मुंबई एअरपोर्टवर २५ किलो सोने जप्त

Last Updated: Sunday, May 11, 2014, 20:39

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं कारवाई करत २५ किलो पेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. या सोन्याची किंमत ६ कोटी ५३ लाख ९१ हजार रुपये आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच

Last Updated: Sunday, May 4, 2014, 18:36

पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे

`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?

Last Updated: Friday, February 7, 2014, 11:12

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.

असीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू

Last Updated: Thursday, February 6, 2014, 18:43

असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

`सृष्टी राणा`चा हिरेजडीत मुकूट जप्त!

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 13:26

दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३’च्या मुकूटानं सन्मानित करण्यात आलेली भारताची सृष्टी राणा हिचा हिरेजडीत मुकूट सीमा शुल्क न चुकवल्यानं जप्त करण्यात आलेत.

शस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद

Last Updated: Monday, October 28, 2013, 11:26

पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.

चीनने सीमावादावर लवकर तोडगा काढला पाहिजे - पंतप्रधान

Last Updated: Thursday, October 24, 2013, 14:58

चीन आणि भारतादरम्यान असलेल्या सीमावादावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, असं पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. सध्या चीनच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधानांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पाककडून गोळीबार सुरूच, एक जवान शहीद तर ६ जखमी

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 10:27

पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) आरएस पुरा सेक्टरमधील भारतीय सैन्यांच्या चौकीवर पुन्हा गोळीबार केलाय. या गोळाबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला असून सहा जवान जखमी झाले आहेत. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

केरन सेक्टरमध्ये अतिरेक्यांची युद्धाची तयारी

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 12:38

भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्ताने अतिरेक्यांशी हात मिळवणी केल्याचे भारत-पाक सीमेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा सापडला आहे. पकडण्यात आलेला सर्व शस्त्रसाठा युद्धादरम्यान वापरण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तेलंगण राज्याच्या निर्मितीला तीव्र विरोध, आंध्र बंद

Last Updated: Friday, October 4, 2013, 11:54

वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी हिरवा कंदील दाखविला खरा. मात्र, त्याचे पडसाद आंध्र प्रदेशात उमटले आहेत. आज आंध्र बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यटन विकास मंत्री चिरंजीवी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

श्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात ५ पोलीस जखमी

Last Updated: Thursday, October 3, 2013, 10:17

श्रीनगर शहरातील सौरामधील अहमदनगर भागत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाल घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला.

भारताची डोकेदुखी, सीमेवर १८ आंतरराष्ट्रीय टोळया

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 12:46

आंतरराष्ट्रीय टोळ्यांमुळे भारताची झोपच उडाली आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये १८ आंतरराष्ट्रीय टोळया भारत-नेपाळ सीमेवर सक्रिय असल्याचे म्हटले आहे. लष्कर ए तोएबाचा दहशतवादी अब्दुल टुंडा आणि यासिन भटकळच्या अटकेनंतर याला पुष्टी मिळाली.

दाऊदचा सहकारी अतिरेकी अब्दुल टुंडाला अटक

Last Updated: Saturday, August 17, 2013, 11:11

भारत-नेपाळ सीमेवर दाऊदचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्दुल करीम टुंडा (७०) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटकेच्या वृत्ताला पोलिसांचा हवाला देऊन पीटीआयने दुजोरा दिलाय.

पाकच्या नापाक कारवाया सुरुच

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:17

पाकच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाक सैन्याकडून रात्रीपासून पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे.

लष्कराचे हात कारवाईसाठी खुले: अँटनी

Last Updated: Monday, August 12, 2013, 16:02

सीमारेषेवरील परिस्थितीचं गांभीर्य आता संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या लक्षात आलेलं दिसतंय. त्यामुळंच ‘योग्य वाटेल` ती कारवाई करण्यास भारतीय लष्करास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी आज स्पष्ट केलं.

पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा हल्ला

Last Updated: Saturday, August 10, 2013, 09:38

पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. मुजोर पाक सैन्यानं पुन्हा एकदा पूँछच्या खरी करमा परिसरात गोळीबार केलाय. या आठवड्यातील दुसऱ्यांदा हल्ला पाक सैन्याकडून करण्यात आलाय.

चीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त

Last Updated: Thursday, July 18, 2013, 15:41

चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.

`गोल्डमॅन`कडून खंडणी; `सेने`चा विभागप्रमुख अटकेत

Last Updated: Thursday, May 23, 2013, 16:40

भोसरीतील `गोल्डमॅन` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता फुगे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेवक सीमा फुगे यांच्याकडून ६१ लाखांची खंडणी उकळणाऱ्या खंडणीखोराला पोलिसांनी अटक केलीय

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांचं पद रद्द

Last Updated: Monday, March 11, 2013, 09:37

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांच पद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने आयुक्त श्रीकर परदेशी यांनी फुगे यांचे पद रद्द केलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन

Last Updated: Friday, February 8, 2013, 19:10

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास घडला होता.

`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

Last Updated: Thursday, January 17, 2013, 15:00

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

ना`पाक` इरादा...

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 22:23

पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाही. दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या करुन पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवलाय.

भारतीय सैन्याला दिसल्या १००हून जास्त `यूएफओ`

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 21:15

जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर भागात चीनच्या सीमेलगत असलेल्या सैनिकांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये १००हून जास्त उडत्या तबकड्या पाहिल्याचं सांगितलं आहे. लष्कर, डीआरडीओ, एनटीआरओ आणि आयटीबीपी सारख्या अनेक संस्थांनी प्रयत्न करूनही या चमकत्या तबकड्यांचं रहस्य उलगडलेलं नाही.

