रिलायन्सची `एक भारत एक दर` योजना

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 15:21

‘एक भारत, एक दर’ या नवीन घोषणेसहीत आणि योजनेसहीत ‘रिलायन्स कम्युनिकेशन’नं (आरकॉम) ग्राहकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय.

राज्यात काँग्रेस राबवणार `कामराज योजना`

Last Updated: Friday, May 30, 2014, 15:34

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याचे संकेत आहेत.

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार

Last Updated: Sunday, April 27, 2014, 09:12

गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.

`मुख्यमंत्री कोटा` रद्द; सरकारी मर्जीतले दुखावणार

Last Updated: Friday, March 21, 2014, 10:45

`मुख्यमंत्री कोट्यातून दिली जाणारी घरं` ही पूर्ण योजनाच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलीय. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या बाबत अनियमितता, अपारदर्शकता आणि पदाचा गैरवापर होत असल्याचा ठपका कोर्टाने ठेवलाय.

मुंबई पोलिसांची `एकटीनं प्रवास सुरक्षित प्रवास` योजना

Last Updated: Sunday, March 9, 2014, 16:39

महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई पोलिसांनी एकटय़ानं प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीनं उपयुक्त ठरेल,अशी एसएमएस सेवा सुरू केली आहे. त्यामुळं कुठल्याही रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी ९९६९७७७८८८ या क्रमांकावर एसएमएस करून त्या टॅक्सीचा क्रमांक द्यायचा. मग ते वाहन कुठं गेलं, कुठल्या दिशेनं चाललं आहे, कोणाचं आहे, अशी सर्व माहिती पोलिसांकडे जमा होईल.

CM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट

Last Updated: Friday, February 7, 2014, 17:17

निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.

लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:16

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.

नाशकात झोपी गेलेली मनसे झाली जागी

Last Updated: Thursday, January 30, 2014, 18:23

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी सत्तधारी पक्षातील मंडळी लोकाभिमुख योजना राबविण्याच्या घोषणा करताना दिसतायेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हाच ट्रेंड दिसून येतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या मनसेनं नाशिक शहाराकडे लक्ष केंद्रित केलंय. गेल्या आठ दिवसांत शहरात घोषणा आणि विकास कामांचा धडाका सुरु करून नाशिककरांच्या नाशिककरांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं भयान वास्तव

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 17:19

राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट

गूड न्यूज: राज्यात आजपासून ‘ब्लड ऑन कॉल’

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 18:15

रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण अनेकदा आवश्यक गटाचं रक्त मिळवताना बरीच धावपळ करावी लागते. आता या धावपळीतून सुटका होणार आहे. फक्त १०४ क्रमांक डायल केल्यावर मोटरसायकलवरून रुग्णापर्यंत रक्त पोहोचवणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होतेय.

काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडे तब्बल सरकारी योजनेतील अकरा सदनिका

Last Updated: Thursday, January 2, 2014, 09:47

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होतोय. पुण्यातील एका आर्थिक मागास योजना प्रकल्पात त्यांच्या नावे एक नाही, दोन नाही तर तब्बल अकरा सदनिका असल्याचे समोर आलंय. या सदनिकांचा उल्लेख त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता शिवरकर यांच्या निवडणूक शपथपत्रात देखील आहे.

चीनमध्येही मिळाली दोन अपत्यांना परवानगी!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 15:49

चीनच्या मंत्रिमंडळानं शनिवारी संमत केलेल्या प्रस्तावामुळे, आता चीनमधील ज्या जोडप्यांना केवळ एकच अपत्य आहे अशा जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी प्रदान करण्यात आलीय.

२६ लाख खर्च, पारोळा गावातील पाणी योजना शोधून दाखवा?

Last Updated: Friday, December 13, 2013, 07:55

सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.

मुंबईची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना फसली, सोमवारी निर्णय

Last Updated: Friday, December 13, 2013, 07:52

मुंबईसाठी सरकारने आणलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना किचकट नियमांमुळे फसली आहे. त्यामुळे आता नव्या नियमावलीसह नवी क्लस्टर योजना येत्या सोमवारी जाहीर केली जाणार आहे. तर ठाणे आणि पुण्यासाठीची क्लस्टर योजना येत्या महिनाभरात जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’ची आज सुरुवात

Last Updated: Thursday, November 21, 2013, 09:26

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात आज नागपुरात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेची सुरुवात करणार असून त्या निमित्तानं होणारी सोनियांची सभा यशस्वी होण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं कंबर कसलीय. तर दुसरीकडं हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

`तिसऱ्या अपत्याला जन्म द्या आणि महिना ५००० मिळवा`

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 18:23

पारसी समुदायानं आपल्या समुदायाची संख्या वाढवण्यासाठी एक धक्कादायक योजना जाहीर केलीय. या योजनेनुसार, एक पेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना मासिक भत्ता देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली

Last Updated: Friday, November 8, 2013, 19:37

यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.

काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा कलगितुरा, सिंचनावर वाद

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 20:35

यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

खूशखबर! विद्यार्थ्यांसाठीच्या ‘आकाश-४’ योजनेला मंजुरी

Last Updated: Monday, October 28, 2013, 15:25

आकाश (टॅब्लेट) -४ या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं प्रदीर्घ विचारविनिमयानंतर हिरवा कंदिल दाखविला असून या टॅब्लेटच्या उत्पादनाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मांडला जाणार असल्याचं वृत्त आज सूत्रांनी दिलंय.

‘आधार’च्या अंमलबजावणी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 10:55

देशातल्या विविध कल्याणकारी योजनांसोबत आधार कार्डवरील प्रत्येकाची विशिष्ट संख्या इतर योजनांसोबत जोडण्याविरोधात सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ही याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांचाही समावेश आहे.

‘आधार’ला आधारासाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात!

Last Updated: Friday, October 4, 2013, 19:37

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आधार कार्ड सक्तीचे नाही आणि कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नसल्यामुळे सरकारी सुविधा नाकारता येणार नाहीत, या निर्णयात सुधारणा करण्यासाठी शुक्रवारी केंद्र सरकारने याचिका दाखल केली.

‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट

Last Updated: Monday, September 30, 2013, 14:11

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.

‘ति’च्यासाठी राज्यसरकारची `मनोधैर्य योजना` मंजूर

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 15:09

बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या दुदैर्वी महिलांचं आयुष्य नव्यानं उभं करण्यासाठी राज्यसरकानं ‘मनोधैर्य योजना’ तयार केलीय. या योजनेला कॅबिनेटनं आज मंजूरी दिलीय.

`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा

Last Updated: Thursday, September 5, 2013, 09:43

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.

राज्यात ‘सुकन्या’ योजना लागू होणार?

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 12:22

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होतेय. त्यामध्ये राज्यातल्या मुलींसाठी सुकन्या योजना आणण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.

मंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 13:04

मंगळावर जाण्यासाठी आतापर्यंत १ लाख लोकांचे अर्ज आले आहेत. कोट्यावधी डॉलर खर्चून या लाल ग्रहावर राहायला जाण्यासाठी हे अर्ज आले आहेत. ‘द मार्स वन’ नावाच्या या योजनेची सुरुवात २०२२ मध्ये होणार आहे.

राज्यात डिसेंबरपासून अन्न सुरक्षा योजना

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 09:31

अन्न सुरक्षा योजना राज्यात डिसेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केलीय.

`दिवसाला २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही`

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 17:02

प्रत्येक व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च लक्षात घेता देशातल्या गरिबांची संख्या २०११-१२ मध्ये कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

फिरतं ‘एटीएम’ करणार ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती!

Last Updated: Monday, June 24, 2013, 12:09

ग्रामीण भागात अजूनही उपलब्ध नसलेली एटीएमची सुविधा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीचा गंभीर प्रश्न यांचा ताळमेळ घालत सरकारनं ग्रामीण भागात ‘मायक्रो एटीएम’ ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.

पावसाची कृपा, सरकारची अवकृपा!

Last Updated: Monday, June 3, 2013, 19:03

कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.

औरंगाबाद मनपात स्वर्ण रोजगार योजनेत कोट्यवधींचा घोटाळा?

Last Updated: Monday, May 27, 2013, 22:30

बोगस कर्जप्रकरणं मंजूर करून अपात्र लोकांना कोट्यवधींच्या कर्जाचं वाटप... कर्जप्रकरणाचे 11 वर्षातील माहितीचे रेकॉर्ड महापालिकेतून गायब

महाराष्ट्राच्या आराखड्याला योजना आयोगाची मंजुरी

Last Updated: Thursday, May 16, 2013, 23:15

महाराष्ट्राच्या 49 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला योजना आयोगाकडून मंजुरी मिळालीय. राज्यात 15 जिल्ह्यातल्या 10 हजार गावांना पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या भीषणतेला तोंड द्यावं लागतंय.

`मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 12:55

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय.

दुष्काळ निवारणासाठी सरकारच्या नव्या घोषणा

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 19:43

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2400 टँकर्सनी पाणीपुरवठा होतोय. येत्या काही काळात ही संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

योजनांसाठी आधारकार्डबाबत काही अंशी शिथिलता

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 17:06

आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.

कलमाडींसोबत काम करणार नाही; राष्ट्रवादीची भूमिका

Last Updated: Thursday, January 31, 2013, 10:29

केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं गेलं आहे. जेएनयुआरएम अंतर्गत करण्यात येणार्याश विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे.

`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!

Last Updated: Monday, January 14, 2013, 16:59

केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.

