देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:28

देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.

एव्हरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची मुलगी पूर्णा!

Last Updated: Sunday, May 25, 2014, 16:10

जर तुमचा आत्मविश्वास उदंड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशची आदिवासी मुलगी पूर्णा... पूर्णा 13 वर्ष 11 महिने वयाची आहे आणि तिनं जगातील सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी म्हणून नाव नोंदवलंय.

ऐतिहासिक... मृत्यूनंतरही या उमेदवारानं मिळवला विजय!

Last Updated: Saturday, May 17, 2014, 22:43

देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आंध्रप्रदेश विधानसभेचेही निकाल जाहीर झाले.

ऐतिहासिक... मृत्यूनंतरही उमेदवार होणार विजयी?

Last Updated: Monday, May 5, 2014, 10:45

लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीच्या नावावर मृत्यूनंतरही मतदान झालं तर... नाही नाही हा ‘भूतनाथ’ किंवा कल्पित घटना नाही तर सत्य घटना आहे...

मोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा

Last Updated: Saturday, April 26, 2014, 19:43

आंध्रप्रदेशेच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.

आंध्रप्रदेश : राजकीय इतिहास आणि सध्याची समीकरणं

Last Updated: Friday, April 4, 2014, 23:20

दक्षिणेतील महत्वाचं राज्य आंध्र, आंध्र प्रदेशाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भाषावार विभाजनानंतर आंध्रची निर्मिती झाली. आता पुन्हा आंध्रच्या विभाजनासाठी आंदोलन सुरु आहे. राजधानी हैदराबादचा प्रश्न आजही चिघळतोय.

प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:45

लोकसभेत मंजूर झालेले तेलंगणा विधेयक राज्यसभेतही प्रचंड गदारोळानंतर मंजूर झाले. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता देशात २९ राज्ये होणार आहेत.

आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींचा राजीनामा

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 15:49

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी मुख्य़मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

`वायएसआर` काँग्रेसनं पुकारला `आंध्र बंद`!

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 20:50

गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळालीय. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी लोकसभेत अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं यशस्वीरीत्या हे विधेयक मंजूर करून घेतलं असलं तरी आंध्र प्रदेशच्या विभाजनासारखंच आंध्रात काँग्रेसचही विभाजन होणार यात शंका नाही.

तेलंगणा विधेयक : १७ गोंधळी खासदार निलंबित

Last Updated: Thursday, February 13, 2014, 15:56

तेलंगणा विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. विधेयकावरून तेलंगणा समर्थक आणि विरोधक खासदारांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी राजगोपाल या काँग्रेसच्या खासदारांसह १७ खासदारांना निलंबित करण्यात आलंय. या सर्व गोंधळानंतर संसंदेचं कामकाज १७ फेब्रुवारी म्हणजे सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय.

तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा

Last Updated: Thursday, February 13, 2014, 14:00

आंध्र प्रदेश राज्याचे विजन करून नवे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार हंगामा झाला. तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा पाहायला मिळाला. हाणामारीचा प्रयत्न झाला. काही खासदारांनी मिरटी स्प्रेचा वापर केला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य

Last Updated: Friday, February 7, 2014, 23:14

आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.

५९ बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या टोळीला अटक

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 13:02

आंध्र प्रदेश पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या नऊ जणांनी दोन वर्षात ५९ महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचं चौकशीत पुढं आलंय. या टोळीनं आपला गुन्हा मान्य केलाय.

तेलंगणात ‘सोनियाम्मा’ची मूर्ती तयार मंदिरही लवकरच

Last Updated: Thursday, January 9, 2014, 16:10

आपल्या देशात व्यक्तीपूजेचा सूर खूप दिसतो. आता तर कलाकार, क्रिकेटपटूंसोबत राजकारण्यांचेही मंदिर बनू लागले आहेत. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आंध्रप्रदेशच्या एका आमदारानं सोनिया गांधींना `माँ तेलंगण`चा दर्जा देत, त्यांचं मंदिर उभारणार असल्याचं सांगितलंय.

