शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

Last Updated: Monday, June 23, 2014, 14:18

अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 21:22

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे उकाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 17:49

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.

वळविलेल्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार

Last Updated: Monday, May 5, 2014, 12:23

अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या आता कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार आहेत. पहाटे 4.20 वाजता नागोठणे येथील अपघातग्रस्त दिवा-सावंतवाडी गाडीचे डबे हटविण्यात यश आले. त्यानंतर कोकण रेल्वेची सेवा सुरु झाली आहे.

मालगाडी घसल्याने कोकण रेल्वे विस्कळीत, 6 ट्रेन लेट

Last Updated: Friday, April 11, 2014, 16:06

कोकण रेल्वे मार्गावर आडवली आणि निवसर रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडी पटरीवरून घसरल्याने रेल्वे सेवा एक ते दोन तास ठप्प होती. याचा फटका सहा गाड्यांना बसला. त्यामुळे रेल्वे एक ते दोन तास उशिराने धावत आहेत.

कोकण रेल्वेचा प्रवास आता कूल कूल

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 10:27

कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी आणि उन्हाळा यापासून सुटका होण्यासाठी आता कोकण रेल्वेने जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एसी डबे जोडण्यात येणार आहेत. दादर-मडगाव-दादर जनशताब्दीला तीन तर दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणीला दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेनच्या एसी कोचमधून पडदे काढणार

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 15:40

रेल्वेनं सुरक्षेचं कारण पुढे करत सर्व रेल्वेगाड्यांच्या थ्री टायर (थर्ड एसी) डब्ब्यांमधून पडदे काढण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, या डब्ब्यांमधील खिडक्यांचे पडदे मात्र कायम राहतील.

उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जादा गाड्या

Last Updated: Saturday, March 29, 2014, 16:56

उन्हाळी सुट्टया लागल्या की, चाकरमानी आणि पर्यटक यांची गर्दी कोकणाकडे वळते. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता मध्य रेल्वेने दादर ते सावंतवाडी अशा एकूण ५२ विशेष गाड्या सोडणार येत असल्याचे सांगितलंय. तसेच या विशेष गाड्या आठवड्यात तीन वेळेस धावतील.

अर्थसंकल्प २०१४ : नव्या रेल्वे गाड्यांची यादी

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 16:23

रेल्वेचं बजेट २०१४ सादर करण्यात आलंय. यामध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेभाड्याच्या समीक्षेसाठी नवी समिती बनवण्यात आलीय.

दिल्लीमध्ये रामलीला रिलीज करण्यास नकार

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 16:17

निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळीचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण आहेत. परंतु दिल्लीमधील एका न्यायालयाने हा सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे.

रेल्वेमंत्री आज मुंबईत, मुंबईकरांना काय मिळणार?

Last Updated: Sunday, October 27, 2013, 12:00

रेल्वेमंत्री मलिल्कार्जुन खरगे आज एक दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तब्बल ३ नवीन लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा शुभारंभ, नवीन लोकलचे उद्घाटन, रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी मोहिम असे अनेक जंगी कार्यक्रम आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी स्पेशल 'एसी सुपरफास्ट'

Last Updated: Saturday, September 28, 2013, 10:41

दिवाळीला गावाला जाण्यासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद आणि मंगलोर (साप्ताहिक) दरम्यान एसी सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-रोहा स्पेशल गाडी

Last Updated: Saturday, September 21, 2013, 14:55

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दीपासून सुटका होण्यासाठी सुरू करण्यात आलेली स्पेशल गाडी दि. २२ सप्टेंबर पर्यंत चालवण्यात येत आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान ही गाडी धावणार आहे. गर्दीमुळे ही गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई आणि उपनगरात पाऊस, पश्चिम- मध्य रेल्वे उशिरा

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:13

मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह रात्रभर पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्यांना जादा डबे

Last Updated: Saturday, September 7, 2013, 07:21

गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेच्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वेटींगवर असणाऱ्यांना किमान प्रवास करणे शक्य होणार आहे.

कोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे, एसटी

Last Updated: Thursday, August 29, 2013, 12:11

गणेशोत्सवात कोकणमध्ये जाण्यासाठी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने कोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे सोडल्या आहेत. तसेच मुंबईबाहेर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी सहा जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ १८०० जादा बसेस सोडणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

Last Updated: Thursday, August 1, 2013, 12:33

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवानिमित्ताने आणखी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. बांद्रा-मडगाव-बांद्रा आणि अहमदाबाद-मडगाव-अहमदाबाद या दोन गाड्या दि. २ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील.

गणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 14:01

कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.

कोयना, वारणा परिसरातील गावांना धोका

Last Updated: Friday, July 26, 2013, 09:05

राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.

मुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता

Last Updated: Friday, July 12, 2013, 16:57

मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.

पावसाचा धिंगाणा, लोकल लेट तर काही रद्द

Last Updated: Friday, July 12, 2013, 15:09

मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

राज्यात संततधार, कोकण-कोल्हापुरात पूर

Last Updated: Friday, July 12, 2013, 11:45

राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मुंबईसह राज्यात संततधार, रेल्वेवर परिणाम

Last Updated: Friday, July 12, 2013, 11:42

मुंबईसह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या सुटण्यास १५ मिनिटे उशीर होत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय. तर राज्यात कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय.

उत्तराखंड : बचावकार्याला पावसानं घातला खोडा!

