लोकसभेसाठी `आप`चे महाराष्ट्रातून सहा उमेदवार जाहीर

Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:32

आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातून लोकसभेचे आणखी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रतिभा शिंदे, अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सचिन तेंडुलकर होईल महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, October 19, 2013, 10:52

काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

‘मिक्टा-२०१३’- नानानं केलं शरद पवारांचं कौतुक

Last Updated: Monday, September 30, 2013, 10:08

मकाऊमध्ये यंदाचा ‘मिक्टा-२०१३’ पुरस्कार सोहळा रंगतोय. सुमारे तीनशे कलाकार मकाऊमध्ये दाखल झालेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता नाना पाटेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

संजय दत्तचा पुण्यातला आजचा कार्यक्रम रद्द!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 15:10

बालगंधर्वमध्ये आज होणारा संजय दत्तचा `महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन` हा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणामुळंच हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारागृहाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आले.

५२ हजार बेपत्ता, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित

Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:08

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.

आयपीएल आणि महाराष्ट्रातला दुष्काळ!

Last Updated: Thursday, May 16, 2013, 18:40

आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.

राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 09:34

मराठवाडा-विदर्भानंतर आजपासून राज ठाकरेंचा झंजावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात सुरू होतोय. आज राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून चार दिवस खांदेशचा दौराही ते करणार आहेत.

अवकाळी पावसाची अवदसा; राज्याला जोरदार फटका

Last Updated: Saturday, March 16, 2013, 16:40

दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या राज्याला कालपासून अवकाळी पावसानं चांगलाच दणका दिला. वीजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

यशवंतराव चव्हाण `जन्मशताब्दी वर्षा`ची सांगता वादातच!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 07:31

महाराष्ट्राचा मंगलकलश आणलेले नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. मंगळवारी या जन्मशताब्दी कार्यक्रमाची सांगता झाली तीही वादातच...

आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?

Last Updated: Monday, March 4, 2013, 10:01

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

हैदराबाद स्फोट : महाराष्ट्र करणार सर्वोतोपरी मदत

Last Updated: Saturday, February 23, 2013, 13:38

तपास अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.

युवक काँग्रेसची संवाद यात्रा

Last Updated: Monday, February 18, 2013, 21:24

राज्यातील दुष्काळी परीस्थिती समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाणा ते सांगली अशी ही संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा प्रवास सध्या अहमदनगर जिल्ह्यातून सुरु आहे.

तरुणीवर अमानुष सामूहिक बलात्कार आणि हत्या

Last Updated: Sunday, February 3, 2013, 14:46

दिल्लीमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सरकारविरोधात रान पेटलं असतानाच नांदेड जिल्ह्यातल्या काकांडीजवळ 20 ते 25 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं उघड झालंय. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.

'एफडीआय'साठी महाराष्ट्र ‘हॉट डेस्टिनेशन’!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 13:25

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र ‘एफडीआय’ म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीसाठीही हॉट डेस्टिनेशन ठरलाय. एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ६१.१३ अब्ज डॉलर एवढी परकीय गुंतवणुक नोंदविण्यात आलीय.

कृषीमंत्री म्हणतात, दुष्काळामुळं उडाली झोप

Last Updated: Friday, December 28, 2012, 22:35

माणसांना जगवायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे… यंदाचा दुष्काळ गंभीर आणि झोप उडणारा’ असल्याचं भीषण वास्तव केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या हायटेक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.

प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्रा’विना होणार संचालन!

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 12:08

मंत्री आणि अधिकाऱ्यांमधल्या विसंवादामुळे सरकारी योजनांचा बट्ट्याबोळ झाल्याच्या अनेक बातम्या आपण आजवर ऐकल्या आहेत. पण आता याच विसंवादाचा फटका दिल्लीतल्या विजयपथावरील संचलनात सहभागी होणाऱ्या राज्याच्या चित्ररथालाही बसलाय.

महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द

Last Updated: Monday, November 19, 2012, 13:32

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी होणाऱ्या प्रज्ञा शोध परीक्षा तसंच सीएच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचा वाली कोण?

