पुण्यात काँग्रेसची राष्ट्रवादीला गुगली....

Last Updated: Sunday, February 26, 2012, 19:58

पुणे महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत.

बोगस व्होटिंग कार्ड टोळीचा पर्दाफाश

Last Updated: Friday, February 24, 2012, 17:14

नाशिकमधील बोगस व्होटिंग कार्ड बनवणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतल्या एकानंच याबाबतची माहिती उघड केली.

बीएमसीत पदासांठी चुरस

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:18

विभागप्रमुख मिलिंद वैद्यांचा राजीनामा

Last Updated: Sunday, February 19, 2012, 19:40

शिवसेनेच्या मिलिंद वैद्यांनी पक्षाचा दादरमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये शितोळे-ढोरे गटात संघर्ष

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:51

पिंपरी चिंचवडच्या सांगवीतल्या जनतेला प्रशांत शितोळे आणि हर्शल ढोरे यांच्यातला वाद नवीन नाही. निवडणुकीपूर्वी दोन्ही गटात झालेल्या वादात तुषार ढोरेची हत्या झाली होती.

पंतगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर

Last Updated: Monday, February 20, 2012, 08:42

मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी बाजूही सावरुन घेतली

शिवसेना शाखेत पराभूत मनसे उमेदवाराचा धिंगाणा

Last Updated: Saturday, February 18, 2012, 20:49

उल्हासनगरमधल्या वॉर्ड क्रमांक २५मध्ये शिवसेनेच्या नगरसेविरका वसुधा बोडरे विजयी झाल्य़ाने संतापलेल्या पराभूत मनसे आणि अपक्ष उमेदवारानं शिवसेना शाखेत घुसून तोडफोड केली.

राज्यात कमी मतदान, सत्ताधाऱ्यांना दिलासा?

Last Updated: Thursday, February 16, 2012, 19:55

राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी शांततेत मतदान झालं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत दिवसाच्या शेवटी ४५ टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४६ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.

अकोला- अज्ञातांची मतदानकेंद्रावर दगडफेक

Last Updated: Thursday, February 16, 2012, 15:04

अकोल्यातल्या हरिहरपेठ भागातल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली.

महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:35

राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

मतदान केंद्रावरच मतदाराचा हृदयविकाराने मृत्यू

Last Updated: Thursday, February 16, 2012, 12:29

मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या लालमणी विश्वकर्मा या मतदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सोलापुरात माजी महापौरांना अटक

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:25

सोलापुरचा माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक ११ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटेंना अटक करण्यात आली आहे.

१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Thursday, February 16, 2012, 08:50

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

निवडणूक रणनिती अजितदादांची

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:38

मुंबई-ठाणेकरांना कोणी वाली आहे का?

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:41

मंदार मुकुंद पुरकर
मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या दोन्ही महापालिकांच्या सत्तास्थानी कोण असेल हे १७ फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता गेल्या दोन दशकाहून अधिक काळ सत्तेत अबाधित राहिली आहे.

नारायण राणेंचा अजितदादांवर हल्लाबोल

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:45

पुण्यातल्या प्रचार सभेत नारायण राणेंनी अजितदादांवर हल्लाबोल केला. सर्वात जास्त गुन्हेगार राष्ट्रवादीचे आहेत. कलमाडींना नावं ठेवता, तुम्ही पुण्याचे काय नाव उज्ज्वल केले असा सवाल राणेंनी केला.

मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार

Last Updated: Monday, February 13, 2012, 16:06

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

अमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:46

अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.

ठाण्यात एनसीपीचे ४ कार्यकर्ते वीजेच्या धक्क्याने ठार

Last Updated: Sunday, February 12, 2012, 19:29

कळव्यात वीजेचा शॉक लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार कार्यकर्ते ठार झाले आहेत. लोखंडी झेंडा घेऊन कार्यकर्ते जात असताना वीजेचा धक्का लागला.

अमरावतीमध्ये एक कोटी रुपये जप्त

Last Updated: Sunday, February 12, 2012, 13:50

अमरावतीमध्ये पोलिस नाकाबंदीत फोर्ड एन्डेव्हर गाडीतून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी या पैशांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईनामा भाग- १

Last Updated: Friday, February 10, 2012, 22:19

मराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र- राज ठाकरे

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:40

उत्तर भारतीय मुंबईत किंवा पुण्यात मतदान करतात आणि उत्तर प्रदेशात जाऊनही मतदान करतात. एकच व्यक्ती दोनदोनदा मतदान करतो असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील शहरे वेडीवाकडी वाढताहेत आणि मराठी टक्का कमी करण्याचा षडयंत्र राजरोसपणे रचलं जात आहे असा सावधनतेचा इशारा राज ठाकरेंनी दिला.

ठाण्यात धर्मराज्यचे मनसेला आव्हान

Last Updated: Monday, February 6, 2012, 19:12

ठाण्यात उमेदवारी यादीनंतर मनसेमध्ये अनेकजण नाराज झालेत. या नाराजांनी आता बंडखोरी करत राजन राजे यांच्या धर्मराज्य पक्षाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

खा.संजीव नाईक यांचा सनसनाटी आरोप

Last Updated: Monday, February 6, 2012, 11:52

ठाण्यातली आघाडी तोडण्यासाठी शिवसेनेनं ऑफर दिल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीच्या होर्डिंगवर आठवलेंची हरकत

Last Updated: Monday, February 6, 2012, 14:38

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे.

मनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग

Last Updated: Sunday, February 5, 2012, 18:09

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.

अकोल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 18:29

अकोल्यात संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केलाय. तिकीट न मिळाल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष संदिप पुंडकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली

ठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 15:45

ठाणे महापालिका निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ दोन तीन जागांचा तिढा न सुटु शकल्याने तुटणार का ? हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या दोन वाजता चर्चा होणार असल्याचं समजतं.