नारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

Last Updated: Thursday, June 5, 2014, 23:06

राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.

वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:28

वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद

Last Updated: Thursday, February 13, 2014, 17:37

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.

राज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’

Last Updated: Thursday, February 13, 2014, 12:59

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:26

सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा

Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:22

टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:05

राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.

काँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 21:00

राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.

`विक्रांत`चा मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर लिलाव बाकी...

Last Updated: Thursday, December 5, 2013, 22:10

विक्रांत जहाजाचं म्युझियमही शक्य नाही आणि त्यावर हेलिपॅडही उभारता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विक्रांतचा लिलाव होणं आता निश्चित झालंय.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली

Last Updated: Friday, November 8, 2013, 19:37

यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.

मुख्यमंत्री चव्हाण यांचा राजकीय फटाका, शरद पवारांवर कोटी

Last Updated: Saturday, November 2, 2013, 13:06

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.

नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान

Last Updated: Thursday, October 24, 2013, 13:21

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधलंय. मी मुख्यमंत्री असताना फाईल पेंडिंग ठेवत नव्हतो. मी एका दिवसात फाईल क्लियर करायचो. चांगल्या अधिका-यांचा वापर करुन घ्यायला हवा असा टोला मारून माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी हा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

सचिन तेंडुलकर होईल महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, October 19, 2013, 10:52

काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट

Last Updated: Saturday, September 28, 2013, 08:27

दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, September 7, 2013, 09:00

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

विठुराया अशीच कृपा ठेव, मुख्यमंत्र्याचे साकडे

Last Updated: Friday, July 19, 2013, 12:00

यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.

एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार

Last Updated: Thursday, May 9, 2013, 13:28

मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले

Last Updated: Thursday, May 9, 2013, 12:48

एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

मुख्यमंत्री हे वागणं बरे नव्हे - पवार

Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:36

पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.

...तर ढोबळेंना पूर्वीचे पोस्टींग - मुख्यमंत्री

Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:07

फेरीवाल्याचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे जर दोषी नसतील तर त्यांचे पोस्टींग पूर्वीच्याच ठिकाणी केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.

मुख्यमंत्र्यांना महिलांनी घातला घेराव

Last Updated: Monday, December 17, 2012, 16:14

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी करत महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. महिलांचा हा रुद्रावतार बघून मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, डॉ. अभय बंग यांनी सरकारवर टीका केलीय.

कायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री

Last Updated: Monday, November 26, 2012, 13:46

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.

पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Last Updated: Saturday, July 28, 2012, 21:58

राज्यातलं सरकार दोन्ही पक्षांचे आहे. त्यामुळं एकतर्फी निर्णय चालणार नाही अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सुनावले आहे. मुख्यमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही नसल्याचं सांगत काँग्रेसचा मुख्यमंत्री चालणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

दिल्लीत NCPची महत्वाची बैठक

Last Updated: Sunday, July 22, 2012, 19:22

दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणा-या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक होत आहे. दिल्लीत होणा-या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

विधान परिषदेसाठी कोण असतील काँग्रेस उमेदवार?

Last Updated: Sunday, July 8, 2012, 12:37

आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.

‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 14:26

मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम रेंगाळल्याची कबूल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. हे काम मार्च 2012 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. मात्र आता 2013 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्र्यांनी घेतला MMRDAच्या कामाचा आढावा

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 11:48

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामं पूर्ण झाली नसल्याचं चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सुरु असलेल्या या नालेसफाई आणि इतर कामांवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर जबाबदारी ढकलत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही गर्भपात प्रकरण उघडकीस

Last Updated: Monday, June 11, 2012, 08:46

संपूर्ण राज्यात सध्या स्त्री-भ्रूण हत्याप्रकरण गाजत असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आलाय. बोगस डॉक्टरनं गर्भलिंग निदान करून बेकायदीशीररित्या महिलेचा गर्भापात करून गर्भ शेतात पुरल्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

Last Updated: Thursday, June 7, 2012, 12:27

बीड जिल्ह्यासह राज्यातल्या स्त्रीभ्रूण ह्त्या थांबाव्यात यासाठी राज्य सरकार कसोशीनं प्रयत्न करतंय. मात्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेला छेद देण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय.

