साहित्य संमेलन: उद्घाटनातली चूक समारोपात सुधारली

Last Updated: Sunday, January 5, 2014, 22:52

८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सासवडमध्ये पार पाडला. उद्धघाटनाच्या कार्यक्रमात झालेली चूक समारोपाच्या कार्यक्रमात आयोजकांनी सुधारली.

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ

Last Updated: Saturday, January 4, 2014, 08:11

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...

मराठी साहित्य संमेलन, नव्या वादाची ठिणगी

Last Updated: Friday, January 3, 2014, 15:19

सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.

८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

Last Updated: Friday, January 3, 2014, 14:58

सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सासवड सज्ज होतंय. यानिमित्तान सासवडचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे.

मराठी संदर्भांना ‘अपडेट’चं वावडं!

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 15:45

मराठी भाषेत मोठ मोठे संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. त्यात मराठी विश्वकोश, मराठ्यांचा इतिहास, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, मराठी नियतकालिकांचा इतिहास, प्रदक्षिणा अशी एक ना अनेक पुस्तकं आहेत.

`महानामा` तून नामदेवांच्या कार्यावर प्रकाशझोत - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 12:40

महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.

संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे

Last Updated: Monday, January 14, 2013, 11:32

यंदाच्या साहित्य संमेलनात वेगळे प्रयोग केले गेले. विदेशी लेखकांना आणलं, मुलांसाठी कार्यक्रम आणि नवोदितांना जास्त संधी दिली, असा दावा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केला.

साहित्य संमेलनात `मराठी` समृद्धीसाठी ठराव

Last Updated: Sunday, January 13, 2013, 23:34

८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. या संमेलनात जवळपास सात ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषा आणि मराठी शाळा संर्वधनासाठी प्रयत्न करावेत. तर बेळगाव सीमा प्रश्न आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपाय-योजना करण्याचे सूचविण्यात आलेय.

साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 13:05

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.

संमेलनाचा समारोप : मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्याची पाठ

Last Updated: Sunday, January 13, 2013, 21:18

चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.

.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे

Last Updated: Sunday, January 13, 2013, 16:32

सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

साहित्य संमेलन वाद? `झी २४ तास`चं गाऱ्हाण, व्हय महाराजा...

Last Updated: Friday, January 11, 2013, 16:32

साहित्य संमेलन आणि वाद असं राज्यात एक समीकरणच तयार झालं आहे. तरुण साहित्यापासून आणि संमेलनापासून दूर होताना दिसतायेत.

‘झी २४ तास’ साहित्य जागर

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 20:41

साहित्य संमेलनात ज्या लेखकांना स्थान नाही पण तुमच्या लेखी ते खूप छान लेखक आहेत. अशा काही लेखकांची नावे आम्हांला कळवा.

साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 06:54

चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत संमेलनावर सव्वाकोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयोजक प्रकाश देशपांडे यांनी दिलीय.

संमेलन : ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की

Last Updated: Monday, January 7, 2013, 10:38

चिपळूण इथं होणा-या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण अजूनही संपत नाहीय. आता तर साहित्य संमेलनाची ओळख असलेली ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की संमेलन आयोजकांवर आलीय.

संमेलन व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव

Last Updated: Monday, January 7, 2013, 09:12

चिपळुणातील साहित्य संमेलनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. लेखिका पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला काल विरोध केला होता. तर शिवसेनेनं कोण या साहित्यिक पुष्पा भावे असा प्रश्न विचारलाय. मात्र, या वादावर पडदा टाकत संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरे ठाकरे यांचेच नाव असेल असे स्पष्ट केलं.

