Last Updated: Thursday, January 26, 2012, 09:03
भारतीय संसदेने सामान्य लोकांच्या प्रगती आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले आहेत. सरकारनेही अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, लोकशाही व्यवस्था कोसळणार नाही याची काळजी कोणतीही सुधारणा करताना घेतली पाहिजे, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले. ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून त्या बोलत होत्या.