आता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!

Last Updated: Sunday, April 6, 2014, 19:48

एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान

Last Updated: Monday, March 31, 2014, 14:01

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला. आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.

आमिर खान `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 15:54

अभिनेता आमीर खान त्याच्या `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सिझनमधील पहिल्याच भागात त्याच्याकडून न्यायप्रविष्ट खटल्याबाबत भाष्य केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याचे संकट येऊ शकते. तसे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 16:15

अभिनेता सलमान खान आणि अमिर खान यांची दोस्ती सर्वांनाच ठाऊक आहे. दोघेही मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवत असताना त्यांनी छोट्या पडद्यावर आपला करिष्मा दाखवला आहे. आता सल्लू अमिरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच सलमानचा सामाजिक विषयावर टीव्ही शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमान नविन भूमिकेत दिसेल.

आमिर खानचा अमेरिकेत सन्मान

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 23:37

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..

संवेदनशील आमीर...

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 12:18

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान किती संवेदनशील आहे, हे आपल्याला अनेक उदाहरणांवरुन दिसून आलंय. त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. कारण `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातील आपले अनुभव सांगतांना आमीर इतका हळवा झाला की, त्याला आपल्या अश्रूंनाही आवरता आलं नाही.

मृत हकिमसाठी आमिर म्हणतोय... `सत्यमेव जयते`

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 12:14

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात खाप पंचायतीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल हकिम याला २२ सप्टेंबर रोजी आपला प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर ‘ऑनर किलिंग’ला बळी पडलेल्या अब्दुलला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमिर खान पुढं सरसावलाय.

टाईम मॅगझीन झालं ‘आमिर`मय!

Last Updated: Friday, August 31, 2012, 15:53

आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांच्या अंतरंगात पोहचण्याचा प्रयत्न करणारा आमिर खाननं आता टाईम मॅगझिनच्या कव्हर पेजवरदेखील स्थान मिळवलंय. टाईम मॅगझीनच्या कव्हर पेजवर जागा मिळवणारा आमिर पहिला भारतीय पुरुष अभिनेता आहे.

१५ ऑगस्टला पुन्हा `सत्यमेव जयते`

Last Updated: Sunday, August 12, 2012, 20:02

आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे छोट्य पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. हा कर्यक्रम १५ ऑगस्टला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

आमीर खानचा 'सत्यमेव जयते' धडपडला

Last Updated: Monday, July 23, 2012, 19:40

सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या टीआरपीबाबत मला अजिबात काळजी नाही, असं म्हणणाऱ्या आमीर खानला मात्र आत टीआरपीची काळजी करावी लागणार आहे.

मैला सफाईबाबत नवं विधेयक - आमिर

Last Updated: Monday, July 16, 2012, 16:55

आमिर खानने सत्यमेव जयते कार्यक्रमातून वाचा फोडलेल्या प्रश्नाबाबत पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. तशी माहिती सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमिरला वासनिक यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला होता.

आमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला

Last Updated: Monday, July 16, 2012, 10:09

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. आमिर यावेळी डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमिरची मागणी आहे.

आमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर

Last Updated: Thursday, July 12, 2012, 13:59

शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.

'थोडी सी शराब'... आमीर सापडला वादात

Last Updated: Thursday, July 12, 2012, 11:30

आमीर खान प्रोडक्शननिर्मित सत्यमेव जयते हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी प्या’ हे आमीरचं वक्तव्यं आता चर्चेचा विषय ठरलंय.

जावेद अख्तर होते पक्के दारुडे

Last Updated: Sunday, July 1, 2012, 18:57

मी १९ व्या वर्षापासूनच म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून दारु प्यायला लागलो होतो. हळू -हळू ही सवय इतकी होत गेली की मी रोज एक बाटलीची दारु संपवू लागलो होतो, असे स्वतः बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कबुली दिली. तब्बल २६-२७ वर्षापर्यंत पक्का दारुडा होतो, असेही त्यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात मान्य केले.

आमीर म्हणतो, 'टीआरपी'ची चिंता कोणाला?

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 18:08

काही लोक आमीर खानच्या टीव्ही शो 'सत्यमेव जयते' याबाबत नाराज आहे. हा शो यावर्षी सहा मे पासून झाला. आमीर खानच्या भन्नाट विचारसरणीवर बेतलेल्या या शोसाठी अनेकजण टीव्हीकडे डोळे लावून बसलेले असतात.

स्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 15:02

आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.

'सलमान'ला आमीरचा 'अभिमान', काय म्हणतो 'खान'

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 13:33

अभिनेता सलमान आणि आमिर खान यांचं नातं इतकं चागलं नाहीये. आजवर त्या दोघांनी फक्त एकच सिनेमामध्ये काम केलं आहे. दोघं एकमेकांबाबत बोलण्यासही का - कू करीत असतात.

सलमान आमिरला म्हणाला 'टिलू'

Last Updated: Sunday, June 17, 2012, 17:43

बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि आमिर खानची मैत्री म्हणजे ‘जय-वीरू’च्या मैत्रीसारखी प्रसिद्ध आहे. खरंतर सलमान खान आणि आमिर खानने फक्त एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. मात्र, तेव्हापासून निर्माण झेली मैत्री आजही तितकीच घनिष्ट आहे.

