ऊस दरवाढीसाठी कायदा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:50

ऊस दरावरून दरवर्षी होणारे आंदोलन लक्षात घेऊन आता ऊस दर ठरवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय आहे. यापुढे ऊसाला कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दर देण्यात येणार आहे.

... आणि अजित पवार माधव भंडारींवर भडकले

Last Updated: Sunday, December 1, 2013, 20:52

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता

Last Updated: Friday, November 29, 2013, 19:49

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.

ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला

Last Updated: Thursday, November 28, 2013, 11:24

ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

ऊस दराचं गुऱ्हाळही पोहचलं दिल्लीत, उत्तर नाहीच!

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 23:32

ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

Last Updated: Friday, November 8, 2013, 22:50

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 18:33

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

ऊस दराचा तिढा सुटणार!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:59

राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.

दुष्काळाने पळवली साखर!

Last Updated: Sunday, May 26, 2013, 19:14

राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.

राज्यातला दुष्काळ उसाच्या मळ्यांसाठी लागू नाही

Last Updated: Friday, March 15, 2013, 14:18

राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले दिसत आहेत.

कोकणातील पहिला साखर कारखाना मंजूर

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 23:13

हापूसच्या अवीट गोडीनं कोकणचे नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचलंय. या हापूसच्या जोडीला आता कोकणच्या याच पट्ट्यात पहिला साखर कारखाना मंजूर झालाय. साहजिकच कोकणच्या अर्थकारणाला अधिक मजबुती मिळण्याची शक्यता आहे.

ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी

Last Updated: Thursday, November 22, 2012, 10:07

उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

ऊसदर आंदोलनाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा

Last Updated: Thursday, November 22, 2012, 18:05

शेतक-यांच्या ऊसदर आंदोलनाला आता नक्षलवाद्यांनीही पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतक-यांवर झालेल्या अन्यायाचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे.

ऊसाला २५०० रूपये भाव

Last Updated: Monday, November 19, 2012, 16:02

सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.

राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...

Last Updated: Friday, November 16, 2012, 13:35

ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय.

ऊस आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री

Last Updated: Thursday, November 15, 2012, 20:37

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली.

आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी

Last Updated: Thursday, November 15, 2012, 21:45

सांगली जिल्ह्यातील आष्टा गावात ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.

ऊस आंदोलन चिघळलं, एसटी सेवा पुन्हा बंद

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 17:45

ऊसदर आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरु करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. आंदोलनामुळं सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. सांगली-इस्लामपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

पेटवा पेटवी

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:13

काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 16:29

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वा-यावर सोडल्याचं चित्र दिसून येतंय.

पवार काका-पुतण्यांनी आंदोलन पेटवलं- खोत

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 14:12

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं.

ऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 12:34

ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.

प. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:10

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.

आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 10:11

ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.

`बंद`च्या भूमिकेवर सेनेचा यू-टर्न

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 20:19

ऊस दरवाढीच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुकारलेला बंद मागे घेतलाय. ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं आपण बंद मागे घेत आहोत’, असं म्हणत शिवसेना बॅकफूटवर गेलीय.

खासदार राजू शेट्टींची दिवाळी जेलमध्ये

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 09:39

ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे यांच्यासह इतर सहा जणांना चौदा दिवसांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, देण्यात आली. त्यामुळे त्यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होत आहे.

ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टी ताब्यात, बस जाळली

Last Updated: Monday, November 12, 2012, 10:55

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ते तीन बसच्या काचा फोडण्यात आल्यात. तर अनेक बस बंद पाडण्यात आल्यात.

ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, `चक्काजाम` आंदोलनाचा इशारा

Last Updated: Sunday, November 11, 2012, 22:53

केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. उसाचा थकित हप्ता मिळावा आणि यंदा 3000 रुपये उचल देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत.

...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी

Last Updated: Sunday, October 28, 2012, 08:07

चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.

