घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा

Last Updated: Saturday, June 14, 2014, 12:48

आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाची विधानसभेत घोषणा केलीय. घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली-घोडबंदर रोड या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.

नारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

Last Updated: Thursday, June 5, 2014, 23:06

राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.

प्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी घाला - CM

Last Updated: Saturday, April 26, 2014, 10:44

देशात स्थिर सरकार आणायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घाला, अशी बेधडक मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

राज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद

Last Updated: Thursday, February 13, 2014, 17:37

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.

राज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’

Last Updated: Thursday, February 13, 2014, 12:59

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:26

सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा

Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:22

टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

CM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट

Last Updated: Friday, February 7, 2014, 17:17

निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.

शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:05

राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.

`विक्रांत`चा मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर लिलाव बाकी...

Last Updated: Thursday, December 5, 2013, 22:10

विक्रांत जहाजाचं म्युझियमही शक्य नाही आणि त्यावर हेलिपॅडही उभारता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विक्रांतचा लिलाव होणं आता निश्चित झालंय.

मुख्यमंत्री चव्हाण यांचा राजकीय फटाका, शरद पवारांवर कोटी

Last Updated: Saturday, November 2, 2013, 13:06

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.

नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान

Last Updated: Thursday, October 24, 2013, 13:21

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधलंय. मी मुख्यमंत्री असताना फाईल पेंडिंग ठेवत नव्हतो. मी एका दिवसात फाईल क्लियर करायचो. चांगल्या अधिका-यांचा वापर करुन घ्यायला हवा असा टोला मारून माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी हा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

सचिन तेंडुलकर होईल महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, October 19, 2013, 10:52

काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट

Last Updated: Saturday, September 28, 2013, 08:27

दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांनी काही तासांत मंजुर केली नियमबाह्य कामांची फाईल!

Last Updated: Monday, September 16, 2013, 18:50

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फायली पेंडिंग ठेवतात, असा आरोप शरद पवार यांनी नुकताच केला. त्यावरून राज्यात फाईल वॉर चांगलेच गाजले... मात्र एक फाईल अशी आहे, जिच्यावर पृथ्वीबाबांनी एका दिवसातच मंजुरीचा कोंबडा काढला...

शरद पवारांचा `यू टर्न`!

Last Updated: Sunday, September 15, 2013, 20:38

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अद्याप मिळालेलं नाही या प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय.. शिवाय मुख्यमंत्री जे वक्तव्य करतात त्यावर ते विलंब झाला तरी अंमलबजावणी करतात असं पवारांनी म्हटलंय. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

पैसे मिळवणे हाच सेनेचा अजेंडा – मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, September 14, 2013, 22:28

पैसे मिळवणे हाच शिवसेनेचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. डीएनएचे एस. बालकृष्णन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.

मुख्यमंत्र्यांचा पवारांवर पलटवार!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 17:52

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच्या शरद पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नियमबाह्य कामं असल्यानं विचार करावा लागतो असं सांगत त्यांनी पवारांना टोला हाणलाय.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, September 7, 2013, 09:00

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद `भलत्याच` विषयावर!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 21:06

मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलीय. दाभोलकर हत्या प्रकरण आणि मुंबई बलात्कार प्रकरण याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल, अशी अपेक्षा होती.... पण घडलं वेगळंच....

गांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 20:39

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्तींनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, हा प्रश्न होतं आहे.

आदर्श अहवाल लटकला, विरोधक संतप्त

Last Updated: Friday, August 2, 2013, 19:52

आदर्श चौकशी आयोगाचा अहवालावरून आता राजकारण तापलं आहे. हा अहवाल पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल अशी शक्यता होती.

विठुराया अशीच कृपा ठेव, मुख्यमंत्र्याचे साकडे

Last Updated: Friday, July 19, 2013, 12:00

यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.

वडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?

Last Updated: Thursday, July 11, 2013, 17:57

वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.

इस्टर्न फ्रीवे वाहतुकासाठी खुला

Last Updated: Thursday, June 13, 2013, 20:27

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते इस्टर्न फ्रीवेचं उदघाटन करण्यात आलं. सीएसटी ते चेंबूरपर्यंतच्या साडे तेरा किलोमीटरचा हा मार्ग मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.

अहमद जावेद होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त?

Last Updated: Thursday, June 6, 2013, 17:50

अहमद जावेद हे नवे मुंबई पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. गृहखात्यातल्या सूत्रांनी ‘झी मीडिया’ला दिलेल्या माहितीनुसार अहमद जावेद यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हिरवा कंदील दिलाय.