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 18:18

बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.

खाप पंचायतीची ‘पंचाईत’?

Last Updated: Saturday, June 9, 2012, 17:57

दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.

खटला दाखल केला तरी पर्वा नाही- आमिर

Last Updated: Thursday, June 7, 2012, 18:39

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार दिला आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संस्थेने माझ्याविरोधात खटला दाखल केला, तर त्यास मी तयार असल्याचे आमीरने म्हटले आहे.

डॉक्टरांची माफी मागणार नाही – आमिर खान

Last Updated: Thursday, June 7, 2012, 18:40

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार केला आहे. शोमधून डॉक्टरांची तसेच त्याच्या पेशाची बदनामी केली असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी आमिरकडे माफीची मागणी केली होती.

आमिर खान करणार विनामोबदला जनजागृती

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 07:42

टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.

आमिरच्या औषधांनी डॉक्टरांचं तोंड कडू

Last Updated: Thursday, May 31, 2012, 23:50

'सत्यमेव जयते'द्वारे आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचं केवळ अभिनयापुरतंच मर्यादित न राहाता सामान्य जनतेचे प्रश्न कळकळीने मांडणं लोकांना पसंत पडल्याचं दिसत आहे. मात्र, काही लोक मात्र आमिरच्या या कार्यक्रमाबद्दल नाराज झाले आहेत.

'स्त्री भ्रूण हत्ये'च्या प्रश्नावर आमिर रस्त्यावर?

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 11:14

मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमीर खानची...

'...तर आमिरचं काय चुकलं?'

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 16:54

‘आमिरनं त्याची सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी वापरली तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न टीकाकारांना विचारत चित्रपट निर्माता शेखर कपूरनं आमिरची पाठराखण केलीय.

संवेदनशील मुद्द्यातून आमिर कमवतो पैसा!

Last Updated: Monday, May 14, 2012, 18:11

आमिर खानने 'सत्‍यमेव जयते' या शो मधून स्‍त्री भ्रृणहत्‍या सारखा संवेदनशील विषय हाताळून राजस्‍थानची बदनामी केली असून असे भावनिक मुद्द्यांना मनोरंजनाचे साधन बनविल्याची जळजळीत टीका राजस्थानचे आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ.राजकुमार शर्मा यांनी केली आहे.

आमिर, तुझा अभिमान वाटतो- दिलीप कुमार

Last Updated: Thursday, May 10, 2012, 16:30

हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आमिर खान आणि त्याच्या सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे.

आमिर खान गहलोत यांच्या भेटीला

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:21

टी व्ही शो 'सत्यमेव जयते' च्या माध्यमातून कन्या भ्रूण हत्येवर लगाम घालण्याचा उपक्रम सुरू करणारा फिल्म स्टार आमिर खान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेण्यासाठी जयपूर येथे दाखल झाला आहे.

राखी सावंत म्हणते, आमिर खान चोरटा

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:19

‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय, तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत राहिलाय. आता या चर्चेमध्ये राखी सावंतही सहभागी होतेय. आयटम गर्ल राखीच्या म्हणण्यानुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पना ही तिची आहे आणि आमीर खाननं ही संकल्पना चोरली आहे.

ठाकरेंनी केले आमिरचे कौतुक, कर्नाटकावर तोंडसुख!

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 20:33

आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घालून कर्नाटक सरकारने काय मिळवले, असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. निदान ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा तरी सन्मान ठेवायचा, पण प्रांतीयतेपुढे कसले आलेय सत्यमेव जयते!

आमिरच्या प्रसिद्धीने तसलिमा नसरीनचा जळफळाट

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 17:36

स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसलिमा नसरीन यांना आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'मुळे प्रचंड धक्का बसला आहे. आमीर खानने मांडलेल्या समाजातील मुद्यांवर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तो पाहून तसलिमा नसरीन हैराण झाल्या आहेत.

आमिर खानचा 'सत्यमेव जयते' वादात

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 10:18

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग रविवारी प्रसारित झाला आणि हा शो हिट झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर पाहायला मिळाल्या. मात्र, या आनंदाच्या बातम्यावर विरजण टाकण्याचे दुसरी बातमी आली आणि हा शोच आता वादात सापडला आहे.

मनाला भिडणारा अमिरचा ‘सत्यमेव जयते’

Last Updated: Monday, May 7, 2012, 17:31

अमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला आणि या पहिल्याच शोने ट्विटरसह लोकांच्या मनाला साद घातली आहे. शो संपण्यापूर्वीच या शो संदर्भात ट्विटरवर जबरदस्त ट्विटिवाट ऐकायला मिळाला.

सलमानसाठी पैशापेक्षा आमीर महत्त्वाचा

Last Updated: Monday, April 23, 2012, 21:49

सलमान खान आणि आमीर खान यांनी खरंतर एकत्र काम केलंय, ते फक्त एकाच सिनेमात. 'अंदाज अपना अपना' येऊनही बरीच वर्षं झाली. पण, तरीही त्यांची एकमेकांशी मैत्री अजूनही तितकीच घट्ट आहे.