उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम राज्यपालांचे राजीनामे

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 16:04

उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल जोशी यांनी आज आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या राजीनाम्या पाठोपाठ आता कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनीही राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.

ICU मध्ये मेडिकल विद्यार्थिनीची हत्या, वार्ड बॉयला अटक

Last Updated: Saturday, May 10, 2014, 15:17

आसामच्या डिब्रूगढमधील मेडिकल कॉलेज (एएमसीएच) मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आयसीयूमध्ये हत्या करण्यात आलीय. तिथल्याच वार्ड बॉयनं ही हत्या केल्याचं कळतंय. यानंतर हॉस्पिटलच्या सर्व ज्यूनिअर डॉक्टर्सनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय.

आसामातील हिंसेने दहशत, हजारोंचे स्थलांतर

Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:56

आसाममधील हिंसा पुन्हा एकदा उफाळून आली असल्याने कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतांना दिसतंय. आसाममधील हिसेंत आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांचा हिंसाचार सुरुच, 30 ठार

Last Updated: Saturday, May 3, 2014, 10:37

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात 30 नागरिक ठार झाले आहेत. यातील 12 मृतदेह बक्सा जिल्ह्यात आढळले आहेत. या हल्ल्यानंतर क्रोक्राझार, चिरंग आणि बाक्सा या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 7 ठार

Last Updated: Friday, May 2, 2014, 13:37

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सात नागरिक ठार झालेत. कोक्राझार जिल्ह्यातील बालपाडा मध्ये हा गोळीबार करण्यात आलाय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

गोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले

Last Updated: Saturday, April 12, 2014, 19:13

गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसभा : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Last Updated: Saturday, April 12, 2014, 08:38

लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.

एकाच कुटुंबातील 301 सदस्यांनी केलं मतदान

Last Updated: Thursday, April 10, 2014, 20:10

आसामच्या तेजपूर मतदार क्षेत्रातील सुदूर गावामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील 301 सदस्यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हे सर्व मतदार एकाच कुटुंबातले असून एकाच गावातही राहतात. त्यांचे पुर्वज नेपाळहून येवून इथं स्थायिक झाले होते.

लोकसभा निवडणूक २०१४: त्रिपुरात ८४% आणि आसाममध्ये ७२.५%मतदान

Last Updated: Monday, April 7, 2014, 20:31

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवाला दमदार सुरूवात झाल्याचं म्हणता येईल.

लोकसभा निवडणूक २०१४: २ वाजेपर्यंत त्रिपुरात ६० टक्के मतदान

Last Updated: Monday, April 7, 2014, 16:10

२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात झालीय. आसाममध्ये तेजपूर, कोलियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखीमपूर या ५ जांगासाठी तर पश्चिम त्रिपुरात १ जागेसाठी मतदान होतंय. ६४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.

देवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 13:50

मांत्रिकाच्या सहाय्याने देवाला खूष करण्यासाठी एक मन सुन्न करणारी घटना आसाम राज्यात घडलेय. सहा महिन्यांच्या आपल्या बाळाचा नरबळी दिला गेलाय. या घटनेने परिसरात हादरा बसलाय. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेय.

आसाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, ७ ठार

Last Updated: Monday, November 4, 2013, 13:52

आसामच्या गोलपारा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात ७ जण ठार, तर १० जण जखमी झालेत. गारो नॅशनल लिबरेशन आर्मी या आसामी दहशतवादी संघटनेनं हा हल्ला केलाय.

देशात फाटाफुटीचे लोण, आसामात हिंसाचार

Last Updated: Saturday, August 3, 2013, 10:13

आंध्र प्रदेशपासून तेलंगणा अलग करण्याचा निर्णय झाला खरा, पण देशात आता फाटाफुटीचे लोण पसरले आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली गेलेय. वेगळा विदर्भानंतर मुंबईचे वेगळे राज्य. ईशान्य भारतात वेगळ्या बोडो राज्यासाठी हिंसाचार उफाळला. त्याचा फटका आसामसह पश्चिम बंगालला बसला आहे.