मुख्यमंत्र्यांनी आणलं राष्ट्रवादीला अडचणीत

Last Updated: Thursday, June 7, 2012, 08:41

काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे पाटबंधारे विभागाचे सादरीकरण करणार होते, मात्र सादरीकरण नको तर श्वेतपत्रिकेचा मसुदाच मंत्रिमंडळासमोर आणा अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला अडचणीत आणलंय.

योजना काँग्रेस सरकारच्या, प्रसिद्धी उद्घाटनकर्त्यांना

Last Updated: Saturday, June 2, 2012, 19:14

राज्यात सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या योजना काँग्रेस सरकारच्या असतात नाव मात्र उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याचं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्ल्यात सुरु असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.

मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांची कुरघोडी

Last Updated: Thursday, May 10, 2012, 22:00

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातल्या कुरघोडीचं राजकारण शिगेला पोहचलंय. त्याचा प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्येही यायला लागलाय. पिंपरीत प्रस्तावित International Convention and Exhibition Center वरुन दोन्ही पक्षांमध्ये सामना रंगलाय.

शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

Last Updated: Saturday, May 5, 2012, 19:09

सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. आघाडी सरकार चालवणं ही एक कला आहे. आम्ही 1978 साली आघाडी सरकार चालवलं, पण कुरघोडी केली नाही. तसंच केंद्रात आम्ही सात आठ वर्षं एकत्र आहोत, पण एकमेकांवर कुरघोड्या केल्या नाहीत.

मुख्यमंत्री झुकले बिल्डर्स पुढे, दिले भूखंड भलतीकडे

Last Updated: Friday, May 4, 2012, 21:59

पुणेकरांसाठी विविध सुविधांसाठी आरक्षित ठेवलेल्या जमिनींचं आरक्षण उठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बिल्डर लॉबीसमोर झुकून हा निर्णय घेतल्याचा आरोप पुणेकरांनी केलाय. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यात अनेक धक्कादायक बदल करण्यात आलेत.

'महाराष्ट्र भूषण' डॉ. अनिल काकोडकर

Last Updated: Thursday, April 26, 2012, 16:07

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केलीये.

सांगलीमधली परिस्थिती 'जैसे थे'च!

Last Updated: Saturday, April 14, 2012, 22:29

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती जैसे-थेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे.

मुख्यमंत्र्यांवर हायकमांड नाराज ?

Last Updated: Saturday, April 14, 2012, 20:16

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नाही.

दुष्काळी भागात, सवलतींची बरसात

Last Updated: Friday, April 6, 2012, 15:11

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आल्यावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव

Last Updated: Friday, April 6, 2012, 13:58

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांनी घेतली नाराज आमदारांची भेट

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 19:10

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसच्याच काही आमदारांनी आघाडी उघडताच सावध झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज नाराज आमदारांना भेटीला बोलावून चौकशी केली. त्यांच्या मतदारसंघातील कामांची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.

दिवेआगर मंदिर दरोडा : उद्धव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 20:30

दिवेआगरच्या गणेश मूर्ती चोरीप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली. विधिमंडळाचं कामकाज सुरु असल्यानं त्यांनी विधिमंडळात जाऊन त्यांची भेट घेतली.

हॅप्पी बर्थडे पृथ्वी 'बाबा' !

Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:27

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. ‘मिस्टर क्लीन’ अशा प्रतिमेमुळेच चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. सुमारे सव्वा वर्षांपासून आघाडीचं सरकार चालवताना त्यांची नक्कीच कसरत होत आहे.

रंगबाधित रुग्णांच्या भेटीला मुख्यमंत्री

Last Updated: Friday, March 9, 2012, 11:52

मुंबईत रंगांची बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.