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 17:13

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 16:29

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वा-यावर सोडल्याचं चित्र दिसून येतंय.

राज्यात पावसाचा तडाखा, अतिवृष्टीचा इशारा

Last Updated: Monday, September 3, 2012, 19:18

दुष्काळाच्या झळांनी होरपळत असलेल्या मराठवाड्यावर वरुणराजा प्रसन्न झालाय. मराठवाड्यात आज पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, बीड, परभणी आणि उस्मानाबाद परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. कोकणातही चांगला पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !

Last Updated: Friday, August 31, 2012, 13:49

आशाताई कसाबला म्हणतील की, अतिथी देवो भव !, पाक कलाकारांचा कार्यक्रम केल्यास खबरदार, आशाताई भारतातले सगळे कलाकार संपले का?

‘केंद्राकडे मदत कशी मागतात हेही माहित नाही?’

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 16:33

राज्याच्या दुष्काळाच्या नियोजनावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केलीय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळं पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिलाय.

महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती बदलणार

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:31

यावर्षी महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यात दुष्काळी स्थिती आहे. मात्र सप्टेंबरमध्ये दुष्काळाची स्थिती काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून जोरदार बरसेल असा विश्वास हवामान खात्यानं व्यक्त केलाय. पावसावर विपरीत परिणाम करणा-या एल निनोची निर्मिती होणार नाही असंही हवामान खात्याचा अंदाज आहे.

विलासराव अनंतात विलीन, महाराष्ट्रावर सुतकी कळा

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 17:12

केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बाभळगाव येथील घराजवळील वडीलोपार्जित शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुठे आहेत कोल्हापूरचे पैलवान?

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 12:23

ऑलिम्पिकमध्ये छोटे छोटे देश मोठी कामगिरी करुन मेडल्सची बरसात करत असतानाच भारताला मात्र एकेक पद मिळवण्याठी झगडावं लागतंय. त्यातही महाराष्ट्राची अवस्था अजूनच दयनीय. केवळ दोन प्लेअर वैयक्तिक खेळांत ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेत. मराठमोळ्या कुस्तीतही...

पवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 12:39

शरद पवारांची नाराजी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.

राज्यात आता गुटखा बंदी

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 22:06

राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं राज्यात आता गुटख्याच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी आली आहे.

महाराष्ट्र पुढे...पण स्त्रीभ्रूण हत्येत

Last Updated: Sunday, July 8, 2012, 10:36

राज्यात स्त्रीभ्रूण हत्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मात्र आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भ्रूणहत्या आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. तर महानगरांमध्ये मुंबई तिस-या क्रमांकावर आहे.

...तर महाराष्ट्रात मी हंगामा उभा करेन- राज

Last Updated: Friday, June 15, 2012, 19:30

'माझी लोकं शांततेत काम करतील त्यांना त्रास दिला तर लक्षात ठेवा', 'त्यानंतर मात्र महाराष्ट्रात असा हंगामा उभा करीन तो कोणालाही रोखता येणार नाही', असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील वसूलीबाबत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

उत्तराखंडात 'सेस' हटला; महाराष्ट्रात 'व्हॅट'चं काय?

Last Updated: Thursday, May 24, 2012, 13:47

उत्तराखंड सरकारनं मात्र या महागाईपासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी पेट्रोलवाढीवरचा सेस हटवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारही महागाईनं होरपळणाऱ्या सामान्यांना दिलासा देईल का?

पेट्रोल भडकलं... राज्यभर पसरलं...

Last Updated: Thursday, May 24, 2012, 12:57

पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता... मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...

महाराष्ट्रासाठी कोणीही एकत्र येत नाही- पवार

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 11:49

दुष्काळाच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

हृतिक महाराष्ट्राचा 'ब्रँड अँबेसॅडर'?

