Last Updated: Sunday, December 1, 2013, 21:39
कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.
Last Updated: Saturday, October 5, 2013, 13:26
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. रत्नगिरी जिल्ह्यीतील खेड तालुक्यात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.
Last Updated: Wednesday, September 11, 2013, 09:45
कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात आज ८६ दिवसांनंतर पूजा करण्यात आलीय. सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर शुद्धिकरण पूजा करण्यात आली.
Last Updated: Thursday, September 5, 2013, 14:41
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटसाठी गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं परदेशी कंपनीकडून तब्बल चार डझन गुलाबी चेंडूही मागविलेत. या चार डझन चेंडूंसाठी असोसिएशन ३.१२ लाख रुपये मोजणार आहे.
Last Updated: Sunday, August 4, 2013, 13:21
पूरग्रस्त भागांचा दौरा करायला गेलेल्या पालकमंत्री संजय देवतळे यांच्या ताफ्यावर संतप्त नागरिकांनी दगडफेक करण्यात आली. चंद्रपूरच्या सिस्टर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.
Last Updated: Friday, August 2, 2013, 20:57
चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.
Last Updated: Monday, July 29, 2013, 09:25
विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.
Last Updated: Sunday, July 28, 2013, 11:54
विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.
Last Updated: Friday, July 26, 2013, 11:03
जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही.. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.
Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:56
रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.
Last Updated: Thursday, July 25, 2013, 14:21
बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.
Last Updated: Wednesday, July 24, 2013, 14:11
कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.
Last Updated: Wednesday, July 24, 2013, 13:59
ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.
Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28
२६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली.
Last Updated: Tuesday, July 23, 2013, 11:25
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.
Last Updated: Wednesday, July 17, 2013, 09:54
नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळं अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली असून, पिकंही धोक्यात आलीय.
Last Updated: Monday, July 15, 2013, 18:40
गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांची वाढत्या लोकप्रियतेला ‘कॅश’ करण्याचा भाजप कोणताही चान्स सोडत नाही. पुढील महिन्यात हैदराबाद येथे सभा होणार असून, सभेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रत्येकी पाच रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे.
Last Updated: Monday, July 15, 2013, 14:10
बचावकार्य पूर्ण झालं असलं तरीही अजूनही ५७४८ लोक बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.
Last Updated: Thursday, July 4, 2013, 16:55
उत्तराखंडाला मदत करण्याच्या नावाखाली अनेक खोट्या वेबसाईट आणि फेसबुक पेजेस तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी भारतीय हवाई दलाचंच नाव वापरलं जात आहे.
Last Updated: Sunday, June 30, 2013, 16:17
उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.
Last Updated: Thursday, June 27, 2013, 13:44
आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 21:31
उत्तराखंडात जसा हिमालय आणि त्याच्या पायांवरुन वाहणारी गंगा, तसंच महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी आणि तिथूनच उगम होणारी गोदामाई. ही दोन चित्रं ठळकपणे दाखवण्याचं कारण म्हणजे जे उत्तराखंडात घडलं ते त्र्यंबकेश्वरातही घडू शकतं.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 21:21
`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:47
केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:37
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 12:04
उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही.
Last Updated: Tuesday, June 25, 2013, 18:58
केदारनाथ ते गौरीकुंड येथे बचाव कार्य करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे एम आय -१७ हे हेलिकॉप्टर गौरीकुंड येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या अपघातात पाच क्रू मेंबर आणि तीन इतर ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Last Updated: Tuesday, June 25, 2013, 17:03
उत्तराखंडामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काल रात्रीपासून गुप्तकाशी परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसानं बचाव कार्यासमोर आव्हान निर्माण केलंय. जवळपास ९,००० लोक अद्यापी बेपत्ता आहेत. आतापर्यंत ८२२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेय.
Last Updated: Tuesday, June 25, 2013, 00:08
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्याच्या पर्यटकांना सरकारी मदतीसाठी आधार कार्ड मागितल्याची धक्कादायक घटना हरिद्वार स्टेशनवर घडलीय.
Last Updated: Monday, June 24, 2013, 17:31
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत बेजबाबदारपणा पुण्यात दिसून आला. उत्तराखंडातील पुरात अडकलेल्या भाविकांच्या नातेवाइकांसोबत अत्यंत निष्ठुर वर्तन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
Last Updated: Monday, June 24, 2013, 13:46
उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Last Updated: Sunday, June 23, 2013, 13:33
उत्तराखंडच्या गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी आणि फाटा या भागाला पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी विळखा घातलाय. त्यामुळे बचावकार्य थांबवावं लागलंय.
Last Updated: Sunday, June 23, 2013, 13:10
उत्तराखंडात झालेल्या महाप्रलयाने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. प्रचंड जिवितहानी या महाप्रलयात झालीय. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे कुणाचच काही चालू शकलं नाही...
Last Updated: Sunday, June 23, 2013, 10:34
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या खूप काळजीत आहे कारण त्याचं कुटुंब उत्तराखंडच्या जलप्रलयात अडकलंय. नवाजुद्दीनचा त्याच्या कुटुंबाशी कसाबसा संपर्क झालाय मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी त्याला सतावतेय.
