21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 09:08

21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती

५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 19:12

पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.

पवईत ५४ हजारात घराची अफवा कायम

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:10

पवईमध्ये 54 हजारांत घर मिळणार या अफवेनं मंत्रालयात आज तिसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.

मंत्रालयातल्या आगीत नेमक्या किती फाईल्स जळाल्या?

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 14:47

नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे चिंतेत टाकलंय. २१ जून २०१३ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगित मंत्रालयातील अनेक महत्वाच्या फाईली जळून खाक झाल्या होत्या.

पनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:24

राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.

वर्षभरापूर्वी मंत्रालयाला आग, शासनालाही अजूनही नाही जाग!

Last Updated: Friday, June 21, 2013, 08:33

मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मात्र एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे. मंत्रालयातील घडी पूर्णपणे बसवण्यात एका वर्षानंतरही शासनाला यश आलेलं नाही.

मंत्रालयात टेलिफोन ऑपरेटर पदासाठी भरती

Last Updated: Saturday, March 23, 2013, 12:19

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात दूरध्वनी चालक (Telephone Operator) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मी पोलिसाला मारले नाही- राम कदम

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 20:34

मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.

का मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 17:50

आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.

आमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 16:49

विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.

विधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:53

आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे.

मंत्रालयाचं नुतनीकरण... १३८ कोटींचं कंत्राट

Last Updated: Thursday, November 22, 2012, 19:28

मंत्रालयाचं रुपडं लवकरचं पालटणार आहे. मंत्रालयाचं काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

उद्धव ठाकरेंना सुनील तटकरेंचा टोला

Last Updated: Friday, October 5, 2012, 16:59

अजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.

सरकारने मंत्रालयाला आग लावली - खडसे

Last Updated: Monday, July 9, 2012, 22:05

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.

पावसाळी आधिवेशनाची सुरूवातच गोंधळाने

Last Updated: Monday, July 9, 2012, 13:34

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.

पंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव

Last Updated: Saturday, June 30, 2012, 10:55

मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

मिनीमंत्रालयातील धक्कादायक वास्तव

Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:54

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय.. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आले आहे. नागपुरातील मिनीमंत्रालय समजल्या जाणा-या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.

आपण काहीच शिकणार नाही ?

Last Updated: Thursday, June 28, 2012, 11:11

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आलंय. नागपुरातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.

मंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 16:04

भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

मंत्रालयाचं काही खरं नाही....

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 22:30

मंत्रालयाला लागलेल्या आगीत सुमारे 5 लाख 86 हजार फाईल्स आणि साडे सोळा लाख इतर दस्तावेज जळाल्यात. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि गोपनिय फाईल्स तसंच इतर दस्ताऐवजांचा समावेश आहे.

मंत्रालयात नागरिकांना बंदी, कारभार सुरू

Last Updated: Monday, June 25, 2012, 14:30

मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली.

मंत्रालयाचा आजपासून कारभार सुरू

Last Updated: Monday, June 25, 2012, 09:00

मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर पाच दिवसांनंतर मंत्रालयातील कामकाज आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा गजबजणार आहे. अग्नितांडवानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयाच्या उभारणीसाठी अहोरात्र झटली आहे. आज सोमवारपासून तळमजला अधिक तीन मजल्यांवर कामकाज होत आहे.

मोरे कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

Last Updated: Sunday, June 24, 2012, 19:31

मंत्रालयात लागलेल्या आगीत मुख्यमंत्र्यांचे जमादार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोघांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केलं.

सीबीआयला सुगावा लागणार?

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:37

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.

‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:15

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:57

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:17

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:27

राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन

Last Updated: Friday, June 22, 2012, 14:36

ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.

अजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!

Last Updated: Friday, June 22, 2012, 10:37

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.

मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

Last Updated: Friday, June 22, 2012, 11:55

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, June 21, 2012, 22:56

मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मंत्रालयाचा विमाच नाही!

Last Updated: Friday, June 22, 2012, 07:22

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:38

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

EXCLUSIVE - मंत्रालयात आगीचे तांडव....

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:46

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

धुराचाही येतोय वास...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 17:02

मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र सराकारचं मुख्यालय आगीच्या आज एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे कशी लागली हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न...

मंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!

Last Updated: Monday, May 7, 2012, 19:23

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय