काँग्रेस मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ, CM पुन्हा दिल्लीला

Last Updated: Sunday, June 1, 2014, 19:58

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच

Last Updated: Sunday, June 1, 2014, 12:57

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.

काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

Last Updated: Sunday, June 1, 2014, 09:19

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटणार?

Last Updated: Sunday, May 25, 2014, 21:30

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोर जावं लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला संघर्ष अजून संपलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आघाडी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगत आघाडी राहीलच अशी शक्यता नसल्याचे संकेत दिलेत.

नरेंद्र मोदींचा देशात प्रचंड विजय

Last Updated: Friday, May 16, 2014, 12:35

एनडीएने भारतात ३२५ जागांची आघाडी घेतली आहे. देशात २७५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. देशात `अब की बार मोदी सरकार` हे भाजपाचे प्रचार वाक्य सत्यात उतरणार आहे.

लोकसभा निकाल : पाहा, ४८ मतदारसंघांचा निकाल

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:30

राज्यातील 48 जागांपैकी 22 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर शिवसेना 19, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेस अवघ्या 1 जागेवर आघाडीवर आहे.

मुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 22:44

मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत राडा, आघाडीच्या बैठकीत कानाखाली

Last Updated: Saturday, April 12, 2014, 16:57

कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये प्रचंड रा़डा सुरू आहे. सिंधुदुर्गमधील वाद क्षमण्याची चिन्हे नसतानाच रत्नागिरीच्या काँग्रेस भवनात जोरदार राडा झाला. आघाडीच्या बैठकीत हा राडा झाल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाण्याचे संकेत मिळत आहेत.

पक्के वैरी झाले सख्खे मित्र... आघाडीला फायदा?

Last Updated: Friday, April 11, 2014, 12:54

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समझोता झालाय.

कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळा, नाहीतर कारवाई - उद्य सामंत

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 09:38

सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत दिलाय.

महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात

Last Updated: Sunday, February 23, 2014, 23:02

काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.

पवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?

Last Updated: Monday, February 10, 2014, 11:40

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.

तिसऱ्या आघाडीचं समीकरण - ११ पक्ष एकत्र आले

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 19:21

आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपला शह देण्यासाठी ११ पक्ष एकत्र आले आहेत. संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. नव्या गटातील पक्ष धर्म निरपेक्ष, जनतेचं कल्याण, या मुद्यावर एकत्र आलेले आहेत.

महायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड

Last Updated: Thursday, January 30, 2014, 22:24

महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.

टीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी

Last Updated: Monday, December 23, 2013, 12:23

ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.

तिसऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 15:31

नवी दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. नवी दिल्लीत आज एकाच मंचावर समाजवादी पक्ष, जेडीयू, सीपीआयएम, जेडीएस, सीपीआय यांसह २० पक्ष उपस्थित आहेत. जेडीयूचे शरद यादव, सीपीएमचे प्रकाश करात, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव एकत्र दिसून आले.

ठाणे पालिका स्थायी समिती निवडणुकीत चुरस, आघाडीत बिघाडी

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 07:24

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुती आणि आघाडीकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून मतदान होणार होतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येही फूट पडलीये.

तिसरी आघाडीच ठरवणार पुढचा पंतप्रधान - मुलायम

Last Updated: Monday, October 7, 2013, 12:39

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतलाय.

केंद्रातील काँग्रेस सरकारची नोकर भरतीवर टाच

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:37

केंद्र सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने केंद्राने थेट नोकर भरतीवर टाच आणली आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी हे आता अधिक चिंतेचा विषय झाली आहे.

शिवाजीराव मोघेंचा आघाडीला घरचा आहेर!

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 19:48

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तोडून स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी करत, आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. ते रामटेक लोकसभा क्षेत्राच्या केंद्रस्तरीय मतदार अभिकर्ता यांच्या मेळाव्यात बोलत होते.

ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स

Last Updated: Monday, September 2, 2013, 23:34

ठाणे महापालिकेच्या कोपरी आणि मुंब्रा भागात झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स झालंय... याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक पुन्हा विजयी झाल्याने ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ समसमान राहिलंय...

आता ठाणे महापालिकेत युती-आघाडीत 'टाय'!

Last Updated: Monday, September 2, 2013, 16:09

ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या रेखा पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांचा ३२२१ मतांनी पराभव केला. तर मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक ५७ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ भगत विजयी झाले. त्यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अविनाश पवार यांचा पराभव केला.

सुरेश जैन यांच्या पतंगानं घेतली भरारी!

Last Updated: Monday, September 2, 2013, 14:38

घरकुळ घोटाळ्यासंदर्भात कारागृहात असलेले सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीनं सर्वाधिक ३३ जागांवर विजय मिळवत जळगाव महापालिका निवडणुकीत सरशी मिळवलीय. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नवी राजकीय आघाडी!

Last Updated: Monday, May 20, 2013, 18:22

राज्यात नव्या राजकीय आघाडीचा उदय झालाय. २३ पक्षांच्या या आघाडीचं नाव महाराष्ट्र लोकशाही आघाडी असणार आहे.

`काँग्रेसचा हात` उंचच उंच... आघाडीवर

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 10:08

कर्नाटकचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलीये. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपचं पहिलं वहिलं दक्षिणेकडचं राज्य हातातून जाण्याची शक्यता आहे.

इंग्लंड बॅकफूटवर, इंग्लंडला दुसरा धक्का

Last Updated: Sunday, January 27, 2013, 21:01

धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली आहे. इंग्लिश टीमच्या तेज मा-यासमोर टीम इंडियाच्या बॅट्समनचं काहीच चालल नाही.

ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे; फाटक विजयी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 12:50

ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक पार पडली. यानिवडणुकीत आघाडी गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी बाजी मारलीय.

ठाण्याची निवडणूक स्थायी; पक्षांचं चित्त नाही ठायी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 09:42

ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याकडं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

न्यूझीलंडकडे २४४रन्सची आघाडी

Last Updated: Sunday, September 2, 2012, 18:25

चौथ्या दिवशी न्यूझीलंडचे शेपूट गुंडाळून विजयी लक्ष्य गाठण्याच आव्हान भारतासमोर असेल. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंडकडे २४४रन्सची आघाडी आहे.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारीच?

Last Updated: Monday, July 9, 2012, 16:47

विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या गळ्यात पुन्हा उपराष्ट्रपती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने हमीद अन्सारी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

नाशकात आघाडीला धक्का, हिरे विजयी

Last Updated: Thursday, July 5, 2012, 10:32

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत अहमदनगरमधील दोन प्रबळ उमेदवारांमध्ये झालेल्या मत विभागणीचा लाभ घेत नाशिकच्या अपक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी विजय मिळविला. डॉ. हिरे यांनी आघाडीला दे धक्का दिला.

आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांचा जीव जाणार ?

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:14

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या शह-काटशहाचा फटका राज्यातील जिल्हा बँकांना आणि पर्यायानं शेतकऱ्यांना बसू लागला. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.

विधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी

Last Updated: Monday, May 7, 2012, 20:41

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

विधानपरिषदेसाठी आघाडीत बिघाडी होणार?

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:09

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आम्ही भांडू पण एकत्रच नांदू- शरद पवार

Last Updated: Monday, April 23, 2012, 17:37

दोन्ही काँग्रेसमधल्या वादावर अखेर पडदा पडल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थातल्या वादाचा राज्यात किंवा केंद्रातल्या आघाडीवर परिणाम होणार नाही असं पवार म्हणालेत. तर मुख्यमंत्र्यांनीही आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत वादावर पडदा टाकला आहे

पालिका पॅटर्नचा आघाडीवर परिणाम नाही - शरद पवार

Last Updated: Sunday, April 22, 2012, 14:09

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी पुढची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला एकत्रिक सामोरी जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

स्थायीसाठी घाई, राज भेटीला तीन सेना आमदार!

Last Updated: Thursday, March 29, 2012, 19:04

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तीन आमदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्हांला गृहीत धरण्यात आल्याने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे राज यांनी स्पष्ट केल्यानंतर सेनेमध्ये धावपळ सुरू झाली.

आता माझी सटकली - राज ठाकरे

Last Updated: Thursday, March 29, 2012, 16:51

महाराष्ट्र नवनिर्माण सेनने ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हा नाशिकचा वचपा नाही असं यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले आहेत.

आघाडीत सारं काही आलबेल...

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 08:55

जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीत बेबनाव निर्माण झाला असतानाच पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला काँग्रेसनं साथ दिली.

मनसेचा आघाडीला 'पाठिंबा', सेनेला मात्र 'ठेंगा'

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:38

औरंगाबाद जिल्हा परिषदेतही मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देणार आहे. एवढच नाही तर आघाडीसोबत सत्तेतही सहभागी होणार आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडं, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडं तर मनसेला दोन समित्या मिळणार आहेत.

औरंगाबाद जि.प.त आघाडीचा झेंडा?

Last Updated: Saturday, March 10, 2012, 18:25

औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे१६ तर राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. त्यामुळं केवळ दोन सदस्यांचा आघाडीला पाठिंबा मिळाल्यास त्यांची सत्ता येणार आहे.

सुहासिनी लोखंडे आघाडीत जाणार?

Last Updated: Sunday, March 4, 2012, 18:06

ठाण्याच्या भाजपच्या बेपत्ता नगरसेविका सुहासिनी लोखंडे या आघाडीच्या गोटात सामिल झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. युतीचे ८० टक्के नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळं संशयाला बळ मिळालं आहे.

पुण्यात काँग्रेसची राष्ट्रवादीला गुगली....

Last Updated: Sunday, February 26, 2012, 19:58

पुणे महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत.

नाशकात काँग्रेसची आघाडी, पराभवाचा ब्लेमगेम

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:07

नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.

युतीने केली माती – शरद पवारांची टीका घणाघाती

Last Updated: Thursday, February 9, 2012, 22:33

मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.

जाहीरनाम्यात आघाडीची चूक

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 22:40

मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस बाकी असताना आज आघाडीच्या नेत्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात मोठ्या प्रमाणात आश्वासन मुंबईकरांना दिली आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने छापलेल्या या जाहीरनाम्यात चुका देखील तितक्याच आहे.

आघाडीचा जाहीरनामा, कोणा कोणा येणार कामा?

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 20:52

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज आघाडीने आपला जाहीरनामा जाहीर करण्यात आले. मुंबईतल्या २००० सालांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या घोषणेसह अनेक आश्वासनांची खैरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

ठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 15:45

ठाणे महापालिका निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ दोन तीन जागांचा तिढा न सुटु शकल्याने तुटणार का ? हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या दोन वाजता चर्चा होणार असल्याचं समजतं.

आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष

Last Updated: Saturday, January 28, 2012, 17:04

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.

नाशिकमध्ये महाआघाडी ?

Last Updated: Friday, January 27, 2012, 22:52

नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.

गोव्यात कुणाचंच काही खरं नाही....

Last Updated: Thursday, January 26, 2012, 18:11

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांची घोषणा होण्यास उशीर झाला आहे. गोव्यासह उत्तर प्रदेशचीही विधानसभा निवडणूक होते आहे. उत्तर प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्वाचं राज्य असल्यानं सर्वच पक्षांनी तिथं लक्ष केंद्रीत केल आहे.

ठाणे: आघाडीत बिघाडी, बैठकीला आनंद परांजपेंची हजेरी

Last Updated: Thursday, January 26, 2012, 17:07

ठाण्यात आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असंल तरी आठ वॉर्डवरुन मतभेद कायम आहेत. आज झालेल्या बैठकीतही त्याबाबत काहीच निर्णय होऊ शकला नाही. वॉर्ड क्रमांक १३, १५, ३६, ३७, ५४,५६, ५९, ६० या वॉर्डवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच आहे.

आघाडीची गाडी रूळावर....

Last Updated: Saturday, January 21, 2012, 16:03

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेली अनेक दिवस सुरू असणाऱ्या आघाडी गाडी आज कुठे रूळावर आली आहे. आज मुंबईतला आघाडीचा वॉर्डवाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानुसार आता वॉर्ड क्रमांक ५० , ५६ काँग्रेसला मिळाला आहे.

ठाण्यात आघाडीचा तिढा अखेर सुटला

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 18:18

मुंबईपाठोपाठ ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादीला 70 जागा तर काँग्रेसला 60 जागा सोडण्यात आल्या आहेत

वॉर्ड वाटपावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा तिढा

Last Updated: Thursday, January 12, 2012, 00:13

आघाडीतला जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी वॉर्ड वाटपावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा तिढा निर्माण झाला आहे. तोट्याचे वॉर्ड मिळाल्याने राष्ट्रवादी नाराज आहे.

आघाडी झाली खरी, आमदार खासदार नाराज भारी

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 15:39

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली खरी मात्र आघाडीबाबत काँग्रेसमध्ये असंतोष पसरला आहे. मुंबईतल्या काँग्रेस खासदार आमदारांच्या बैठकीत राष्ट्रवादीला ४५ जागा देण्याचं ठरलं असताना ५८ जागा दिल्य़ाच कशा असा सवाल आमदार-खासदारांनी विचारला आहे.

आघाडी संदर्भात निर्णयासाठी मुख्यमंत्री दिल्लीत

Last Updated: Monday, January 9, 2012, 14:41

मुंबई मनपातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अधिकच वाढल्यानं मुख्यमंत्र्यांना अखेर दिल्ली दरबारी धाव घ्यावी लागली आहे. राष्ट्रवादीनं आज संध्याकाळचा अल्टिमेटम दिल्यामुळं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी अखेर दिल्लीला रवाना झाले आहेत.

आघाडीसाठी बैठीकींच्या फैरीवर फैरी

Last Updated: Sunday, January 8, 2012, 17:03

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आघाडीबाबत काहीच ठरताना दिसत नाहीये. त्यामुळे गेले अनेक दिवस बैठकींच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे बैठकीत आजच्या बैठकीत काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसला 'गुरु' मंत्र, आघाडी नको!

Last Updated: Saturday, January 7, 2012, 12:02

आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी उत्तर मध्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत आक्रमक झालेत. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना जागावाटपासाठी २००७ सारखी एक बैठक बोलावण्याचे आदेश दिलेत