राहुल ५०० करोड देणार की माफी मागणार?

Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:58

आसाम गण परिषदेच्या युवा शाखेनं बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नुकसान भरपाई म्हणून ५०० करोड रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवलीय.

लष्करी अरेरावी; सहा जणांना चालत्या रेल्वेतून फेकलं!

Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:41

भारतीय लष्करी जवानांची अरेरावी सहा तरुणांच्या जीवावर बेतलीय. चुकून सैन्यासाठी राखीव असलेल्या रेल्वेच्या डब्यात चढलेल्या या सहा जणांना लष्करी जवानांनी धावत्या गाडीतून बाहेर फेकलं. मंगळवारी लखनौमध्ये ही घटना घडलीय.

बलात्कार करणाऱ्या काँग्रेसी नेत्याची बेदम धुलाई

Last Updated: Thursday, January 3, 2013, 17:13

आसामच्या चिरांग भागात विक्रम सिंग ब्रह्म या काँग्रेसच्या नेत्याची स्थानिकांनी बेदम धुलाई केली. या नेत्याला लोकांनी लाथा-बुक्क्यांनीच नव्हे, तर चपला, बुटांनीही मारलं. जी वस्तू हाताला लागेल, ती घेऊन या नेत्यांची लोकांनी धुलाई केली. काँग्रेस नेता मदतीसाठी ओरडत राहीला. मात्र लोक त्याला बदडतच राहीले.

आसाममध्ये पुन्हा दंगल भडकली, दोन ठार

Last Updated: Sunday, August 26, 2012, 22:57

मुस्लिम आणि बांगलादेशी घुसखोरांमुळे भडकलेल्या दंगलीचा वणवा आसाममध्ये कायम आहे. चिरंग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण हिंसाचारात २ जण ठार झाले

आसाम हिंसा : आमदार अटकेत, पुन्हा कर्फ्यु लागू

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:16

आसाम राज्यात नुकत्याच उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल राज्यातील सत्तारुढ काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ या पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आलीय.

आत्तापर्यंतचं सर्वात मोठं देशांतर्गत स्थलांतर!

Last Updated: Monday, August 20, 2012, 15:24

आसाम हिंसाचारानंतर देशभरातलं सर्वात मोठं स्थलांतर घडून आलयं. गेल्या काही दिवसांत जवळपास पाच लाख ईशान्य भारतीय नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली आहे.

आसाम हिंसाचार : बांगलादेशी घुसखोर मुख्य कारण

Last Updated: Saturday, August 18, 2012, 16:11

आसामसह ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत १८ ऑगस्टला गाजला. दोन्ही सभागृहांनी प्रश्नो्त्तराचा तास स्थगित करून या विषयावर केलेल्या चर्चेअंती, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना अफवांच्या माध्यमातून घाबरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

संसदेत उमटले आसाम हिंसाचाराचे पडसाद

Last Updated: Friday, August 17, 2012, 16:44

ईशान्येकडील भारतीय नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्याचे आज संसदेतही प़डसाद उमटले. स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं ठोस कारवाई करण्याची मागणी सुषमा स्वराज यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये शिकत असलेल्या विद्यर्थ्यांना सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी तसंच त्यांच्यासाठी ठिकाठिकाणी हेल्पलाईनही सुरू करावी अशी मागणी स्वराज यांनी केली.

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला

Last Updated: Friday, August 17, 2012, 10:03

आसाममध्ये गुरुवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. ताजी घटना ही बक्शा जिल्ह्यातील आहे. येथे बलवाई आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत.

मतांसाठी दंगलखोरांना मुभा- राज ठाकरे

Last Updated: Monday, August 13, 2012, 18:42

सीएसटी दंगलप्रकरणी राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा गृहखात्यावर हल्लाबोल केलाय. ‘मतांसाठी दंगलखोरांना पाठिशी घातलं जातंय’, असा आरोप त्यांनी यावेळी केलाय.

