`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार

Last Updated: Sunday, May 11, 2014, 18:27

`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:01

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

मल्लिकाने आपल्या गावात जाऊन केली शेती

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 20:41

मल्लिका शेरावत एका शुटींगच्या निमित्ताने तिच्या स्वतःच्याच गावात पोहोचली. हरयाणातल्या तिच्या या गावात शुट करताना ती चक्क तिच्या पारंपरिक वेशात पाहायला मिळालीच एवढचं नाही तर तिने चक्क शेतीची कामंही केली.

जळालेल्या फळबागांना सरकारचा ठेंगा

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 23:09

पूर्णपणे जळालेल्या फळबागांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारनं ठेंगाच दाखवल्याचं सत्य समोर आलंय. खुद्द राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांच्या बोलण्यातूनच हे सत्य उघड झालंय.

नाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान

Last Updated: Monday, February 11, 2013, 21:47

राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.

शीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!

Last Updated: Monday, January 7, 2013, 18:23

राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.

गुडबाय २०१२- पीकपाणी

Last Updated: Monday, December 24, 2012, 23:12

सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत

शेतकऱ्यांसाठी `स्मार्ट कार्ड`

Last Updated: Monday, September 3, 2012, 08:10

गोवा सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे इथल्या शेतकऱ्यांना सबसिडी आणि कर्ज वितरण करण्यास सोयीचं ठरणार आहे. तसेच सरकार दरबारी माराव्या लागणार चकराही आता कमी होणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत केलंय.

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 13:23

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना फायदा देणारं 'स्वीट कॉर्न'

Last Updated: Thursday, August 2, 2012, 10:43

सांगली जिल्ह्यतल्या मिरज पुर्व आरग गावातील बाबासो पाटील या शेतक-यानं दुष्काळावर मात करीत स्वीटकॉर्नची लागवड केली. हे पीक अवघे तीन महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न देतं आणि जनावरांसाठी वैरण ही भरपूर तयार होते.

कोकणातला शेतकरी म्हणतोय, 'साथी हाथ बढाना...'

Last Updated: Thursday, July 26, 2012, 10:32

संगमेश्वरमधील संगद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. सुमारे ४०० शेतकरी या एकीच्या बळावर जमीन कसताना दिसतात.

खाऱ्यापाण्यात केली मत्स्यशेती...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 10:44

अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली.

जैतापुरात शिवसेना करणार अनोखं आंदोलन

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 08:08

जैतापूर प्रकल्पाचा विषय गेल्या काही दिवसांपासून थंड असतानाच ऐन पावसात शिवसेनेच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांनी आज अनोखं आंदोलन जाहीर केलंय. प्रकल्पस्थळी घुसून सामुदायिक शेती आंदोलन करण्यात येणार आहे.

भाकीत : ९९ टक्के पाऊस, पीकपाणीही चांगले

Last Updated: Friday, April 27, 2012, 08:50

देशात यंदा सर्वसाधारण सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची. पर्जन्यवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान संस्थेच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांनी वर्तविल्याची माहिती विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी गुरूवारीयेथे दिली.

पाणी आहे, मात्र शेतीसाठी अजिबात नाही

Last Updated: Monday, April 23, 2012, 09:32

पाण्याच्या टंचाईमुळे राज्यात दुष्काळ असला तरी धुळे जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असूनही टंचाई आहे. तापी नदीपात्रात मुबलक साठा असूनही शेतीला पाणी मिळत नाही ते केवळ योग्य सिंचन व्यवस्थेअभावी. पाणी असून ते मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

कोल्हापूरमध्येही अफूची शेती

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:30

कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यात सापडलेल्या अफू शेती प्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शाहूवाडीतल्या शिवारे गावातील शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या अफूच्या झाडांची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

इस्रायलमध्ये...दुध..दुध.. है वंडरफुल्ल!

Last Updated: Monday, March 19, 2012, 22:03

विक्रम काजळे
जगात दूध उत्पादनामध्ये इस्त्रायल देश अग्रेसर आहे तर दूध उत्पादनातील आधुनिक यंत्रणेच्या संशोधनात अफिमिल्क ही संस्था अग्रेसर आहे. या संस्थेतील इलिपिलीस या शेतकऱ्याने १९७६मध्ये मिल्क मिटरची निर्मिती करुन सर्वांना चकित केलं.

अफू शेतीची चौकशी - पोलीस महानिरीक्षक

Last Updated: Thursday, March 1, 2012, 13:13

सांगली जिल्ह्यातील अफू लागवडीची पोलीस चौकशी होणार आहे. कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी ही माहिती दिली.

राज्यात शेतीची नशा

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 18:02

सुरेंद्र गांगण
बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 18:27

सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.

अफूच्या शेतीच्या चौकशीचे आदेश

Last Updated: Saturday, February 25, 2012, 16:15

बीड जिल्ह्यातल्या अफूच्या शेतीप्रकरणात महसूल अधिका-यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खोटी शेती दाखवून अफूची शेती का केली, याची चौकशीनंतर बाब उघड होणार असल्याने कृषी अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.

इस्राइलने 'करून दाखवलं', आता भारत करणार!

Last Updated: Monday, February 27, 2012, 12:38

भारतसोडून जवळपास सर्व जगाने नाकारलेला देश म्हणजे इस्त्राईल. खरं तर हाकललेल्या मूठभर माणसांनी दिशा देऊन घडवलेल्या देश म्हणजे इस्त्राईल. निसर्गाशी फारशी कृपा नसलेला भुपद्रेश म्हणजे इस्त्राईल. मात्र इस्त्रायलची प्रगतीही सर्वांनाच थक्क करणारी आहे.

भारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 09:01

कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

Last Updated: Friday, January 13, 2012, 20:49

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

थंडीची लाट, फळांची वाट!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:11

आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

अगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:13

'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

बोगस बियाण्याचा लागवडीला फटका

Last Updated: Friday, December 23, 2011, 13:18

ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदाच्या मोसमात भात शेतीच्या पेरणीसाठी N.R.9 या नवीन जातीच्या महागड्या वाणाची लागवड केली होती.मात्र भाताचे लोम्बच न आल्याने शेतक-यांच मोठं नुकसान झालंय. या बोगस बियाण्यामुळे 325 हेक्टरवरील लागवडीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत.

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:36

आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

जरबेराची शेती फायद्याची !

Last Updated: Friday, November 25, 2011, 08:39

२००५ सालापासून पुणे जिल्ह्यातल्या तळेगांव दाभाडे इथं फुलशेती करणारे विजय पाटील या शेतकऱ्यानं उत्पादन आणि विक्रीचा मेळ साधून चांगलं उत्पादन घेतलंय. एकदा लागवड केल्यानंतर पुढे फुलांची काढणी दीड ते दोन वर्ष चालते.

युवा शेतकऱ्याचा शोध ज्वारी पॉलीश मशीन

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 14:06

वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची प्रत घसरते यावर उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील अमरजीत सावंत या युवा शेतकऱ्यानं ज्वारीची पॉलीश मशीन तयार केलीय. अशा प्रकारचं राज्यातील हे पहिलं मशीन असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय.

गुळाच्या सौद्याने झाली दिवाळी 'गोड'

Last Updated: Thursday, October 27, 2011, 07:05

कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. गुळाला सहा हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. कोल्हापूरातल्या शाहू मार्केट यार्डमध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुळाचे सौदे करण्यात आले

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 15:20

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.