राज्याचे अधिवेशन, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Last Updated: Sunday, June 1, 2014, 20:29

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अधिवेशन सुरु होतोय. दरम्यान त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे जनतेनं नाकारलेलं सरकार असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केलीय.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार, विरोधक आक्रमक

Last Updated: Sunday, February 23, 2014, 19:34

राज्याचे उद्या सोमवारपासून सुरू होणारं चार दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार असल्याची चाहूल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लागलीय. कारण विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श घोटाळा, टोल, वीज आणि एलबीटीच्या मुद्यांवरून सरकारला घेरणार असल्याची घोषणाच केलीय.

सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात ठाणेकरांचा 'लोच्या'

Last Updated: Thursday, December 12, 2013, 20:54

ठाण्यातील परिवहन सेवा डबघाईला आली आहे. परिवहनवर जवळपास ९० कोटींचं कर्ज आहे. पण सत्ताधारी आणि पालिका प्रशासनान याकडे कानाडोळा करतंय. तर नेते मंडळींना यावरून राजकारण सुचतंय. त्यामुळे टीएमटीची सेवा बंद पडते की काय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय.

नागपूर हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्यास सज्ज

Last Updated: Sunday, December 8, 2013, 14:06

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर इथं सुरू होतंय. या अधिवेशनात जादुटोणाविरोधी विधेयक संमत करण्याचा चंग सरकारनं बांधलाय. त्याचबरोबर आदर्श अहवाल, वीज आणि सिंचन घोटाळा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आठ तारखेला पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं नऊ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यावर निवडणुकीचे सावट असणार आहे.

राजकारणी आणि फोन टॅपिंगचं हत्यार!

Last Updated: Friday, November 22, 2013, 10:02

राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे. सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातनं पाळत ठेवत असते. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आलेत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे. फोन टॅपिंगची भिती वाटतेय.

‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’

Last Updated: Friday, August 23, 2013, 21:37

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका होतेय... राज ठाकरेंनी आबांना बांगड्या धाडण्याचंही आवाहन केलं... पण, ‘ही टीकेला उत्तर देण्याची वेळ नसून आपली कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे’ असं आबांनी राज ठाकरेंना सुनावलंय.

सीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी

Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:21

दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय

आदर्श अहवाल लटकला, विरोधक संतप्त

Last Updated: Friday, August 2, 2013, 19:52

आदर्श चौकशी आयोगाचा अहवालावरून आता राजकारण तापलं आहे. हा अहवाल पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल अशी शक्यता होती.

सिंचन मुद्यावरून विरोधकांचा ठिय्या, कामकाज तहकूब

Last Updated: Monday, July 29, 2013, 16:41

सिंचनाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतच ठिय्या मांडला.

नेमेची येतं `पावसाळी अधिवेशन`!

Last Updated: Monday, July 15, 2013, 09:27

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. `नेमेची येतो मग पावसाळा` या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर यावेळीही बहिष्कार टाकला.

सर्व विरोधकांची एक आघाडी शक्य?

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 22:44

देशात तिस-या आघाडीच्या सरकारची चर्चा रंगली असताना शिवसेना नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी सर्व विरोधकांची एक आघाडी करणं कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं सांगितलंय.

`भांडण सरकारशी; जनतेला वेठीस धरू नका'

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 13:58

मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.

रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत गदारोळ

Last Updated: Monday, May 6, 2013, 12:16

रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत विरोधकांनी गदारोळ घातला. पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केलीये.

अजित पवार रिकाम्या बाकांकडे बघून खाली बसले!

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 12:40

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत सर्वपक्षीय बहिष्कार सुरूच आहे. विरोधकांनी ‘क्लेश’ आंदोलन सुरू केले आहे. ज्यावेळी अजित पवार बोलायला उभे राहिले त्यावेळी विरोधी आमदारांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे सभागृहातील विरोधी बाके अचानकपणे रिकामी झालीत. या रिकाम्या बाकांकडे बघून अजित पवार खाली बसलेत.

चूक अजितदादांची, माफी मागावी पृथ्वीराजांनी?

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 17:12

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आतापर्यंत ४ वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

सरकार-विरोधकांचे साटेलोटे, मनसेचा गंभीर आरोप

Last Updated: Friday, December 28, 2012, 21:45

सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी एक फार्स असल्याचा आरोप मनसेनं केलाय.

बिनकामाचं विधीमंडळ अधिवेशन...

Last Updated: Friday, December 14, 2012, 17:18

नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवसही कामकाजाविना संपला.

लढण्यासाठी जन्मलो, रडण्यासाठी नाही - उद्धव

Last Updated: Friday, December 14, 2012, 15:47

‘मी लढण्यासाठी जन्माला आलो आहे, रडणार नाही... जानेवारीपासून विरोधकांचा समाचार घेऊ’ असं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. ते नागपूरात बोलत होते.