Last Updated: Sunday, June 23, 2013, 13:33

उत्तराखंडच्या गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी आणि फाटा या भागाला पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी विळखा घातलाय. त्यामुळे बचावकार्य थांबवावं लागलंय.

महाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप

Last Updated: Saturday, June 22, 2013, 22:53

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

अरे बापरे, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated: Saturday, June 22, 2013, 19:16

उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.

पुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत

Last Updated: Thursday, June 20, 2013, 18:32

उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.

गंगेचा प्रकोप, हजारोंचा जीव मुठीत

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 19:21

उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.

पावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर

Last Updated: Monday, June 17, 2013, 09:31

मुंबईत सुपरसंडेला धो-धो बरसणा-या पावसाचा जोर आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालाय. सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झालीय. जोरदार पाऊस नसल्यानं लोकल सेवा सुरळीत सुरु आहे तर ट्रॅफिकही पूर्वपदावर आलंय.

पावसाने मुंबई जलमय, रेल्वेसेवा कोडमडली

Last Updated: Sunday, June 16, 2013, 14:09

मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालीय. एलफिस्टन, परळ, दादर, हिंदमाता या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झालीय. परळमध्ये घरं आणि दुकानातही पाणी शिरले असून या पावसानं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजावरा उडालाय.

पावसाने उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत

Last Updated: Monday, June 10, 2013, 10:18

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा दणका बसल्यामुळे सकाळपासूनच उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम

Last Updated: Monday, June 10, 2013, 08:23

राज्यात रविवारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. कोकणमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह बोरीवली, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.

स्पीड @ 500 kmpl

Last Updated: Thursday, June 6, 2013, 23:44

जगातील सर्वात फास्ट ट्रेन ! बंदुकीच्या गोळीपेक्षाही वेगवान ! कशी आहे ही बुलेट ट्रेन ?

वैष्णो देवी यात्रेला जाणं आता आणखी सोप्पं!

Last Updated: Monday, June 3, 2013, 15:58

वैष्णो देवी मंदिराच्या यात्रेला जाणं आता भाविकांसाठी अधिक सोपं होणार आहे. कारण वैष्णो देवीच्या गुंफा मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या कटरा शिबिरापर्यंत जुलै महिन्यापासून अनेक मेल्स, एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन्स सुरू होत आहेत.

बन्सल यांच्या राजीनाम्याचा मुंबईकरांना फटका!

Last Updated: Monday, May 13, 2013, 17:39

बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णवेळ मंत्रीच नाही. त्यातच महत्त्वाची पदं रिक्त आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रियाच ठप्प झाली आहे. या सगळ्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.

६७ नव्या एक्सप्रेस - २७ नव्या पॅसेंजर ट्रेनची घोषणा

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 14:33

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्प २०१३-१४मध्ये ६७ नवी एक्सप्रेस आणि २७ नव्या पॅसेंजर ट्रेनची घोषणा केलीय.

रेल्वे प्रवास पुन्हा महागला

Last Updated: Sunday, January 27, 2013, 22:43

देशातील लांब पल्ल्यांच्या गाडांच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची माहिती मिळतेय. राजधानी, दूरान्तो आणि शताब्दी या प्रमुख गाड्यांच्या तिकिट दरात 15 ते 20 रुपायांनी वाढ होणार आहे.

लोकलच्या गर्दीने घेतला ३ जणांचा बळी

Last Updated: Monday, December 31, 2012, 21:17

लोकलच्या गर्दीने तिघांचा बळी घेतलाय. लोकलमधून पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी-घाटकोपर दरम्यान घडली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:35

कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.

उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, August 4, 2012, 16:56

बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.

मान्सूनची पुन्हा प्रतिक्षा

Last Updated: Monday, July 16, 2012, 13:25

पावसाची प्रतिक्षा करणा-या राज्यातील जनतेला पुढील पाच दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

भाकीत : ९९ टक्के पाऊस, पीकपाणीही चांगले

Last Updated: Friday, April 27, 2012, 08:50

देशात यंदा सर्वसाधारण सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची. पर्जन्यवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान संस्थेच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांनी वर्तविल्याची माहिती विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी गुरूवारीयेथे दिली.

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:20

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

प. रेल्वेचा वाढला वेग, फेऱ्याही वाढणार का?

Last Updated: Thursday, March 8, 2012, 08:35

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पुर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे. तेव्हा गर्दीच्या वेळी दोन लोकल गाड्यांमधील वेळ ही तीन मिनीटांपेक्षा कमी करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर चर्चगेट ते अंधेरी असा डीसी ते एसी विद्यूत परिवर्तनाचा शेवटचा टप्पा नुकताच झाला. यामुळे या संपूर्ण उपनगरीय रेल्वे मार्गाचे एसीमध्ये विद्युत परिवर्तन पूर्ण झाले. या परिवर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. यामुळे जास्त अंतराच्या दोन रेल्वे स्थानकांमध्ये तर लोकल , १०० किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. तेव्हा पश्चिम रेल्वे मार्गावरच्या उपनगरीय वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली आहे. लोकलचा वेग वाढवल्यास जास्त गाड्या सुरु करणे शक्य असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. जीवघेणी गर्दी अशी पश्चिम रेल्वेच्या या उपनगरीय मार्गाची ओळख आहे. एकुण १२१४ लोकलच्या फेऱ्या तब्बल ३० लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करतात. तेव्हा लोकलचा वेग वाढल्यास तीन मिनीटांचा कालावधी कमी करता येणे शक्य होणार आहे.