लहेर चक्रीवादळाची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:53

लहेर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. ऊद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यसरकारने या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

आंध्र प्रदेशला चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा तडाखा

Last Updated: Friday, November 22, 2013, 16:34

आंध्र प्रदेशला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. हेलेन या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. फायलिन वादळानंतर हेलेनने तडाखा दिला आहे. या वादळबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

अफवेमुळं घडला अपघात, रेल्वेनं चिरडलं, १८ ठार

Last Updated: Sunday, November 3, 2013, 12:07

आंध्रप्रदेशातील विजयनगरम्‌ जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.

व्होल्वो बसला आग, ४५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 15:06

बंगळुरु-हैदराबाद महामार्गावर कोठाकोटा येथे व्होल्वो बसची इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागून ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशमधील महबूबनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

जामा मशिदीची रेकीचा संशय, चौकशी पथक आंध्र प्रदेशात

Last Updated: Saturday, October 19, 2013, 11:42

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात जामा मशिदीची रेकी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परभणी पोलीस आणि राज्य एटीएस पथकानंही याची दखल घेतली असून सोलापूर आणि आंध्र प्रदेशमध्येही चौकशीचं एक पथक रवाना झालंय. काय आहे. काय आहे हा सारा प्रकार. एक रिपोर्ट.

`फायलिन`ची तीव्रता कमी केली मुंबईतील प्राध्यापकाने!

Last Updated: Monday, October 14, 2013, 13:55

`फायलिन` हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे खूप मोठी वित्त आणि जीवीत हानी होऊ शकते. याबाबतची कल्पना पाच दिवसांपूर्वीच कपिल गुप्ता या मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाने दिली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात सरकारला यश आले आणि मोठी हानी टाळण्यात सरकार यशस्वी झाले आहे.

फायलिनला भारताने हरवलं

Last Updated: Sunday, October 13, 2013, 13:16

फायलिनला भारताने हरवलं आहे. शनिवारी ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन चक्रीवादळाचा वेग मंदावलाय. गोपालपूरमध्ये वारे आता ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

फायलीनचं संकट उंबरठ्यावर, तीन जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, October 12, 2013, 18:05

फायलीन चक्रीवादळ वेगाने भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. ‘फायलीन’ ओडिशामध्ये धडकण्यापूर्वीच वादळामुळे झाडं उन्मळून पडल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय.

फायलीन चक्रीवादळाचा वेग वाढलाय

Last Updated: Saturday, October 12, 2013, 09:50

फायलीन चक्रीवादळाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. फायलिनचा वेग आणखी वाढला आहे. हे वादळ ओडिशाच्या भोपालपूरपासून ३४५ किमी दूर आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

फायलीन चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला धोका

Last Updated: Friday, October 11, 2013, 15:58

फायलीन चक्रीवादळाचा वेग आणखीन वाढलाय. सध्या हे चक्रीवादळ पश्चिमोत्तर दिशेने पुढे जात असून, हे वादळ ओडिशातील पारादीपपासून ८५० किलोमीटरवर केंद्रीत आहे. उद्या रात्री हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामानखात्यानं दिलीये.

आंध्र प्रदेश अंधारात, तेलंगणविरोधी आंदोलन कायम

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 12:32

स्वतंत्र राज्य तेलंगण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर आंध्रमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जाळपोळ यासारख्या घटनानंतर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विजयनगरसह अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. दरम्यान, तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे.

आंध्रच्या विभाजन मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष

Last Updated: Saturday, October 5, 2013, 14:39

आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष पसरला आहे.. सरकारने विभाजन मागेघ्यावं या मुद्द्यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.ए. जगन मोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वाय.एस.आर. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसलेत.