`शपथ घेतानाच विरोध करायचा होता`... अजितदादांचा पलटवार

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 08:21

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरोधकांचं टार्गेट बनले. विरोधकांना उत्तर देताना ‘शपथ घेतानाच का नाही विरोध केला’ असा प्रश्न अजितदादांनी केलाय.

कोणकोणते प्रश्न या अधिवेशनात मांडले जावेत?

Last Updated: Monday, December 10, 2012, 14:13

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात झालीय. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार आहे.

अधिवेशनाच्या मैदानावर... कोण ठरणार वरचढ?

Last Updated: Monday, December 10, 2012, 08:51

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात होतेय. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे.

अधिवेशनापूर्वी विरोधकांची काळी पत्रिका

Last Updated: Sunday, December 9, 2012, 20:35

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूरात सुरुवात होत असून या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे. तसंच विरोधकांनी सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार असून या घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांचे प्रमुख टार्गेट राहणार आहेत.

सेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Last Updated: Sunday, December 9, 2012, 15:13

राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. नागपूर अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. दरम्यान, सरकराविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्धार शिवसेने केला आहे.

‘महागाई हाय... हाय...’

Last Updated: Friday, September 14, 2012, 13:52

महाराष्ट्रातही महागाईच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. सरकारनं सामान्यांवर लादलेल्या दरवाढीचा विविध स्तरांतून निषेध होतोय.

राजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर

Last Updated: Friday, August 31, 2012, 17:36

नुकत्याच इराण दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलंय.

संसदेत... टार्गेट पंतप्रधान

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 11:26

आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेत कोळसा खाण घोटाळ्यावरून गदारोळ माजल्यानं कामकाजाला स्थगिती देण्यात आलीय.`चर्चा नको राजीनामा हवा...` असं म्हणत विरोधकांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतलाय.

पुरावा नसताना राजीनामा का?- पंतप्रधान

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:24

संसदेत आज सादर झालेल्या कॅग अहवालानं धुमाकूळ घातला. संसदेत विरोधी पक्षानं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळानंतर राज्यसभा आणि लोकसभा ही संसदेची दोन्ही सभागृह स्थगित करण्यात आलीत.

आजपासून संसदेचं मान्सून अधिवेशन

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:31

राजधानीत संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. आसाम हिंसेचा प्रश्न आपण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात उठवणार असल्याचं भाजपानं आधीच स्पष्ट केलंय. आसाम हिंसेच्या प्रश्नावर भाजपाकडून स्थगन प्रस्तावाची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. चिंदबरम यांच्यासोबतच महागाई, आर्थिक संकट आणि दुष्काळ यांसारख्या प्रश्नांवरही सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय.

लोकसभेचे कामकाज स्थगित

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 23:42

संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.

‘अग्निपरिक्षेनंतर’ सरकारला दुष्काळाचे चटके?

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 10:35

अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या आगीच्या मुद्यावर सरकारची अग्निपरीक्षा झाली. मात्र, आजपासून सरकारला दुष्काळाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

माथाडींच्या घराचा प्रश्न: विरोधकांचा गोंधळ

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 13:50

माथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

पावसाळी आधिवेशनाची सुरूवातच गोंधळाने

Last Updated: Monday, July 9, 2012, 13:34

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.

अधिवेशनातून काही निष्पन्न होईल?

Last Updated: Saturday, July 7, 2012, 22:44

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 12:45

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

विधानसभा कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 12:09

विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या कारणावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

गॅस कर : मागे घेण्यासाठी विरोधकांचा दबाव

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 15:44

गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी केली. गॅस सिलिंडरवर पाच टक्के कर लावल्यानं सरकारला २००कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

मनसेनेनं सत्तेसाठी करून दाखवलं

Last Updated: Thursday, March 22, 2012, 15:39

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मनसे किंग नसली तरी किंगमेकरच्या भूमिकेत दिसली. काल झालेल्या निवडणुकीत मनसेने पाठिंबा दिल्याने तसेच सत्तेत सहभागी होत आपणच सत्तेचं गणित बांधू शकतो हेच दाखवून दिले आहे.

उमेदवारांबरोबर फिरतात, प्रचार करतात विरोधकांचा - अजितदादा

Last Updated: Thursday, February 9, 2012, 23:34

बंडखोरी मागे घेतलेले कार्यकर्ते फिरतात पक्षाच्या उमेदवाराबरोबर आणि प्रचार करतात विरोधकांचा असा अनुभव असल्याचं अजित पवारांनीच सांगितलं आहे. खडकवासल्याच्या पराभवातून हा धडा शिकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

लोकपालवर लोकसभेत घमासान

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:45

लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.

लोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 12:13

लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभेतील गोंधळाने कोट्यवधींचा चुराडा

Last Updated: Thursday, December 1, 2011, 06:22

संसदेत होणा-या गदारोळामुळं जनतेच्या पैशाचा मोठा चुराडा होत आहे. याचे विरोधकांसह खासदारांना देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ

Last Updated: Monday, November 28, 2011, 06:00

संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.