ऊस लागवडीचा अभिनव प्रयोग

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 11:17

पारंपरिक ऊस लागवडीच्या पद्धतीला फाटा देणारा एक अभिनव प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील शेकऱ्यानं केलाय. या प्रयोगामुळे त्यांचं साधारण ७० ते ७५ टक्क्यांनी उसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

गाळप होईपर्यंत कारखाने बंद नाही - पाटील

Last Updated: Monday, March 19, 2012, 16:48

ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम असल्याने शेतकरी चिंतेत आहे. या शेतकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न सरकारने केले आहे. ऊसाचे संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत असे आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे.

ऊस कामगार मतदानापासूनच दूरच !

Last Updated: Saturday, February 4, 2012, 16:17

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त

Last Updated: Saturday, December 17, 2011, 11:04

गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.

अजित पवारांचा दरेकरांवर पलटवार

Last Updated: Sunday, November 13, 2011, 05:46

ऊस दरवाढीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ऊस दरवाढीच्या मुद्यावरून अजित पवारांनी मनसेला टीकेचं लक्ष्य केलं. मनसेच्या ताब्यात असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं साखर कारखान्यांना कर्ज द्यावं अशी सुचना अजितदादांनी केली. त्याला मुंबै बँकेचे अध्यक्ष असलेल्या प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

अखेर ऊस दराचा तिढा सुटला

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:12

अखेर ऊसदराचा तिढा सुटला, कोल्हापूर विभागात 2050 रू. पुणे विभागासाठी 1850 तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रू. दर निश्चित करण्यात आला आहे. लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

ऊस दरवाढीचा तिढा सुटणार?

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:16

ऊस दरवाढीचा तिढा सुटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पवारांना मध्यस्थीची विनंती केल्यामुळं पवारांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली.

ऊसदराची चर्चा फिस्कटली

Last Updated: Thursday, November 10, 2011, 15:17

पुण्यात सुरु असलेली ऊसदराची चर्चा फिस्कटली. आज दिवसभर संध्याकाळ पर्यंत तोडगा निघेल असं चित्र निर्माण झालं होतं. सरकारवर कारखानदारांचा दबाव आहे आणि उद्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करावा लागेल असा इशारा राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे.

राजू शेट्टींना राज यांचा पाठिंबा

Last Updated: Thursday, November 10, 2011, 11:51

उसाच्या दरावरून शेतकरी संघटनेचा आमदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. सरकारने नाटक केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशी धमकी वजा इशारा राज ठाकरे यांनी आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

ऊस शेतकऱ्यांवर 'माये'ची पाखर

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 11:55

महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने उसाला योग्य दर मिळावा यासाठी तीव्र आंदोलन छेडलं असताना तिकडे उत्तर प्रदेशात मायावती सरकारने उसाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ केली आहे.

ऊसाचे झालं राजकीय चिपाड

Last Updated: Monday, November 7, 2011, 04:23

शेतकरी आंदोलनांमुळे सहकारक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. तर आत्मक्लेष यात्रा बारामतीत दाखल होत असल्यानं आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी काका-पुतण्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय.

कोल्हापूर अशांत जिल्हा, जमावबंदी लागू

Last Updated: Saturday, November 5, 2011, 07:44

कोल्हापूर मध्ये ऊसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे आंदोलनला दडपण्यासाठी कोल्हापूर मध्ये जमाव बंदी लागू केली आहे. ऊसाची दरवाढ हो प्रश्न गंभीर बनू नये म्हणून ही जमाबबंदी लागू करण्यात आली आहे.

कारखान्यांसाठी साखरेची चव कडवट

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 16:07

यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक आरिष्ट कोसळ्याची चिन्हं दिसत आहेत. सहकारी साखर कारखान्यांकडे मागील वर्षीचा ३.५ दशलक्ष टनांचा शिल्लक साठा पडून आहे.

तुझ्या उसाला लागला कोल्हा...

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 13:37

सरकारी खात्यांनी वर्तवलेले अंदाज अचूक येणं हा चमत्कार मानला जातो आणि प्रादेशिक साखर संचालनालय त्याला अपवाद कसा असू शकतो. संचालनालयाचा अहवाल आणि लागवडीखालील उसाचे क्षेत्र यात मोठी तफावत आहे.