Last Updated: Saturday, June 22, 2013, 22:53
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
Last Updated: Saturday, June 22, 2013, 19:16
उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.
Last Updated: Friday, June 21, 2013, 22:45
उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना नेपाळी गुंडांकडून हतबल भाविकांवर अत्याचार करण्यात येत असून मौल्यवान दागिन्यांची लूटही करण्यात आलेय.
Last Updated: Friday, June 21, 2013, 19:28
आभाळ फाटल्याने झालेल्या या महाप्रलयात केवळ केदारनाथचे मंदिर आणि त्यातील शिवलिंग अजूनही तसेच आहे. त्याच्या आजुबाजूचा परिसर मात्र पूर्णपणे विखरून गेलाय.
Last Updated: Friday, June 21, 2013, 18:14
उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मदत मिळत नाही. तसेच अन्न-पाण्यावाचून दिवस काढावे लागत असल्याने आम्हाला वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका आणि उडवून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांने व्यक्त केलेय.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:12
उत्तरकाशी आणि केदारनाथ येथे गंगेच्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले होते. या अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकातून काही जणांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.
Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:08
उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.
Last Updated: Thursday, June 20, 2013, 18:32
उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.
Last Updated: Thursday, June 20, 2013, 17:46
गाळात अडकलेल्या पतीच्या मृतदेहाजवळ तब्बल दोन दिवस बसून राहण्याची वेळ उत्तरप्रदेशातील रहिवासी सविता नागपाल यांच्यावर आली.
Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:32
ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत
Last Updated: Thursday, June 20, 2013, 10:45
उत्तराखंडमधल्या जलप्रकोपानं केदारनाथला होत्याचं नव्हतं करून टाकलंय. सध्या केदारनाथ मंदिराचा गाभारा सोडून आणखी काहीही उरलेलं दिसत नाही.
Last Updated: Thursday, June 20, 2013, 08:33
क्रिकेटर हरभजन सिंग सध्या पूरग्रस्त भागातील जोशीमठात अडकलाय. ‘आयटीबीपी’च्या कॅम्पनं त्याला तात्पुरता आसरा दिलाय.
Last Updated: Wednesday, June 19, 2013, 20:51
उत्तराखंडमध्ये पुरानं थैमान घातलं असतानाच राजधानी दिल्लीलाही पुराचा धोका निर्माण झालाय. यमुना नदीचा प्रवाह पूरपातळीपेक्षा २ मीटर जास्त आहे.
Last Updated: Wednesday, June 19, 2013, 19:21
उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.
Last Updated: Wednesday, June 19, 2013, 19:07
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.
Last Updated: Wednesday, June 19, 2013, 18:46
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
Last Updated: Wednesday, June 19, 2013, 16:29
राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Last Updated: Wednesday, June 19, 2013, 13:58
गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.
Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:32
उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.
Last Updated: Tuesday, June 18, 2013, 09:47
मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.
Last Updated: Sunday, June 16, 2013, 23:10
रायगड जिल्ह्यात खोपोली शहराला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. सर्वच सखल भागात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे एक घर पडलं तर जनजीवन विस्कळीत झालंय.
Last Updated: Sunday, September 9, 2012, 20:14
पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा केल्याचं प्रकार वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये घडलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं इथं पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेण्याची नामुष्की ओढवलीय.
Last Updated: Thursday, September 6, 2012, 21:44
प. बंगालमध्ये बांकुरा जिल्ह्यातील झरगाम येथून दुर्गापूर येथे बस जात होती. भैरव बाकी नदी पार करीत असताना आलेल्या पुराच्या लोंढ्यात बस वाहून गेली.
Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:14
गुलाबी नगरी म्हणून ओळखली जाणारी राजस्थान राजधानी जयपूर सध्या पाण्यात बुडालीय. जयपूरमध्ये पावसानं एकच हाहाकार उडवून दिलाय. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय.
Last Updated: Saturday, August 4, 2012, 16:56
बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.
Last Updated: Sunday, July 8, 2012, 20:21
रशियात जोरदार पाऊस झाल्याने पुराने थैमान घातले. आतापर्यंत १५०लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. दक्षिण भागतील क्रेसनोडर भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळॆ अनेक जण वाहून गेलेत.या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
Last Updated: Monday, July 2, 2012, 19:49
असाममध्ये ब्रहृपूत्र नदीला पूर आल्याने आसाम राज्याला पुराचा मोठा फटका बसला. यात कोट्यवधी रूपयांची हानी झाली. पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधाना डॉ. मनमोहनसिंग यांनी ५०० कोटी रुपयांची अस्थायी मदत जाहीर केली आहे.
Last Updated: Saturday, December 24, 2011, 08:50
फिलिपीन्स मधल्या विनाशकारी पुरात १००० जण मृत्युमुखी पडल्याचं तसंच हजाराहून अधिक जण बेपत्ता असल्याचं वृत्त फिलिपीन्स सरकारने दिलं आहे. आतापर्यंत १०८० लोकं मरण पावली आहेत.
Last Updated: Saturday, November 26, 2011, 16:52
भारतातील श्वेत क्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरिअन यांनी नुकताच नव्वदीत प्रवेश केला. कुरिअन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लड यशस्वी झालं आणि त्यामुळेच आज भारत जगात दुग्ध उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश आहे.
आणखी >>