पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

Last Updated: Thursday, March 20, 2014, 22:02

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या 6 मार्च रोजी भिवंडीत झालेल्या जाहीर सभेत, गांधीजींच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांवर आरोप केला होता.

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:01

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

आजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

Last Updated: Saturday, December 21, 2013, 19:30

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.

८० रूपयांत भिंत? मात्र, अधिकाऱ्यांनी ते शक्य केलंय!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 15:26

सरकारी अधिकारी किती निगरगट्ट असू शकतात, याचा जिवंत अनुभव वर्ध्यातील एका शेतक-याला आलाय... मुसळधार पावसामुळं या शेतक-याच्या घराची भिंतच वाहून गेली. सरकारकडून त्यासाठी नुकसान भरपाईही मिळाली... किती? ८० रूपये फक्त...

‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामा

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 12:00

अमेरिकेत झालेल्या शट डाऊनचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊन अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीबाबत रिपब्लिकन पार्टीला जबाबदार असल्याचं ओबामा म्हणाले. ज्यामुळं १० लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर जावं लागलंय.

दाभोलकरांनी कुणाचं केलं नुकसान? पोलिसांसमोर प्रश्न

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 15:23

निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.

दोघांच भांडण आणि तिस-याचं नुकसान!

Last Updated: Monday, July 29, 2013, 22:10

दोघांच भांडण आणि तिस-याचं नुकसान.... असं घडतंय नाशिकमध्ये.... रिक्षाचालक आणि आरटीओ अधिका-यांमध्ये कारवाईच्या मुद्द्यावरुन वाद सुरू आहे. या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल झाले.

विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ...

Last Updated: Sunday, July 21, 2013, 13:32

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावलीय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून यात चौघांचा बळी गेलाय तर ७५ हजार हेक्टरवरील पिकाचं या पावसामुळं नुकसान झालंय.

राहुल ५०० करोड देणार की माफी मागणार?

Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:58

आसाम गण परिषदेच्या युवा शाखेनं बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नुकसान भरपाई म्हणून ५०० करोड रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवलीय.

पुणेकरांचं ८०० कोटींचं नुकसान!

Last Updated: Monday, April 29, 2013, 17:54

पीएमपीएल एक हजार नव्या बसेस खरेदी करत आहे. मात्र त्यासाठी सीएनजीऐवजी डिझेल बसेसचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात पुणेकरांचं तब्बल ८०० कोटींचं नुकसान होणार आहे. शिवाय या व्यवहारात अनेक घोळ आहेत.

उत्तम स्वास्थ्यासाठी दररोज या गोष्टी कराच...

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 08:01

या काही सोप्या टीप्स ज्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये या गोष्टींचा समावेश करा आणि स्वस्थ राहा...

भारत बंद : नुकसान केल्यास दंड

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 14:59

एनडीएने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे., या बंद दरम्यान काही नुकसान झाल्यास बंदकर्त्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून दंडाच्या रूपाने होणाऱ्या नुकसानीची वसुली केली जाणार आहे.

सिद्धार्थ माल्ल्याला अब्रु नुकसानीची नोटीस

Last Updated: Saturday, May 19, 2012, 11:37

रॉयल बंगळुरु चॅलेंजर्सचा मालक विजय माल्ल्यांचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्या आता वादात सापडला आहे. आरोप करणाऱ्या महिलेच्या चारित्र्य़ावर संशय घेतल्याप्रकरणी त्याच्यावर अब्रु नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:34

नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग लागलीय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीनं प्रयत्न सुरू आहेत.

कारखान्याला आग, १ कोटीचे नुकसान

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 12:50

अकोला जिल्ह्यातल्या विझोरा येथील पृथ्वी पैनल या प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागून लाखोंची मालमत्ता खाक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पहाटेच्या सुमारास कारखान्यात एका स्फोटाचा आवाज आला.

संपाने केले १० हजार कोटींचे नुकसान

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 09:15

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.

सारंगी महाजन यांना ७ लाखाची नुकसानभरपाई

Last Updated: Sunday, December 25, 2011, 09:27

प्रमोद महाजन यांच्या खुनाची शिक्षा भोगत असणाऱ्या प्रवीण महाजन यांच्या पत्नी सांरगी महाजन यांना मानवी हक्क आयोगाकडून दिलासा मिळाला आहे, त्यामुळे सारंगी महाजन यांना प्रवीण महाजन यांच्या मृत्युनंतर राज्य सरकारने ७ लाखाची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश मानवी हक्क आयोगाने दिले आहेत.

नवी मुंबईत कंपनीला लागली आग

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 08:06

नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीव्हीएस या साबण बनवण्याच्या कंपनीला रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणली असली तरी आगीमुळं कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 15:20

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.