उत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींची गँगरेपनंतर हत्या

Last Updated: Thursday, May 29, 2014, 12:57

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दलित अत्याचार : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार - पवार

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:25

दलितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलवावी अशी सूचना दिली असल्याचं पवारांनी साताऱ्यात बोलतांना सांगितलं.

नगरमधील हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात - आर आर

Last Updated: Saturday, May 3, 2014, 08:38

अहमदनगर जिल्ह्यातल्या दलित युवक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. तर दोषींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.

नगर ‘हॉरर’ किलिंग : नितीनला न्याय मिळणार?

Last Updated: Friday, May 2, 2014, 23:06

वेदनेनं तडफडत मेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. आपला जीव गमावून नितीननं आपल्या प्रेमाची किंमत चुकवली.

रामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी

Last Updated: Sunday, April 27, 2014, 14:47

योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.

महाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Last Updated: Thursday, January 16, 2014, 12:41

साठोत्तरीतील मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहेत. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नामदेव ढसाळ यांचा अल्पपरिचय

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:59

दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. ते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय.

महाकवी नामदेव ढसाळ यांना द्या श्रद्धांजली!

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:21

मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज दिवसभर वडाळ्यातील सिद्धार्थ हॉस्टेल इथं अंत्यदर्शनासाठी ढसाळ यांचं पार्थिव ठेण्यात येणार आहे.

महाकवी दलित पँथर नामदेव ढसाळ यांचे मुंबई निधन

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 09:17

मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.

दलितांचा आवाज बुलंद करतोय `दलित कॅमेरा`

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 08:51

दलितांचा आवाज आता इंटरनेटवर बुलंद होत आहे. दलितांवर होत असलेले अन्याय, त्यांचे प्रश्न हे यू-ट्यूबच्या सहाय्याने मांडण्याचं काम दलित कॅमेरा करत असतो. देशभरात कुठेही होत असलेल्या अन्याय मीडियापर्यंत पोहोचेलच असं नाही.

दलित तरुणीसोबत प्रेमविवाहापूर्वीच तरुणाची क्रूर हत्या

Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:33

प्रेमविवाह करण्याआधीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर-चेरपाली इथं घडलीय. तो एका दलित मुलीशी प्रेमविवाह करू इच्छित होता.

सिद्धार्थ हॉस्टेलची डागडुजी राष्ट्रवादी करणार

Last Updated: Friday, July 19, 2013, 20:41

वडाळ्यातल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलची दुरवस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतलीये.

EXCLUSIVE- दलित चळवळीचं केंद्र मोजतंय शेवटच्या घटका!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 22:08

वडाळ्यातल सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होत. आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटका मोजतंय. इमारत मोडकळीस आलीये, तिथलं वातावरण अस्वछ आहे. अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्यांनी या वसतिगृहातील रूम बळकावल्यात.

दलित आणि ओबीसी सर्वाधिक भ्रष्टाचारी- आशिष नंदी

Last Updated: Saturday, January 26, 2013, 19:39

जयपूर साहित्य संमेलनात समाजशास्त्रज्ञ आणि लेखक आशिष नंदी यांनी दलित आणि ओबींसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झालाय.

मंदिर प्रवेश, दलित महिलेच्या पतीला मारहाण

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 14:16

दलित महिलेने मंदिरात प्रवेश केल्याच्या कारणावरून, तिच्या पतीला गाव गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावात ही घटना घडलीये.

दलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 12:31

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं, की रा.स्व.सं.च्या सरसंघचालकपदी विराजमान होऊ शकतो. कार्य करणारा कुठलाही स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. मात्र, केवळ दलित आहे, या आधारावर सरसंघचालक होऊ शकत नाही., त्याचं कार्यही तितकंच हवं.

गांधी घराणे दलितांना विसरत नाही- शिंदे

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 16:58

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देशाच्या सुरक्षेऐवजी गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही, अशी स्तुतीसुमने वाहत दलित कार्ड बाहेर काढले.

'दलित' हा शब्द अवमानकारक - अजित पवार

Last Updated: Friday, July 6, 2012, 14:38

‘अगोदर स्वत:ला दलित म्हणायचं बंद करा!’ असा सल्ला दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी... तेही दलित महासंघाच्या मेळाव्यातच...

दलित समाजाला बंदुकीची परवानगी ?

Last Updated: Monday, January 16, 2012, 09:25

ग्रामीण भागातल्या दलित समाजाला स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवानगी मिळाले पाहिजे अशी मागणी रिपाइं नेता रामदास आठवले यांनी केली आहे.

मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा पुतळा जाळला

Last Updated: Friday, January 13, 2012, 23:36

साता-यात दलित महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी लक्ष्मणराव ढोबळेंनी केलेल्या धक्कादायक विधानाचे संतप्त पडसाद उमटायला सुरुवात झालीय. क-हाडमध्ये लक्ष्मणराव ढोबळेंचा पुतळा जाळलाय. कृष्णा हॉस्पिटल जवळ दलित महासंघानं हे आंदोलन केलंय.

महायुतीत धुसफूस.. पाच जागांसाठी ढसाळ आग्रही

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 08:52

काल आघाडीचा मेळ बसला. मात्र महायुतीमध्ये अजुनही धुसफूस ही सुरूच आहे. दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांनी मुंबईत पाच जागांची मागणी केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

आठवले घेरणार पंतप्रधानांना ?

Last Updated: Saturday, January 7, 2012, 16:06

इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.