Last Updated: Wednesday, September 12, 2012, 17:58
एके काळी १०,००० चित्ते असलेल्या भारतात मात्र स्वातंत्रोत्तर काळात हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे आज देशात एकही चित्ता उरला नाही. पण खाद्य शृंखलेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा प्राणी आता देशात परत येतो आहे. नागपूरच्या एका महिलेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया देशातून आता भारतात चक्क चित्ते आयात होणार आहेत. आणि तेही कायम स्वरूपी वास्तव्याकरता.