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली....

बजेटमधील दरवाढीला काँग्रेसचा विरोध

Last Updated: Monday, March 26, 2012, 18:54

बजेटवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना लक्ष केलं असताना आता सत्ताधारी काँग्रेसचे आमदारही बजेटवर नाराजी व्यक्त करू लागलेत.... विशेषतः स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजी महागल्यानं थेट सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे काँग्रेसचे आमदार बजेटवर नाराज आहेत....

स्वयंपाकाचा गॅस ४२०!

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 10:23

केंद्राने झोडपल्यानंतर सामान्य जनतेला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातही झटका बसला हे. स्वयंपाकाचा गॅसवर ५ टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवल्याने एलपीजी गॅस ४०० रुपयांनी मिळत असेल तर यापुढे त्यासाठी २० रुपये अधिक म्हणजे ४२० रुपये द्यावे लागणार आहे.

अजितदादांनी सर्वसामान्यांना ठेवलं गॅसवर

Last Updated: Monday, March 26, 2012, 16:52

राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सन २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात एकीकडे घरगुती गॅसवर पाच टक्के कर वाढवल्याने त्याची झळ सर्वसामन्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील विभागवार विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध सामाजिक घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सूविधांसाठी तरतूदीकडे लक्ष दिलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक तूटीचा आहे. विक्रीकर संकलनात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत चार हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:28

केंद्र सरकारच्या बजेटकडून मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आहेत त्या राज्य सरकारच्या बजेटकडून... शिक्षण, उद्योग, व्यापार, शेती आणि अर्थातच सामान्यांच्या नजरा आता राज्य सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.