Last Updated: Wednesday, June 20, 2012, 17:33
कॅन्सरसारख्या आजारातून सावरून भारतीय क्रिकेटफॅन्सच्या गळ्यातला ताईत बनलेला ‘युवी’चं लवकरच मैदानात आगमन होणार आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये होणाऱ्या विश्व ट्वेन्टी-२० खेळायची, त्याची स्वत: ची इच्छा आहे. या मॅचसाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होणं हे एक आव्हान असल्याची त्यालाही जाणीव आहे. पण, त्याबरोबरच या मॅचसाठी आपण नक्कीच मैदानात उतरु, हा विश्वासही त्याच्या मनात आहे.