बारावीचा आतापर्यंतचा सर्वाधिक 90.3 टक्के निकाल, कोकण अव्वल!

Last Updated: Monday, June 2, 2014, 12:54

बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 90.3 टक्के एवढा बारावीचा निकाल लागलाय. यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. सर्वच विभागामध्ये मुली अव्वल आहेत. तर विभागांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय.

ऐका हो ऐका: आज ‘12 वी’चा ऑनलाईन निकाल!

Last Updated: Monday, June 2, 2014, 08:37

आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. बारावीच्या विद्यार्थांना हा निकाल ऑनलाईन बघता येईल. हा निकाल www.mahreslult.nic इन या वेबसाईटवर पाहता येईल. तर 10 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशिट देण्यात येतील.

नगरमध्ये प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 09:23

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. शाळेत गळा आवळून गावातील एका झाडाला तरुणाला लटकवल्याचा धक्कादाय प्रकार उघड झाला. या हत्या प्रकरणी तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात १२ वीच्या परीक्षांवर शिक्षकांचा बहिष्कार

Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:41

यंदा बारावीच्या परीक्षा सुरळीत होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार आहे. कारण ज्यू. कॉलेजच्या शिक्षकांनी १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला असून उद्यापासून राज्यातील ६० हजार शिक्षक परीक्षेचं कोणतही कामकाज करणार नाहीयेत. दरम्यान, ६ फेब्रुवारीपासून १२वीची प्रात्यक्षिकांची परीक्षा सुरु होणार प्राध्यापकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची भूमिका घेतली आहे.

पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 13:08

बारावीचं पुढच्या वर्षाचं म्हणजेच मार्च २०१४ चं परिक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.

बारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:30

बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.

मनसे शहराध्यक्षांची `नापासांची शाळा` नापास

Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:41

मनसे शहराध्यधामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे. पंढरपुरात मनसे शहर अध्यक्षाच्या बनवाबनवीचा फटका बारावीच्या ५० विद्यार्थ्यांना बसला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट ऑफ लक’!

Last Updated: Thursday, February 21, 2013, 09:23

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होतेय. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...

Last Updated: Monday, January 28, 2013, 15:03

मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

Last Updated: Thursday, January 17, 2013, 17:58

21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

बारावीचे निकाल लागणार ५ जूनपूर्वीच!

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 16:38

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षांचे निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दिवस आर्थिक सुधारणांचा... काय निर्णय होणार?

Last Updated: Thursday, October 4, 2012, 12:11

आज केंद्रीय कॅबिनेट बैठक होतेय. यामध्ये आर्थिक सुधारणांचे आणखी काही निर्णय अपेक्षित आहेत. विमा, कंपनी कायद्यांच्या सुधारणा विधेयकांना आज मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक

Last Updated: Monday, July 2, 2012, 21:27

बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.

सीबीएसई परीक्षेत मुंबईची बाजी

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 12:57

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेच्या चेन्नई क्षेत्रातील मुंबई विभागाचा निकाल ९५.१६ टक्के लागला. देशातील अन्य विभागांच्या तुलनेने सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातच उत्तीर्ण झाले आहेत. आर. एन. पोदार स्कूलचा चिराग आपटे (९८) हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी मुंबई विभागातून टॉपर आला.

सीबीएसई परीक्षेतही मुलीच अव्वल

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 11:37

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा बारावी - वर्ष १०१२चा निकाल नुकताच जाहीर झालाय. याही परिक्षेत मुली मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाल्या आहेत.

१२वी नंतर काय करणार?

Last Updated: Monday, May 28, 2012, 16:04

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअर कुठल्या श्रेत्रात घडवायचं हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थांसमोर असतो. विद्यार्थांच्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी बॉर्न टू विन ही संस्था फ्युचर पाठशाला हा करिअर गाईडन्स आणि व्यक्तीमत्व विकास उपक्रम राबवते.

लागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका!

Last Updated: Friday, May 25, 2012, 12:57

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपण वेळीच कमी करून त्यांनाही पुढील यशासाठी नव्या उमेदीने तयार करण्याची गरज असते. हा समतोल साधण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय मंडळ उद्यापासून हेल्पलाइन सुरू करत आहे.

दहावी-बारावी निकालाचं यंदा काही खरं नाही

Last Updated: Monday, March 12, 2012, 17:05

दहावी आणि बारावी यांच्या निकालामध्ये दरवेळेसच काहीतरी घोळ हा होतच असतो. तिच पंरपरा यावर्षी देखील कायम राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता आहे.

२२ कॉपीबहाद्दरांवर फौजदारी गुन्हे दाखल

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 13:09

औरंगाबाद जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेत कॉपीप्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २२ पैकी १७ विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगरसेविका देताहेत १२वीची परीक्षा

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 21:36

निवडणुकीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आता सोलापुरातल्या एक नगरसेविका बारावीची परीक्षा देत आहेत. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक १६ मधून त्या विजयी झाल्या आहेत. मंगळवारी त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.

आज १२ वीची परीक्षा, प्रत्येक पेपरआधी सुट्टी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 10:29

विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा निश्चित करणारी १२ वीची परीक्षा आजपासून राज्यभरात सुरु होते आहे. राज्यभरातल्या ५ हजार ८२८ परीक्षा केंद्रावर ती घेतली जाणार आहे.

दहावी, बारावी परीक्षेचे टाईमटेबल जाहीर

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:02

महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणाऱ्या १० आणि १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा एक मार्चला तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार आहे.