साहित्य संमेलनावरून राजकारण्यांचा तमाशा

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 22:06

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

`विश्व साहित्य संमेलनासाठी दिलेला निधी परत करा`

Last Updated: Friday, November 30, 2012, 13:50

टोरांटो आणि कॅनडामध्ये आयोजित केलेल्या `विश्व मराठी साहित्य संमेलना`च्या आयोजनासंबंधी विविध वाद सुरू असतानाच आता राज्य सरकारनं या संमेलनांकरता देऊ केलेला निधी परत मागितल्यानं आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

कोकण साहित्य संमेलनात वाद नाही - कोतापल्ले

Last Updated: Sunday, November 25, 2012, 16:14

कोकणात चिपळूण इथं होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कोणताही वाद अथवा राजकीय हस्तक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलाय

साहित्य संमेलन : स्वागताध्यक्ष पदावरून वाद

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 16:50

८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लागलेलं ग्रहण सुटण्याची काही चिन्ह दिसत नाहीएत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी तटकरेंच्या नावाचं समर्थन केलंय.

साहित्य संमेलनाचा सावळा गोंधळ

Last Updated: Saturday, August 25, 2012, 21:50

टोरंटोमधील विश्व साहित्य संमेलनावरुन अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळतोय. समन्वयाची बोंब आणि नियोजनाचा अभाव यामुळे हे साहित्य संमेलन होणार की नाही, याचा संभ्रम अजूनही कायम आहे.. विमानांची तिकीटे मिळाली नसल्याने, साहित्य महामंडळाकडून संमेलनाला कुणीही जाणार नाही, असं साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी स्पष्ट केलंय.

विश्व मराठी साहित्य संमेलन होणार

Last Updated: Saturday, August 25, 2012, 08:27

टोरांटो येथे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणारे चौथे विश्व मराठी साहित्य समेलन अखेर रद्द झाल्याचे वृत्त येताच या संमेलनाचे आयोजक यांनी हे संमेलन होणार असल्याचे म्हटले आहे. निमंत्रक लीना देवधरे यांनी याबाबत झी २४ तासशी बोलतना म्हटले आहे, हे संमेलन होणारच आहे.

साहित्य संमेलनाचा मुहूर्त ११ जानेवारीला

Last Updated: Monday, July 16, 2012, 09:52

८६वं अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणमध्ये होणार आहे. ११,१२ आणि १३ जानेवारीला संमेलन होणार आहे. पुण्यात साहित्य मंहामंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

कर्णिक म्हणजे कोमसाप नव्हे - बागवे

Last Updated: Friday, July 13, 2012, 12:12

साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीला आता वादाचे रंग चढू लागलेत. साहित्य संमेलन आयोजनाबाबत विश्वासात न घेतल्यानं मधू मंगेश कर्णिक यांनी नाराजी व्यक्त होती. यानंतर संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक बागवेंनी कर्णिकांना डिवचलंय.

२२ वर्षाने साहित्य संमेलन भरणार कोकणात

Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:28

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१३ मध्ये चिपळूणला होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ८६ व्या अ भा. मराठी साहित्य संमेलनासाठी कराड, यवतमाळ आणि चिपळूण या तीन ठिकणाहून निमंत्रण आली होती.

चंद्रपुरात ग्रंथ प्रसाराचा जागर

Last Updated: Monday, February 6, 2012, 13:26

चंद्रपुरातल्या 85 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात विक्रमी पुस्तक विक्री झाली. संमेलनात तब्बल तीन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मराठी साहित्य संमेलनाचं आज उदघाटन

Last Updated: Friday, February 3, 2012, 12:17

महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव आणि चंद्रपूर शहराची पंचशताब्दी या पार्श्वभूमीवर ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन आज होतंय.

विश्व साहित्य संमेलनं घटनाबाह्य?

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 15:41

आतापर्यंत झालेली तिन्ही विश्व साहित्य संमेलनं घटनाबाह्य असल्याचं स्पष्ट झालय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी आवश्यक ती घटनादुरूस्ती अद्यापही केलेली नाही. त्यामुळे ही संमेलनं घटनाबाह्य असल्याचं स्पष्ट झाल आहे.