Last Updated: Thursday, November 8, 2012, 17:54
मोबाईल कंपन्या आपल्याकडे ग्राहक खेचण्यासाठी नवनवीन फंडा शोधत असतात. काहीवेळी कॉल दरात कपात करून ग्राहक वाढविण्यावर भर असे. मात्र, कंपन्यांना याला फाटा द्यावा लागणार आहे. कारण आता केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना एक रकमी शुल्क भरण्यासंदर्भात विचार केला आहे. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या कॉल दरात वाढ करण्याची शक्यता आहे.