रत्नागिरीत कृषी अधिकाऱ्यांची गंडवागंडवी

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:24

रत्नागिरी जिल्ह्यात अर्जुना धरणाच्या कालव्यासाठी संपादित केलेल्या बागायती जमिनीचा मोबदला अनोखी शक्कल वापरुन लाटण्यात आला. संपादित केलेली जमीन बागायती आहे आणि त्या जमिनीत काजूची दहा ते बारा वर्षांची कलमं असल्याचा बनाव सातबारा उतारा रंगवून दाखवण्यात आलाय.

पाहा - कोयनेत पाण्याखाली अनोखा आविष्कार

Last Updated: Friday, January 3, 2014, 13:12

स्थापत्य अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कार सध्या कोयनेच्या पाण्याखाली अनुभवायला मिळतोय. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीच काम सध्या सुरु आहे. कोयनेच्या टीमनं दाखवलेलं धाडस तसेच कौशल्यामुळ आपल्या राज्याचं सुमारे १६०० कोटींचं संभाव्य नुकसान टळलं आहे.

आलमट्टी धरणाची उंची वाढवणार, राज्याला महापूराचा धोका?

Last Updated: Sunday, December 1, 2013, 21:39

कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:01

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

सिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!

Last Updated: Monday, October 7, 2013, 20:58

ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:12

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

पाण्यासाठी संगमनेर, निफाडच्या ग्रामस्थांचं आंदोलन!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 10:45

दारणासह गंगापूर धरण तुडूंब भरलं असून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी ओसंडून वाहत असताना गोदावरीचे डावा आणि उजवा कालवा बंद करण्यात आलेत.

जायकवाडीचं `हिरवं` पाणी पिण्यायोग्य?

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 10:39

जायकवाडी धरणातलं पाणी आता हिरवं पडलंय. हे हिरवं झालेलं हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका आहे का?

उजनी धरण १०० टक्के भरलं

Last Updated: Saturday, August 17, 2013, 22:38

सोलापूरसह पाच जिल्ह्यांना वरदायी ठरलेलं उज्जनी धरण १०० टक्के भरलंय. गेल्या सहा वर्षात हे धरण पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातच भरलंय.

पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 20:41

पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.

नको नको रे पावसा...

Last Updated: Saturday, July 20, 2013, 19:39

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून चौघांचा यांत बळी गेलाय..

मनमाडमध्ये ‘पाणी’बाणी! कडकडीत बंद

Last Updated: Thursday, February 14, 2013, 12:28

मनमाडमध्ये आज पाण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. मनमाडकरांनी पाण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारलंय. नागरिकांच्या या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठींबा दिलाय.

ड्रॅगनच्या कचाट्यात ब्रह्मपुत्रा

Last Updated: Thursday, January 31, 2013, 23:40

भारत आणि चीन यांच्यात आता पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्ह झालीयत.. आणि यावेळीही कुरापत काढलीय ती चीनने.. चीन भारताला कुठलीही कल्पना न देता ब्रम्हपुत्रा नदीवर तीन नवी धरण बाधंण्याला सुरुवात केलीय..

तिलारी धरणावरून वाढला गुंता

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 20:56

सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तिलारी या धरणाचं पाणी गोव्याला देण्यावरुन गुंता निर्माण झाला होता. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि आमदार दिपक केसरकर यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय.

कालव्यांच्या पाण्यावरून `रास्ता रोको`

Last Updated: Sunday, October 28, 2012, 12:28

अहमदनगर-मनमाड मार्गावर आज सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको केला. ‘मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही, मात्र उन्हाळी हंगामात गोदावरी कालव्यांना दोन आवर्तन मिळावी’, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

भंडारदरा धरणातून मराठवाड्याला पाणी

Last Updated: Sunday, October 21, 2012, 10:30

तहानलेल्या मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलंय. अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशानुसार धरणातून 5 हजार क्यूसेक्सनं पाणी सोडण्यात येतंय.

धरण उशाला, कोरड घशाला !

Last Updated: Friday, October 5, 2012, 00:05

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी आणि जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणण्याच्या उद्देशातून, ११ उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले.

कोयना ओव्हर फ्लो, सतर्कतेचा इशारा

Last Updated: Thursday, September 6, 2012, 08:19

राज्यात समाधानकारक पाऊस पडल्याने अनेक धरणात चांगला पाणीसाठा झाला. राज्यातील सर्वात मोठे कोयना धरण पूर्ण भरले आहे. या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून बाजूच्या गावाना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

... अन् घातक ठरली पिकनिक!

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 09:02

लोणावळ्याच्या तुंबार्ली धरणामध्ये बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांनी बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळालंय.

पवना जलाशयात ४०-५० कासवांचा मृत्यू

Last Updated: Friday, July 27, 2012, 17:56

पुण्यात पवना धरण जलाशयामध्ये तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झालाय. ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी चार दिवस घटनास्थळी फिरकला नाही.

पुण्याचं पाणी विधानसभेतही पेटलं

Last Updated: Thursday, July 19, 2012, 08:54

पुण्याचं पाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पेटलंय. पुण्याचं पाणी दौंडला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी अजित पवारांविरोधात रोष व्यक्त केला. खडकवासलामध्ये सध्या दोन टीएमसी पाणी आहे. त्यातलं अर्धा टीएमसी पाणी दौंडला सोडण्यात येणार आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे.