मालेगावात दंगलीचा प्रयत्न फसला

Last Updated: Sunday, August 12, 2012, 20:23

गेल्याच आठवड्यात आसामच्या चित्रफिती दाखवून जातीय तणाव भडकाविणाऱ्या एका तरुणाला मालेगावात ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे राज्यात दंगली घडविणे सुनियोजित होतं, हे आता स्पष्ट झालंय.

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

Last Updated: Monday, August 13, 2012, 16:02

मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं.

मुंबईत हिंसक जमावाकडून जाळपोळ,तोडफोड

Last Updated: Sunday, August 12, 2012, 06:43

आसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बर्मा येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.

मतांसाठी घुसखोरीला उत्तेजन – अडवाणी

Last Updated: Thursday, August 9, 2012, 01:26

‘आसाममधला वाद हिंदू-मुस्लिमचा असा जातीयवादी नाही तर आसाममध्ये घुसखोरीमुळेच हिंसाचार सुरु आहे. आणि मतांसाठी या घुसखोरीला उत्तेजन मिळत असल्याचा’ घणाघाती आरोप अडवाणींनी सरकारवर केलाय. संसदेचं पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते. अडवाणींच्या या आरोपांमुळे सोनिया गांधी मात्र चांगल्याच तापल्या.

आजपासून संसदेचं मान्सून अधिवेशन

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:31

राजधानीत संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. आसाम हिंसेचा प्रश्न आपण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात उठवणार असल्याचं भाजपानं आधीच स्पष्ट केलंय. आसाम हिंसेच्या प्रश्नावर भाजपाकडून स्थगन प्रस्तावाची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. चिंदबरम यांच्यासोबतच महागाई, आर्थिक संकट आणि दुष्काळ यांसारख्या प्रश्नांवरही सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय.

'आसाममधील हिंसाचाराला बांग्लादेशीच जबाबदार!'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 09:34

भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी मंगळवारी आसाममधील जातीय दंगल आणि हिंसाचारासाठी बांग्लादेशी प्रवाशांना जबाबदार धरलं आहे. आडवाणी सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत.

धुमसतं आसाम

Last Updated: Thursday, July 26, 2012, 23:34

आसाममध्ये आज जातीय दंगलीने डोकं वर काढलं असलं तरी गेल्या काही वर्षात या ना त्या कराणाने आसाम अशांत ठेवण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे आणि काही फूटीरवादी गट त्याला कारणीभूत आहेत.

आसाममध्ये दंगलीचा भडका कायम; ४१ ठार

Last Updated: Thursday, July 26, 2012, 13:43

आसाममध्ये दंगलीचं सत्र पेटलंय. आत्तापर्यंत या दंगलीत ४१ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. जवळजवळ दोन लाख लोक बेघर झालेत अनेक जण बेपत्ता आहेत, अनेक गावं आगीत भस्मसात झाली आहेत आणि हजारो जणांना आपलं घराला पारखं व्हावं लागलंय.

महिला आमदाराला मारहाण; पाच अटकेत

Last Updated: Sunday, July 1, 2012, 14:02

काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ आणि त्यांचा दुसरा पती जाकी जाकीर यांना मारहाण केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी पाच जणांना आज रविवार अटक केली.

आसाममध्ये नौका उलटून १०० मृत्युमुखी

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 10:47

आसामध्ये नौका दुर्घटनेत १०० जणांचा बळी गेल्याची घटना घडली तर १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. आसाममधील हा सर्वात मोठा अपघात आहे.

गुवाहाटी रेल्वे अपघातात २ ठार

Last Updated: Friday, February 3, 2012, 12:50

आसाममधील गुवाहटीजवळ रेल्वे अपघातात २ ठार, तर ५० जण जखमी झालेत. हा अपघात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला.