मतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 20:26

निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.

नागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 20:02

निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. 10 लोकसभा मतदारसंघात एकूण 201 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

विदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 08:28

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.

मनसे प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याला, उद्धव यांची विदर्भात सुरुवात

Last Updated: Friday, March 21, 2014, 20:31

मनसेच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराला पुण्यातून तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भातून सुरुवात करणार आहेत.

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 20:55

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 12:25

नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:28

वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्र्यांचं विदर्भाकडे दुर्लक्ष, मुत्तेमवारांचा घरचा आहेर!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 15:51

मुख्यमंत्र्यांचं नागपूर आणि विदर्भाकडे लक्ष नाही असा आरोप काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलाय.

वेगळ्या विदर्भाची मागणी नव्हे… ही तर स्टंटबाजी!

Last Updated: Saturday, September 28, 2013, 18:15

विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंबंधी झालेल्या ‘नागपूर करारा’ला आज ६० वर्षे पूर्ण झाली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज या कराराची होळी केली.

वेगळ्या विदर्भासाठी नक्षलवाद्यांची मदत घेऊ- जांबुवंतराव धोटे

Last Updated: Thursday, September 19, 2013, 19:14

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांना पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा उमाळा आलाय. वेगळ्या विदर्भासाठी गरज पडल्यास नक्षलवाद्यांचीही मदत घेण्यात येईल असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलंय.

विदर्भवासियांची सरकारदरबारी पुन्हा थट्टाच!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 21:35

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या विदर्भवासियांची सरकारनं पुन्हा एकदा थट्टा सुरू केली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या पीडितांना मदत देण्याचं सोडून, सरकारनं नुकसाग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवलंय. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची कबुली दिलीय.

`मंत्रालयात बसलेले नक्षलवादी अधिक धोकादायक!`

Last Updated: Sunday, August 18, 2013, 17:41

वेगळा विदर्भ दिल्यास त्यावर नक्षलवाद्यांचा प्रभाव राहील ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

वेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...

Last Updated: Monday, August 5, 2013, 10:28

वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पूराची परिस्थिती कायम

Last Updated: Saturday, August 3, 2013, 19:08

चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी `जंतर मंतर`वर आंदोलन!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 17:54

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते आता आक्रमक झाले आहेत. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला जंतरमंतर मैदानावर प्रातिनिधिक आंदोलन करण्यात येणार आहे.

विदर्भात ओला दुष्काळ, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Last Updated: Thursday, August 1, 2013, 17:53

विदर्भातल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना मदत जाहीर केलीय. यंदा विदर्भात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.

स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक आक्रमक

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 21:06

तेलंगणा राज्याच्या निर्मिती प्रक्रियेला वेग मिळाला असतानाच आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर पकडलाय.. आज नागपूरच्या टेम्पल रोड परिसरात भाजप, शेतकरी संघटना आणि विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले आंदोलन केलं

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?

Last Updated: Monday, July 29, 2013, 09:25

विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.

मंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!

Last Updated: Sunday, July 28, 2013, 11:54

विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा...

Last Updated: Monday, July 22, 2013, 23:29

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दिवस गाजला तो विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मुद्यावरून...ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्यावरून विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत रणकंदन केलं.

धरणं उघडली, रस्ते पाण्यात, संपर्क तुटला!

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 14:19

गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घातलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.

संपूर्ण विदर्भात पावसाची दमदार हजेरी

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 22:54

नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसानं कालपासून दमदार हजेरी लावलीय. नागपुरात रात्रभरात 72 मिमी पावसाची नोंद झालीय. भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू आहे.

अब तक ४८!

Last Updated: Friday, May 24, 2013, 00:02

आग ओकतोय सूर्य ! भाजून निघतेय कातडी ! जनता झालीय हैराण ! राज्यात उष्णतेची लाट !

सचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 15:51

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.

विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी

Last Updated: Sunday, December 30, 2012, 21:18

गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.

विदर्भात पावसाचे २० बळी

Last Updated: Thursday, September 6, 2012, 10:43

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. पावसामुळं २० जणांचा बळी गेलाय. विदर्भातल्या बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत.

वाहतुकीचा खेळखंडोबा

Last Updated: Friday, July 20, 2012, 21:46

कसाऱ्याजवळ लोकल आणि एक्सप्रेसची टक्कर

Last Updated: Thursday, July 19, 2012, 23:52

मुंबईत कसा-याजवळ मोठी दुर्घटना घडलीय. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झालीय. कसारा लोकल कसा-याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.

विदर्भाला 500 कोटींचं अनुदान

Last Updated: Thursday, July 5, 2012, 13:26

शेवटी केंद्राला महाराष्ट्रातल्या विदर्भाची दया आलेली दिसतेय. विदर्भातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांचं अनुदान देण्यास मंजुरी दिलीय.

पावसाची महाराष्ट्रभर जोरदार हजेरी

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 19:04

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे पश्चिम किनारपट्टीवर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झालेला दिसतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलीय. आज दिवसभर कोकणात काय दैना उडवलीय पावसानं... टाकूयात एक नजर...

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 11:04

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती.

विदर्भात पाण्यासाठी वणवण

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:11

वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.

विदर्भातील राहुल रोहणे IFS

Last Updated: Saturday, April 7, 2012, 14:52

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.

विदर्भ सिंचन महामंडळात ३००० कोटींचा भ्रष्टाचार

Last Updated: Monday, April 2, 2012, 13:50

विदर्भ सिंचन विकास महामंडळात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानसभेत खडसेंनी हा गौप्यस्फोट केलाय

चंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष

Last Updated: Saturday, February 4, 2012, 09:04

डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्‍वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले.

शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:37

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.