सुसरी धरणाला ग्रामस्थांचा विरोध

Last Updated: Monday, June 18, 2012, 13:22

सुसरी धरण विरोधी संघर्ष समितीने वसई-विरार शहर महानगपालिकवर मोर्चा काढला होता. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी सुसरी धरणाला विरोध असल्याचं सांगून घोषणाबाजी केलीय.

पाणी सोडल्याचा निषेध; 'हाय-वे' केला बंद

Last Updated: Sunday, May 27, 2012, 19:35

हजारो पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सीना-कोळेगाव धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आलं. पण, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद नॅशनल ‘हाय-वे’वर रास्ता रोको केला.

सोलापूरला पाणी देणार नाही, परांडा बंद

Last Updated: Sunday, May 27, 2012, 12:09

मुख्यमंत्र्यांनी सीना कोळेगाव धरणातील पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. पाणी सोडण्याच्या निषेधार्थ परांडा शहर बंद करण्याचं आवाहन सर्वपक्षिय नेत्यांकडून करण्यात आल आहे.

धरण्याच्या पाण्यावरून होणार राडा?

Last Updated: Thursday, May 24, 2012, 22:59

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर धरण परिसर आणि परांडा शहरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ओलिताखालच्या जमिनीवर तहानलेले शेतकरी!

Last Updated: Sunday, May 20, 2012, 16:48

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गोदावरी पाटबंधारे विभागानं सात धरणं बांधली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बारामाही कोरड्या पडलेल्या एकाच नदीवर तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन धरणं बांधण्यात आली आहेत.

'कोंडाण्या'बरोबर नागरिकही राहिले कोरडेच!

Last Updated: Friday, May 18, 2012, 13:34

प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर कोंडाणे धरण प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय पण, त्यात स्थानिक मात्र नाहक भरडले जात आहेत.

शेजारी धरण, तरी पाण्यासाठी वणवण

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:37

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.

मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार!

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:41

मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठय़ात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाला गेले आहे. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे

रायगडात कागदी धरण, खर्च १०० कोटी

Last Updated: Thursday, May 17, 2012, 09:16

रायगड जिल्ह्यातली सिंचनाच्या गौडबंगालाची एक कथा आहे... यामध्ये 100 कोटी रुपयांच्या धरणात एकही थेंब पाणी साठलेलं नाही.

कोंडाणे धरणाच्या कामावर हायकोर्टाचे ताशेरे

Last Updated: Saturday, May 12, 2012, 22:38

कोंडाणे धरणाच्या कामाबाबत उच्च न्यायालयानं सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. सरकारी खातं आणि ठेकेदारांमधील साटंलोटं यामुळे धरणाचा खर्च कोट्यवधी रुपयांनी वाढलाय. कोर्टानं सध्या कामाला स्थगिती दिलीय आणि पाच आठवड्यात प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत.

सोलापूरला धरणाचे पाणी देण्याचा निर्णय रद्द

Last Updated: Friday, May 11, 2012, 11:45

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना-कोळेगाव धरणातून सोलापूरसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा दिलेला निर्णय राज्य सरकारनं अखेर रद्द केला आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. मात्र, राज्य सरकरारच्या निर्णयाबाबत आमदार दिलीप माने यांनी नाराजी व्यक्त करून आंदोलनाबाबत चर्च ा केल्यानंतर दिशा ठरविली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

'पाणी देणार नाही, शासनाचा निर्णय अमान्य'

Last Updated: Thursday, May 10, 2012, 14:23

उस्मानाबाद जिल्हयातील सीना कोळेगाव धरणातील पाणी नदीमार्गे सोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. या निर्णयावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत धरणाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले.

शिवसेनेने अभियंत्याला पाणी दाखवलं

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 14:00

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडायला उस्मानाबादकरांनी विरोध केलाय. सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार दिलीप मानेंनी केलेल्या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी सोडण्यासाठी आलेल्या अभियंत्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले

कोयनेत यशस्वी लेक टॅपिंग

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 12:31

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार पाहायला मिळाला. केवळ आठ सेकंदात पाण्यातच्या खाली स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यात अभियंते यशस्वी झाल्याने इतिहासातील हे सोनेरी पान लिहिले गेले आहे.

कोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 11:28

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत.

कोयनेच्या पाण्याखाली घडवणार स्फोट...

Last Updated: Friday, April 20, 2012, 07:09

कोयनेच पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चवथ्या टप्प्यातील लेक ट्यापिंगची तयारी पूर्ण झाली. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

मुंबईचे चौघे मुसई धरणात बुडाले

Last Updated: Monday, April 16, 2012, 09:13

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका परिसरातील मुसई धरणात सुटी एन्जॉय करण्यासाठी गेलेले चौघे बुडाले. हे चौघे मुंबईतील भेंडीबाजारमधील राहणारे आहेत.

धरणात 'मगर' पण धरणार कोण?

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 10:21

पुण्यात खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यात सोमवारी संध्याकाळी मगर असल्याचं आढळून आलं आणि एकच गोंधळ उडाला. धरणाच्या भींतीपासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर ही मगर होती.

'डॅम 999' ऑस्कर नामांकनांच्या शर्यतीत

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 17:23

तामिळनाडूत बंदी घालण्यात आलेला वादग्रस्त सिनेमा डॅम 999 आणि त्यातील तीन गाणी 84 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाच्या शर्यतीत उतरले आहेत. डॅम 999 ची निवड सर्वश्रेष्ठ फिल्मच्या विभागातील २६५ फिल्ममध्ये करण्यात आली आहे

तमिळनाडूत 'डॅम ९९९'वर बॅन

Last Updated: Thursday, November 24, 2011, 08:12