दिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट

Last Updated: Monday, December 30, 2013, 18:20

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.

`आप` महाराष्ट्रात कोणाला करणार गप्प?

Last Updated: Monday, December 30, 2013, 15:52

दिल्लीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीनं आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशभरातील सर्व ५४३ जागांवर लढण्यापेक्षा नेमक्या आणि मोजक्या (१००) जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा विचार आहे.

आजारी असल्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली दांडी!

Last Updated: Monday, December 30, 2013, 11:51

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तापाने फणफणले आहेत तसंच त्यांना डायरिया झाला असल्यानं ते आज कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.

सिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!

Last Updated: Monday, October 7, 2013, 20:58

ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

मनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:22

नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.

धोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:25

मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

पावसाची कृपा, सरकारची अवकृपा!

Last Updated: Monday, June 3, 2013, 19:03

कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 20:00

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:26

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:08

नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.

पाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न`

Last Updated: Monday, October 29, 2012, 08:08

नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडविण्याचं काम इथं जोमाने सुरु झालय. आमदार अमरिश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे नव्वद बंधारे तयार झाले असून तीस किलोमीटरचा परिसर `सुजलाम सुफलाम` झालाय.

जलसंपदा विभागात २० हजार कोटींची `गोलमाल`

Last Updated: Sunday, September 23, 2012, 13:49

जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका येईल तेव्हा येईल पण आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती धक्कादायक माहिती आलीय. जलसंपदा खात्याचे नाशिक येथील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी 15 पानांचे एक पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले असून त्यात जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आलाय.

महिलेवरील वक्तव्यावरून मंत्री ढोबळेंना मारहाण

Last Updated: Monday, August 27, 2012, 09:15

नागपूर येथील अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोपाला मारहाणीचे गालबोट लागलं आहे. स्त्री अत्याचारासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना संमेलनाच्या समारोपाच्या वेळी मारहाण झाली.

पाणीसाठी संपला, मुंबईत होणार बोंबाबोंब

Last Updated: Monday, July 16, 2012, 11:25

समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीचे नियोजन कोलमडले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. पावसाची कृपा न झाल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण पाणी कपातीचे धोरण अवलंबण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

अजित पवारांच्या सूचनेला कलमाडींचा विरोध

Last Updated: Sunday, July 15, 2012, 12:48

खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.

शेजारी धरण, तरी पाण्यासाठी वणवण

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:37

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.

मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार!

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:41

मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठय़ात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाला गेले आहे. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे

इंद्रायणी काठी, पाण्याची टंचाई

Last Updated: Sunday, April 22, 2012, 19:53

राज्यातला बहुतांश भाग आज दुष्काळाच्या छायेत असल्याची चिन्ह आहेत. त्याला तीर्थक्षेत्रही अपवाद नाहीत. आळंदीमध्येही सरकारच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

नाशिकमध्ये पाणीकपातीवरून राजकारण

Last Updated: Saturday, March 31, 2012, 17:46

नाशिकमध्ये पाणीकपातीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झालंय. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

पुणेकरांसाठी 'निर्जळी' उन्हाळा!

Last Updated: Thursday, March 29, 2012, 20:24

उन्हाळा आणि पाणी टंचाईनं हैराण झालेल्या पुणेकरांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. एक वेळच्या पाणीपुरवठ्याबरोबरच आता आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 15:46

मुंबईत जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेद्वारे क्वारी रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शनवर जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम 29 आणि 30 मार्चदरम्यान हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे विक्रोळीच्या काही भागात गुरुवारी 29 मार्चला तर भांडूपच्या काही भागात शुक्रवारी 30 मार्चला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नाशिकमध्ये पाणीकपातीचे संकेत

Last Updated: Friday, March 23, 2012, 18:06

आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठी धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळं पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय.

राज्यात पाणी टंचाई, खासगी टँकर खाणार मलई!

Last Updated: Thursday, March 1, 2012, 17:05

फेब्रुवारी महिन्यातच राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईचं संकट ओढवले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे तब्बल सात जिल्ह्यांत टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. पाण्याचं दुर्भिक्ष यावर्षी खूपच लवकर ओढवलंय.

पुन्हा पुणेकर, पाणी प्रश्न आणि अजित पवार

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 17:58

पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणार आहे.

राष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी

Last Updated: Friday, February 24, 2012, 18:53

सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.

मुंबईत २५% पाणी कपात

Last Updated: Thursday, January 5, 2012, 09:49

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.

उंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या

Last Updated: Saturday, December 3, 2011, 15:13

दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.

मुंबईत ५० % पाणी कपात

Last Updated: Thursday, November 17, 2011, 07:34

मुंबईकरांना शनिवारी १९ नोव्हेंबरला पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे.

टीएमटीच्या बसनं केला पाण्याचा वांदा

Last Updated: Monday, November 14, 2011, 05:51

ठाणे शहरात टीएमटीच्या बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पाण्याच्यापाईपलाईनवर बस धडकल्याने पाईपलाईन फुटली.

पुण्यात पाण्याचा ‘लोड’ कमी

Last Updated: Wednesday, October 12, 2011, 08:24

लोडशेडिंगचा परिणाम पुण्यात पाणीपुरवठ्यावर झाला आहे. आज कमी दाबानं पाणीपुरवठा केला गेला. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगचा फटका पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला बसल्याने पाणी कमी दाबानं सोडावे लागलं आहे.