एलबीटी भरावाच लागेल – सुप्रीम कोर्ट

Last Updated: Friday, May 10, 2013, 16:09

एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.

राष्ट्रवादीची ‘याचका’च्या भूमिकेत नवी खेळी!

Last Updated: Thursday, May 9, 2013, 16:37

सत्तेत भागीदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत नवी खेळी खेळली जातेय.

एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार

Last Updated: Thursday, May 9, 2013, 13:28

मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले

Last Updated: Thursday, May 9, 2013, 12:48

एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

पुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला

Last Updated: Thursday, May 2, 2013, 20:11

गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...

सरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं- राज

Last Updated: Sunday, March 24, 2013, 23:23

राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले.

`केवळ `आधार` नाही म्हणून जनता निराधार नाही`

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 12:36

अनुदान किंवा स्कॉलरशिपसारख्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, केवळ आधारकार्ड नाही म्हणून हे लाभ मिळण्यात लाभधारक व्यक्ती अपात्र ठरणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील रहिवाशांना दिलंय.

मुख्यमंत्री हे वागणं बरे नव्हे - पवार

Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:36

पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.

‘घुबडामुळे जाणार मुख्यमंत्र्यांची खुर्ची’

Last Updated: Friday, March 15, 2013, 13:56

श्रद्धा आणि अंधश्रद्धा... या दोघांमधला फरक कळणं फार कठिण नाही. पण, माणसाचा विश्वास कशावर बसेल आणि कशावर नाही हे सांगता येत नाही. असाच एक खेळ रंगला होता विधान परिषद सभागृहात...

योजनांसाठी आधारकार्डबाबत काही अंशी शिथिलता

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 17:06

आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.

राज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री

Last Updated: Thursday, February 28, 2013, 19:21

राज्याची भाषा मराठी आहे. या माय मराठीसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा भवनाची लवकरच निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 16:53

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत.

बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 09:21

विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यमंत्रीमंडळाचा होणार विस्तार!

Last Updated: Monday, February 18, 2013, 17:29

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा रंगत होती.

शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 19:57

पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार असे तिघेही एकत्र येत आहेत. निमित्त आहे सायन्स पार्कच्या उद्घाटनाचं... 8 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. या तीनही नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडमधल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ब-याच अपेक्षा आहेत.

`झी २४ तास` अनन्य सन्मान सोहळा २०१२

Last Updated: Saturday, February 2, 2013, 09:25

`झी 24 तास`चा अनन्य सन्मान सोहळा 2012 या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जीवनगौरव देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार

Last Updated: Sunday, January 27, 2013, 19:22

मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.

...तर ढोबळेंना पूर्वीचे पोस्टींग - मुख्यमंत्री

Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:07

फेरीवाल्याचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे जर दोषी नसतील तर त्यांचे पोस्टींग पूर्वीच्याच ठिकाणी केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.

शिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 23:46

शिवाजी पार्कवरील चौथरा हटविणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेना नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेना नेत्यांनी दोन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले आहेत.

मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका

Last Updated: Sunday, December 2, 2012, 23:46

प्रशासकीय अधिकारी जायला तयार नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागातील विकास रखडल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांची अशी रिक्त राहणारी पदं हे या विभागांचा विकास न होण्यामागील महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कसाबचे येरवड्यात दफन - मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:23

दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

राज ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त खलबते!

Last Updated: Friday, October 26, 2012, 12:10

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.

बाप रे... मुख्यमंत्री ओढावणार वाद!

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:26

कल्याण डोंबिवली महापालिकेची वादग्रस्त ठरलेल्या बीएसयुपी योजनेतील सदनिकांच्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडतोय.

बाप्पा सर्वकाही ठिक करतील - मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, September 19, 2012, 18:10

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या `वर्षा` या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालंय.

सेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला

Last Updated: Friday, September 7, 2012, 17:12

काही पक्षांनी समाजात फूट पाडू नये. फूट पाडणा-यांना सरकार कायदा हातात घेऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शिवसेना-मनसेला दिलाय.

राज्याला केंद्राकडून मिळेल मदत - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, August 25, 2012, 11:59

दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.

राज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:50

‘आझाद मैदान येथे 11 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढलेला मोर्चा म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठीच राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे.

इंदिरांजींना जमलं नाही, मुख्यमंत्री काय करणार- उद्धव

Last Updated: Thursday, February 9, 2012, 17:20

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनेक पिढ्या खाली आल्या तरी शिवसेनेला संपवणं शक्य नाही. जे इंदिरा गांधींना जमलं नाही ते पृथ्वीराज चव्हाण काय करणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.