Last Updated: Sunday, January 12, 2014, 12:46
कोल्हापूरात सुरु असलेले टोल नाके शनिवारी मध्यरात्रीपासून बंद होतील, असं आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्यानंतर टोल विरोधी कृती समीतीच्या सदस्यांनी आमरण उपोषण मागं घेतलं. पण यानंतर सुद्धा कोल्हापूरातील अनेक टोल नाक्यावर आय.आर.बी कंपनीच्यावतीनं टोल वसुली सुरु आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांच्यातून संताप व्यक्त होतोय. टोलवसुली सुरु असल्यानं शिवसैनिकांनी फुलेवाडीचा टोलनाका फोडला आहे.