`६०० रुपयांचं रेशन ५ जणांच्या कुटुंबासाठी महिनाभरासाठी पुरेसं!`

Last Updated: Sunday, December 16, 2012, 17:36

६०० रुपयांमध्ये पाचजणांच्या कुटुंबाचं आरामात पोट भरू शकतं, असा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केला आहे. दिल्लीमधील यूपीए-२ सरकारच्या कॅश फॉर फूड योजनेच्या उद्घाटन प्रसंगी शीला दीक्षित यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गेमचेंजर... कॅश सबसिडी योजना

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 09:41

केंद्र सरकरानं कॅश सबसिडी योजना लागू करण्याची घोषणा केलीय. या क्रांतीकारी योजनेमुळं आता थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

`गृह आधार योजने`ची गोवेकरांना छाया!

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 11:51

ज्या कुटुंबांच वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतल्या महिलांना प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचं अनुदान गोवा सरकारकडून देण्यात येणार आहे.

जत तालुक्याची शासनाकडून फसवणूक

Last Updated: Monday, September 3, 2012, 10:50

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याची शासनाकडून फसवणूक करण्यात आलीय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केवळ कालव्यातून म्हैशाळ योजनेचं पाणी सोडण्याचा आणि पाणी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटा-माटात घेण्यात आला. मात्र पंधरा दिवसातच जतला सोडण्यात आलेलं हे पाणी बंद करण्यात आलंय.

योजना आयोग : ४२६ दिवसांत ८४ लाखांचा नाश्ता

Last Updated: Sunday, August 19, 2012, 13:49

गावात राहणाऱ्या एका व्यक्तीला दिवसाला २२ रुपये जगण्यासाठी पुरेसे असतात असं आपल्या अहवालात नमूद करणाऱ्या योजना आयोगानं फक्त नाश्त्यासाठी किती रुपये खर्च केले असतील? हा आकडा पाहिला तर तुम्हीही तोंडात बोट घालाल हे नक्की!

एक शहर... फक्त महिलांचं...

Last Updated: Sunday, August 12, 2012, 22:57

सौदी अरेबिया एक अशा शहर घडवणार आहे, जिथे असतील फक्त महिला... आणि याच शहरात शरिया कायद्यात राहूनच महिलांना आपलं करिअर घडवण्याची संधी इथं दिली जाणार आहे.

वाघुर पाणी घोटाळा : गुलाबराव देवकरही अडचणीत

Last Updated: Sunday, July 29, 2012, 20:51

जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणी योजना घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्यात सुरेश जैन यांच्या पाठोपाठ परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही गोत्यात आलेत. दोघांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.

विदर्भाला 500 कोटींचं अनुदान

Last Updated: Thursday, July 5, 2012, 13:26

शेवटी केंद्राला महाराष्ट्रातल्या विदर्भाची दया आलेली दिसतेय. विदर्भातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांचं अनुदान देण्यास मंजुरी दिलीय.

'सुकन्या' अडकली राजकारणात

Last Updated: Saturday, June 16, 2012, 12:54

राज्यात भ्रूणहत्येसारख्या घटना रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आणलेल्या सुकन्या योजनेला अर्थखात्याने खोडा घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या विषयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे, यासाठी अर्थखाते सांभाळणाऱ्या अजितदादांनी काँग्रेसच्या मंत्र्याने आणलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आडवल्याची चर्चा आहे.

प्रतिक्षा नाशिक - मुंबई मालवाहू ट्रेनची

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 16:01

मुंबईमध्ये भाजीपाला, फळे हा माल लवकरात लवकर आणि तेही स्वस्त दरात पोहचला जावा, यासाठी खास नाशिक – मुंबई - नाशिक अशा मालवाहू ट्रेनची योजना मध्य रेल्वे तयार करत आहे.

दुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 20:47

दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

योजनांचा विचार की गांधी घराण्याचा प्रचार?

Last Updated: Thursday, May 10, 2012, 17:55

देशातील २५ टक्क्यांहून अधिक योजनांना स्वर्गीय राजीव गांधींचंच नाव देण्यात आल्याचं माहिती नियोजन आयोगाचे राज्य मंत्री अश्वीनी कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

योजना भरमसाठ मुरबाडची लावली वाट

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 08:57

मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या १७८ योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास ९० टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केले आहेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत.

पाणी योजनेत भ्रष्टाचार, गावाचा पैसा पाण्यात

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 09:46

मोठा गाजावाजा करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी केंद्राकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र त्यातही भ्रष्टाचार बोकाळल्याचं पहायला मिळतं. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील घोडगावमध्ये जलस्वराज्य पाणी योजनेत ५१ लाखांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.

उस्मानाबादमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची आत्महत्या

Last Updated: Sunday, April 1, 2012, 14:18

उस्मानाबादमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यानं ही आत्महत्या केली आहे. रस्त्याचं रखडलेलं काम पूर्ण करण्यात यावं अशी त्याची मागणी होती.

समान पाणी प्रस्ताव योजनेतला अडथळा दूर

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 05:29

पुण्याच्या समान पाणी प्रस्ताव योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय. या योजनेसाठी चार वेळा निविदा फेटाळल्यानंतर पाचव्यांदा निविदा मंजूर करण्यात आलीय. निवडणुकीच्या तोंडावर तो ती मान्य करण्याचं शहाणपण महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना सूचलंय.