बीड - औरंगाबाद महामार्गावरील अपघातात 8 ठार

Last Updated: Thursday, June 12, 2014, 15:45

बीड - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व आंबेजोगाईचे रहिवासी आहेत. हा अपघात सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास झाला.

मुंबई, ठाण्यासह, खानदेश, कोकण, मराठवाड्यात आज मतदान

Last Updated: Thursday, April 24, 2014, 07:13

राज्यात 19 जागांसाठी हे मतदान होतंय, खानदेश, कोकण आणि मराठवाड्यासह, मुंबई आणि ठाण्यात आज मतदान होतंय.

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

Last Updated: Sunday, April 20, 2014, 15:41

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

लोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क

Last Updated: Thursday, April 17, 2014, 12:29

राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:49

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 08:37

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:23

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

मराठवाडा, विदर्भ वेगळी राज्य करा - पासवान

Last Updated: Friday, February 21, 2014, 15:32

लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली आहे.

विधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत

Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:22

मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 10:12

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:01

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 10:24

राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:29

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

राज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 20:54

राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.

अशोक चव्हाणांची राजकारणात पुन्हा आक्रमक सुरूवात?

Last Updated: Monday, June 17, 2013, 18:16

आजपर्यंत राज्याच्या राजकीय पटलावरून आणि मराठवाड्यातील असूनसुद्धा मराठवाड्याच्या राजकारणातून जवळपास गायब झालेले अशोक चव्हाणांनी आज पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले.

राहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर...

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 12:56

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

अपात्र प्राध्यापक पीएचडीचे गाईड

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 23:20

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पात्रता नसलेले प्राध्यापक पीएचडीचे मार्गदर्शक बनल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय.

मराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!

Last Updated: Sunday, May 5, 2013, 22:05

मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.

पाणी आलं आणि ते नाच नाच नाचले...

Last Updated: Monday, April 29, 2013, 08:36

आता बातमी आहे मराठवाड्यातील जनतेला आणि जालनाकरांना दिलासा देणारी. यावर्षी दुष्काळाचा भयंकर सामना करणाऱ्यां नागरिकांना लवकरच पाणीटंचाइपासून मुक्ती मिळणार असल्याची चिन्हं आहेत. या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करताना रस्त्यावर नाचनाच नाचले.

मराठवाडा विद्यापीठात लिपीक, वाहन चालक पदासाठी भरती

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 18:02

शिक्षकेत्तर पदे खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून शुक्रवार दि. १२.०४.२०१३ पर्यंत विद्यापीठाच्या विहित नमुन्यात आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत.

... आणि इथं दुष्काळही हरला! (जागतिक जल दिन)

Last Updated: Friday, March 22, 2013, 09:08

मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...

हैदराबाद स्फोट : एमआयएमच्या पदाधिका-याची चौकशी

Last Updated: Sunday, February 24, 2013, 09:42

हैदराबादमधील स्फोटप्रकरणी नांदेडमधल्या एमआयएमच्या वरिष्ठ पदाधिका-यांची काल रात्री कसून चौकशी करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसनं ही चौकशी केलीय. एटीएसनं आता एमआयएमवरही लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतंय. कारण यापूर्वीच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मराठवाडा कनेक्शन समोर आलंय.

हैदराबाद बॉम्बस्फोटाचं मराठवाडा कनेक्शन...

Last Updated: Friday, February 22, 2013, 16:11

हैदराबाद स्फोटांचं मराठवाडा कनेक्शन उघड होतंय. पुणे स्फोटांतला आरोपी सईद मकबूलनं हैदराबादेत रेकी केल्याचं समोर आलंय.

मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?

Last Updated: Sunday, February 10, 2013, 18:45

दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.

'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रापुढे पसरणार हात'

Last Updated: Sunday, February 10, 2013, 17:26

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...

Last Updated: Monday, January 28, 2013, 15:03

मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.

१० महिन्यात १५२ शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 19:53

दुष्काळाच्या छायेत आसणा-या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र सुरु झालयं. गेल्या 10 महिन्यात 152 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, November 5, 2012, 20:24

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

परभणीत महिला पोलिसाची हत्या

Last Updated: Friday, November 2, 2012, 14:01

परभणीतील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

दहशतवादाचं जाळं खंडीत... असदच्या भावाचीही झाडाझडती

Last Updated: Friday, October 12, 2012, 16:34

औरंगाबाद एटीएसने दहशतवादी असदचा भाऊ हुसैन खान याला ताब्यात घेतलयं. त्याच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्सवरून अधिक माहिती मिळण्यात येणार आहे.

दहशतवादाचं औरंगाबाद-मराठवाडा कनेक्शन….

Last Updated: Friday, October 12, 2012, 09:41

पुणे बॉम्बस्फोटांचा छडा लागल्यावर, दहशतवाद्यांचं मराठवाडा कनेक्शन पुन्हा उघड झालंय. दिल्लीत पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा मराठवाड्याशी संबंध आहे तर असद खान हा औरंगाबादपासून जवळ असलेल्या नायगाव गावातील तवक्कल नगरमधला रहिवासी आहे.

६४वा मराठवाडा मुक्तिदिन

Last Updated: Monday, September 17, 2012, 15:51

आज 64 वा मराठवाडा मुक्तीदिन सोहळा साजरा कऱण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत हा सोहळा पार पडला. हैदराबादच्या निजामाच्या क्रूर राजवटीतून मुक्तीसाठी शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं.

पुन्हा विद्यापीठात जाताना...

Last Updated: Monday, July 9, 2012, 19:26

संतोष गोरे
शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या... तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.

मराठवाडा नवा पाकिस्तान - बाळासाहेब ठाकरे

Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:21

मराठवाडा हा नव्याने पाकिस्तानची कास धरत आहे. मराठवाड्याचे क्षेत्र हे पाकिस्तान होत आहे, अशी ठाकरी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील संपादकीय लेखात केली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी लष्कर ए तैय्यबा हस्तक अबू जिंदाल तथा अबू हामजा हा मराठवाड्यातील आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

पेपरफुटी प्रकरणी प्राचार्याला अटक

Last Updated: Monday, June 11, 2012, 08:36

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंडिनिअरींग शाखेच्या पेपरफुटीप्रकरणी हिंगोली जिल्हयातून एका प्राचार्याला आणि प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.

विधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी

Last Updated: Monday, May 7, 2012, 20:41

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

एक कळशी पाणी दहा रुपयांना!

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:58

सुजलाम सुफलाम अशी ओळख असणा-या महाराष्ट्रात एक कळशी पाणी पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावं लागतंय.... ही कहाणी आहे जालन्यातली....या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं.

राज्याचं बजेट, मराठवाड्याला काहीच नाही देत..

Last Updated: Sunday, March 25, 2012, 08:57

सोमवारी राज्याचं बजेट सादर होणार आहे. त्यात मराठवाड्याला काय मिळतं याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता बजेटच्या बाबतीत मराठवाडा कायम कमनशिबीच राहिलेला आहे.

नांदेडला सापत्न वागणूक

Last Updated: Monday, March 12, 2012, 22:10

मराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिलाय. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलय. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालीये.

मराठवाड्याच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

Last Updated: Monday, March 12, 2012, 10:13

मराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिला आहे. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आला आहे. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मराठवाड्याच्या जनतेच्या माफक अपेक्षा आहेत.