पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा डाळिंब बागांना फटका

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

नाशिकमध्येही वादळी-वाऱ्यासह पाऊस पडला. तर गारपिटीमुळे शहरात सर्वत्र बर्फाच्छादीत काश्मीर अवतरलं. वादळी पावसाने नाशिक शहरात अंधाराच साम्राज्य पसरलं होतं.

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 20:14

पंजाबनंतर आता वायव्य राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवनमान विस्कळित झाले आहे. छुरूमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 12:45

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत

Last Updated: Monday, September 16, 2013, 10:54

अकोल्याजवळील पारस इथं रेल्वे रुळ खचल्यानं नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळं रुळ खचलाय. त्यामुळं नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या विस्कळीत झाल्या असून एकाच रुळावरून वाहतूक सुरू आहे.

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 17:39

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, रेल्वे सुरळीत

Last Updated: Saturday, July 20, 2013, 08:58

मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय. ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.. मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वहातुकीवर अजुनतरी कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र पाऊस असाच सुरू राहील्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला याचा फटका बसू शकतो.

मुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता

Last Updated: Friday, July 12, 2013, 16:57

मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.

पावसाचा धिंगाणा, लोकल लेट तर काही रद्द

Last Updated: Friday, July 12, 2013, 15:09

मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

मुंबईत पावसाचा ५२ वर्षांचा रेकॉर्ड मोडीत

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 20:54

पहिल्याच पावसानं मुंबईला चक्काजाम करून दणका दिला असला, तरी हाच पाऊस एक गुड न्यूजही घेऊन आलाय. यंदा मुंबई महापालिकेच्या सर्व धरणांची पातळी वेळेपेक्षा आधीच चांगली झालीये. १८ जूनच्या आकडेवारीनुसार गेल्या ४ वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या लवकर मुंबईची सर्व धरणं सर्वाधिक भरलीयत.

पावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर

Last Updated: Monday, June 17, 2013, 09:31

मुंबईत सुपरसंडेला धो-धो बरसणा-या पावसाचा जोर आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालाय. सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झालीय. जोरदार पाऊस नसल्यानं लोकल सेवा सुरळीत सुरु आहे तर ट्रॅफिकही पूर्वपदावर आलंय.

पावसाने उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत

Last Updated: Monday, June 10, 2013, 10:18

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा दणका बसल्यामुळे सकाळपासूनच उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम

Last Updated: Monday, June 10, 2013, 08:23

राज्यात रविवारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. कोकणमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह बोरीवली, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 10:45

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय. रात्रिपासूनच पावसाची संततधार सुरू असल्य़ानं पश्चिम आणि पूर्व उपनगरांच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय.

विदर्भात पावसाचे २० बळी

Last Updated: Thursday, September 6, 2012, 10:43

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. पावसामुळं २० जणांचा बळी गेलाय. विदर्भातल्या बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत.

पावसामुळे मुंबई मनपाचं पितळ उघडं

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 08:13

एका दिवसाच्या धुवाँधार पावसामुळे मुंबई महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिकेकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली.

`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:35

कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.

उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, August 4, 2012, 16:56

बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.