आंध्र प्रदेशात तीन अतिरेकी घरात घुसले

Last Updated: Saturday, October 5, 2013, 14:31

आंध्र प्रदेशात घरात दहशतवादी घुसल्याने घबराट पसरली आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. इथल्या एका घरात २-३ दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या घराला घेरलं आहे.

स्वतंत्र तेलंगणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Last Updated: Thursday, October 3, 2013, 23:14

केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.

महाराष्ट्राचा नवा शेजारी... `तेलंगणा`!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 20:36

स्वतंत्र तेलंगणासाठी सुरू असलेल्या साठ वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. युपीए समन्वय समितीच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला.

स्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 11:05

स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

भाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 13:44

आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.

पी.साई संदीप JEE अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला

Last Updated: Sunday, June 23, 2013, 16:19

आंध्र प्रदेशातल्या पी.साई संदीप रेड्डीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT साठी घेण्यात आलेल्या JEE अडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला येण्याचा मान पटकावलाय.

सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राच्या बाजूने निकाल

Last Updated: Thursday, February 28, 2013, 21:42

महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बाभळी बंधाराच्या बाधकामाविरोधातली आंध्राची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळं महाराष्ट्राला दिलासा मिळाला असून बाभळीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

`म्हणून काय रात्रभर महिलांनी रस्त्यावर फिरायचे?`

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 17:32

आपल्या देशाला स्वातंत्र्य मध्यरात्री मिळाले. याचा अर्थ घेवून महिलांनी रात्रभर रस्त्यावर भटकायचे काय, असा सवाल केला आहे आंध्रप्रदेशमधील काँग्रेसचे परिवनह मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी.

आंध्र,तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 20:54

जग सध्या वादळांच्या दहशतीच्या छायेत आहे. अमेरिकेत `सँडी` वादळानं थैमान घातलय. तर भारतातली आंध्र आणि तामिळनाडू ही राज्य नीलम या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची चिन्ह आहेत.

अल्पसंख्यांकांना नाकारलं आरक्षण...

Last Updated: Monday, May 28, 2012, 22:12

आंध्रप्रदेश हायकोर्टाने ओबीसींच्या कोट्यातून अल्पसंख्याकांना साडेचार टक्के आरक्षण देण्यास नकार दिलाय. राज्य सरकारचा हा निर्णय घटनात्मक नसल्याचं हायकोर्टानं म्हटलंय.

जगनमोहन रेड्डींसाठी आंध्रा बंद

Last Updated: Monday, May 28, 2012, 20:48

वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. जगनमोहन यांच्या अटकेनंतर वायएसआर काँग्रेसनं आंध्र बंदची हाक दिली.

तिरूमला मंदिरात दिवसाला करोडो रूपये

Last Updated: Monday, April 2, 2012, 23:19

आंध्रप्रदेशमधल्या तिरुमल मंदिर संस्थानानं रविवारी रामनवमीच्या दिवशी देणगी आणि हुंड्याच्या स्वरूपात जमा होणाऱ्या रकमेचा विक्रमी उच्चांक गाठला. भाविकांकडून रविवारी ५ कोटी ७३ लाखांची विक्रमी हुंडी मंदिरात जमा झाली.

आंध्र, तामिळनाडूला वादळाचा धोका

Last Updated: Thursday, December 29, 2011, 12:37

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार वादळ घुसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात तुफानी वादळाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

तिरूपती मंदिरात एक कोटींचे हिरे

Last Updated: Thursday, November 24, 2011, 06:40

आंध्रप्रदेशमधील तिरूपती मंदिरात एका अज्ञात भक्ताने १६२ हिरे पेटीत दान केलेत.

आंध्रप्रदेशमध्ये अपघात नांदेडचे सहाजण मृत्युमुखी

Last Updated: Friday, October 28, 2011, 08:50

आंध्र प्रदेशातील निजामाबादजवळ क्वालिसला झालेल्या अपघातात नांदेडच्या सहा जणांचा मृत्यू झाला.