किरण ठाकूरांचा खेद, माफी मागण्यास नकार

Last Updated: Monday, July 30, 2012, 22:20

बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्याविरोधात कर्नाटक विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. याप्रकरणी विधिमंडळात उपस्थित राहून किरण ठाकूर यांनी खेद व्यक्त केला परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला.

शार्क माशाचे अडीच हजार दात जप्त

Last Updated: Sunday, July 29, 2012, 15:25

नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून शार्क माशाचे तब्बल २४४५ दात जप्त केलेत.

सीमेवर राजरोसपणे होतोय देहव्यापार

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 08:15

सोलापूरमध्ये एका जंगलात मुलींची विक्री सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून हा डाव हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी नऊ अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

बेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठराव

Last Updated: Thursday, July 12, 2012, 13:54

बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.

सीमावासियांच्या पाठिशी शिवसेना - ठाकरे

Last Updated: Sunday, July 8, 2012, 18:05

आज बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. सुमारे तासभर त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शेवटपर्यंत सीमावासियांच्या पाठिशी राहिली असं आश्वासन बाळासाहेबांनी सामीवासियांना दिलं.

मराठी माणसांवर अत्याचार - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:37

मराठी माणसांवर अत्याचार होत आहे. तरीही भाजप काहीही बोलत नाही. सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार कशासाठी? कर्नाटकात भाजपचेच सरकार असताना हे होतेच कसे, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपलाच विचारला आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय सैनिक शहीद

Last Updated: Thursday, June 14, 2012, 17:10

जम्मू काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यातील सीमा नियंत्रण रेषेजवळ (LOC) पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचा एक सैनिक शहीद झाला आहे. तर तर ३ सैनिक जखमी झाले आहेत.

चिमुकलीचा बलात्कार की करणीचा बळी?

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 17:12

गोव्यातील ‘केपे’ या ठिकाणी तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या झाल्याचं समोर आलंय. मुळची मुंबईची असलेली सीमा खान गोव्यात सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे आली असताना ही घटना घडलीये.

सीमाप्रश्न पेटला, सिंधुदुर्गात बसची तोडफोड

Last Updated: Sunday, May 20, 2012, 12:06

बेळगावमध्ये आज सीमावासियांचा मेळावा होतो आहे. सीमावासियांच्या या मेळाव्याला परवानगी दिल्याने कन्नडीयांनी याला विरोध केला आहे. सीमावासियांचा आजचा मेळावा उधळून लावण्याचं षडयंत्र कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आखल्याचं बोललं जातं आहे.

अभिनेत्री दिया मिर्झाला १.२५ लाखाचा दंड

Last Updated: Saturday, January 7, 2012, 14:20

अभिनेत्री दिया मिर्झा हिला सीमाशुल्क चुकविल्याप्रकरणी १.२५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शनिवार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

सीमावादावर राज ठाकरे करणार गडकरीशी चर्चा

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 06:51

बेळगाव सीमाप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची आज भेट घेण्याची शक्यता आहे. राज यांचं आज सकाळी नागपुरात आगमन झालं आहे.

सीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 11:53

पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.

राज यांचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे- उद्धव

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:05

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरेंचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे. शिवसेना सीमावासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज यांची भूमिका म्हणजे सीमावासियांची क्रूर थट्टा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सीमावासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली तेंव्हा मराठी माणसाला मान सन्मान मिळत असेल तर कर्नाटकात राहयला काय हरकत आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होते.

'डे बोर्डिंग स्कूल'चा स्तुत्य उपक्रम

Last Updated: Saturday, December 17, 2011, 11:32

कोल्हापूर-सांगलीच्या सीमेवर असलेल्या शिवराज विद्यालयाने डे बोर्डींगची सुरूवात केलीये. तिथं अ‍ॅडमिशन घेतलेली मुलं सकाळीच शाळेत येतात आणि सर्वांगिण विकास प्रक्रियेतून तयार होत संध्याकाळी घरी परततात.

इंग्लंड संसदेत भारतीय सीमा मल्होत्रा

Last Updated: Saturday, December 17, 2011, 06:57

इंग्लंडमधील पोटनिवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवार सीमा मल्होत्रा यांनी बाजी मारली.

बेळगाव महानगरपालिका बरखास्त

Last Updated: Thursday, December 15, 2011, 13:50

कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.

मुंबई अजूनही असुरक्षितच!

Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:10

२६/११ च्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनीच याची कबुली दिली आहे. मुंबईच्या सागरी सीमा पूर्णःत सुरक्षित नसल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनाईक यांनी म्हटलंय.

ज्ञान नव्हे अज्ञान पीठ

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 12:14

बेळगाव इथे सीमाप्रश्न या संवेदनशील विषयाबाबत मतप्रदर्शन करताना त्यांनी मराठी माणसं फक्त भांडणं आणि दंगा करणारी असतात, असे अकलेचे तारे डॉ.चंद्रशेखर कंबार तोडलेत. हे कमी की काय म्हणून मराठी माध्यमातून शिकायचं असेल तर महाराष्ट्रात जा असंही पांडित्य त्यांच्या मुखावाटे बाहेर पडलं.

बेळगावच्या महापौरांचा मराठी बाणा

Last Updated: Sunday, November 6, 2011, 17:45

कर्नाटक सरकारची बेळगाव महापालिकेवर वक्रदृष्टी पडली. बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेदार यांना कर्नाटक सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली. काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

बेळगाव बंदला हिंसक वळण

Last Updated: Friday, November 4, 2011, 07:23

बेळगाव बंदला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दोन वाहनांची तोडफोड केलीय. तर कोल्हापूर - बेळगाव या मार्गावर बसची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

भारत - चीन सीमेवर सैन्य करणार तैनात

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 09:55

लष्करात भरती करण्यात आलेल्या सैनिकांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी म्हटले आहे.