Last Updated: Thursday, April 26, 2012, 18:41

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्याचा 'ब्रँड अँबेसॅडर' होऊन महाराष्ट्राचा जागतिक स्तरावर प्रतिमा आणखी ठळक करावी, यासाठी हृतिकच्या टीमला काही दिवसांपूर्वी इ-मेल केला आहे. या इ-मेलचं महत्त्व लक्षात घेत हृतिकच्या टीमनेही तो मेल तात्काळ हृतिकला फॉरवर्ड केला आहे.

यंदा महाराष्ट्राला 'दुष्काळात तेरावा महिना'...

Last Updated: Saturday, April 21, 2012, 18:57

यंदा राज्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल असा अंदाज हवमान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यात एल-निनो हा घटक सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. त्याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता व्यक्त होती आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के

Last Updated: Saturday, April 14, 2012, 14:42

मुंबईला आज सकाळी ११. १ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला. तर संपूर्ण राज्यात हा भूकंप जाणवला. सकाळी १०.५८ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.९ अशी नोंद करण्यात आली आहे.

गौरव महाराष्ट्राचा.. कोणाचा होणार गौरव

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 19:55

गौरव महाराष्ट्राचा या सांगितिक रिएलिटी शोचं नवं पर्व लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हे पर्व खास असणार आहे.. कारण, या पर्वात प्रेक्षकांना मिळणार आहेत काही सरप्राईजेस 12 छोट्या उस्तादांसह रंगणार आहे गौरव महाराष्ट्राचा या रिएलिटी शोचं नवं पर्व.

आजपासून राज्यात पावसाला झाली सुरवात

Last Updated: Monday, April 2, 2012, 19:10

कोल्हापुरकरांना आज वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच झोडपलं. संध्याकाळच्या सुमारास पावसानं शहरात जोरदार हजेरी लावली. शहराच्या अनेक भागात गाराही पडल्या.

बजेटमध्ये उ. महाराष्ट्राला मिळणार तरी काय?

Last Updated: Monday, March 26, 2012, 08:48

आज राज्याच्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. उत्तर महाराष्ट्राला यंदा अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय मिळतं? याचीच उत्सुकता आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत?

विलासराव - अशोक चव्हाण यांचे मनोमिलन?

Last Updated: Saturday, March 24, 2012, 18:15

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राची पिछेहाट! डोक्यावर कर्जाचा बोजा

Last Updated: Friday, March 23, 2012, 13:29

कृषीप्रधान महाराष्ट्र अशी शेखी मिरवणा-या महाराष्ट्राचं वास्तवातल चित्र मात्र गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. दोन लाख २६ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेल्या महाराष्ट्राची कृषीक्षेत्रात पिछेहाट झाल्याचं वास्तव आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीत समोर आले आहे.

अजित पवार महाराष्ट्राला काय देणार?

Last Updated: Thursday, March 22, 2012, 09:14

केंद्र सरकारच्या बजेटकडून मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आहेत त्या राज्य सरकारच्या बजेटकडे. शिक्षण, उद्योग, व्यापार, शेती आणि अर्थातच सामान्यांच्या नजरा आता राज्य सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.

मुंबईसह महाराष्ट्राला काय देणार रेल्वे बजेट?

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 08:57

आज लोकसभेत रेल्वे बजेट सादर करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी हे आज बजेट सादर करतील. त्रिवेदी यांचं हे पहिलंच रेल्वे बजेट असणार आहे. नेहमीप्रमाणे या बजेटकडून मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मावळे वाढवणार पन्हाळगडाची शान

Last Updated: Friday, December 16, 2011, 13:00

कोल्हापूरातल्या पन्हाळ्याच्या सौंदर्यात आता आणखी भर पडणार आहे. कारण वीर काशीद समाधीच्या ठिकाणी मावळ्यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. सध्या या पुतळ्यांवरुन अंतिम हात फिरवण्याचं काम सुरू आहे.

'महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार'

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 07:24

महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, असा भावनिक सवाल उ. प्रदेशातल्या मतदारांना करत राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राहुल यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद मग मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटले. राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे प्रांतवाद नव्हे काय, असा सवाल करत शिवसेनेनंही टीकेची संधी सोडली नाही.